शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

नवचेतना मिशन शिक्षण क्षेत्रासाठी आदर्श

By admin | Updated: August 29, 2015 01:16 IST

शिक्षण हे माणसाचे व्यक्तिमत्व समृद्ध करण्यासाठी असते. नवचेतना मिशन प्रगतीच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल असून जिल्हा परिषदेने सुरु केलेले नवचेतना मिशन...

सुधीर मुनगंटीवार : जिल्हा परिषदेच्या नवचेतना मिशनचा प्रारंभचंद्रपूर : शिक्षण हे माणसाचे व्यक्तिमत्व समृद्ध करण्यासाठी असते. नवचेतना मिशन प्रगतीच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल असून जिल्हा परिषदेने सुरु केलेले नवचेतना मिशन राज्याच्या शिक्षण क्षेत्रासाठी आदर्श ठरेल, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. नवचेतना मिशनच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले, आमदार नाना श्यामकुळे, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, उपाध्यक्ष कल्पना बोरकर, शिक्षण सभापती देवराव भोंगळे, सरिता कुडे, अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, जिल्हा परिषद सदस्य ब्रिजभूषण पाझारे, डॉ. विजय देवतळे, विजय वानखेडे, शांताराम चौखे, शिक्षणाधिकारी संजय डोर्लिकर यावेळी उपस्थित होते.यावेळी नवचेतना मिशनचा लोगो, घडीपत्रिका व संकेतस्थळाचे लोकार्पण पालकमंत्री ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी भाषा, गणित आणि इंग्रजी या विषयावर मिशनचा फोकस असणार आहे. यासाठी शिक्षकांची थिंक टँक तयार करण्यात आली असून मराठी, इंग्रजी व गणित विषय ब्रिगेड तयार करण्यात आल्याचे सांगितले. जिल्ह्यात १५७१ शाळांमध्ये एक लाखांच्यावर विद्यार्थी आहेत. त्यांना गुणात्मक शिक्षण देण्यासाठी हे मिशन कार्य करणार आहे. या मिशन मध्ये विद्यार्थी व शिक्षकांना नवरत्न पुरस्कार देण्यात येणार आहेत. नवचेतना मिशनचा गुणवत्ता दर्शक आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा कार्यक्रम शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठी असून दोन वर्षांनंतर या कार्यक्रमाचे मूल्याकंन करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)योजना राबवा,  निधी देऊराज्य सरकार पन्नास हजार कोटीपेक्षा जास्त निधी शिक्षणक्षेत्रासाठी खर्च करते, अशी माहिती ना. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिली. राज्यातील प्रत्येक चांगली गोष्ट आपल्या जिल्ह्यात झाली पाहिजे, असा आपला मानस आहे. यासाठी जिल्हा परिषदेने चांगल्या योजना राबवाव्यात, निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन ना. मुनगंटीवार यांनी यावेळी दिले. मिशन नवचेतनामुळे शिक्षकांना अधिक मेहनत करावी लागेल, तुमचे प्रश्न प्राधान्याने सोडविले जातील. इतर जिल्ह्यातील लोक शाळा बघायला आपल्या जिल्ह्यात यावेत, असे काम करा. शिक्षण व्यवस्थेत झालेले बदल या मिशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यास या मिशनची खूप मोठी मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.