शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

राष्ट्रसंतांच्या विचारातून आदर्शगाव घडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 22:59 IST

राष्ट्रसंतांच्या साहित्यात समाज परिवर्तनाची मोठी शक्ती आहे. गावागांवात त्यांचे विचार अंगीकारल्यास राष्ट्र बळकट होण्यास मदत होईल. राष्ट्रसंतांच्या विचारांचा वसा युवकांनी पुढे न्यावा. त्यांच्या प्रेरणादायी विचारातून आदर्श गाव घडविता येईल, असे मत माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देमान्यवर : साखरीत पुतळ्याचे अनावरण

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : राष्ट्रसंतांच्या साहित्यात समाज परिवर्तनाची मोठी शक्ती आहे. गावागांवात त्यांचे विचार अंगीकारल्यास राष्ट्र बळकट होण्यास मदत होईल. राष्ट्रसंतांच्या विचारांचा वसा युवकांनी पुढे न्यावा. त्यांच्या प्रेरणादायी विचारातून आदर्श गाव घडविता येईल, असे मत माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी व्यक्त केले.राजुरा तालुक्यातील साखरी (वा.) येथे राष्ट्रसंतांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून गुरुकुंज आश्रम प्रचार विभागाचे केंद्रीय सदस्य अ‍ॅड. राजेंद्र जेनेकर, कृउबास सभापती कवडू पोटे, मारोती लोहे, प्रभाकर ढवस, शैलेश कावळे, नानाजी डोंगे, नरेंद्र मोहारे, सरपंच अर्जुन पाचपरे, किसन काळे, चंपत कावडकर, वासुदेव चटप, शेषराव बोंडे, पांडुरंग विरुटकर, गंगुबाई विरुटकर, वेकोलिचे प्रबंधक एकभरम उपस्थित होते. यावेळी अ‍ॅड. राजेंद्र जेनेकर म्हणाले, राष्ट्रसंतांचे साहित्य समाजाला प्रेरणादायी असून आपणही समाजाचे काही देणे लागते, या उदात्त हेतूने सर्वांनी राष्ट्रसंतांचे विचार तळागाळातील लोकापर्यंत पोहचविल्यासाठी प्रचार व प्रसार करण्याची विनंती त्यांनी केली. याप्रसंगी उपस्थितांनीही मार्गदर्शन केले. यावेळी दानदाते पांडुरंग विरुटकर व गंगुबाई विरुटकर यांचा अ‍ॅड. सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील मुख्य रस्त्याने ढोल-ताशांचा गजर, विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने श्री गुरुदेव सेवा मंडळ व गावकऱ्यांनी भव्य शोभायात्रा काढली.यावेळी परिसरातील श्री गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व साखरीवासीय ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन पंढरीनाथ घटे यांनी तर आभार शेषराव बोंडे यांनी मानले.