शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: ३० सप्टेंबरपर्यंत मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेणार, सरकारने लेखी दिले: मनोज जरांगे पाटील
2
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
3
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
4
८ वर्षांपूर्वी गायब झालेला 'रीलस्टार' पती, सतत शोध घेत होती पत्नी! आता समोर आलं धक्कादायक सत्य
5
शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा देणारी सरकारी योजना; EPF का ठरत आहे सरस? संपूर्ण गणित समजून घ्या
6
Video: आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती, आंदोलकांनी वाट अडवली; पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली
7
Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीला का बांधला जातो अनंताचा धागा? हे व्रत गणेशाचे नाही तर... 
8
भाक्रा धरणापासून एअरबेसपर्यंत पाकिस्तानला दिली माहिती; प्रसिद्ध युटयूबर विरोधात आरोपपत्र दाखल
9
"पूर नव्हे, हा तर देवाचा आशीर्वाद"; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी जनतेला दिला अजब सल्ला! म्हणाले...
10
'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले
11
'सरकारचा एकही प्रतिनिधी मनोज जरांगे पाटलांना भेटायला आला नाही,' रोहित पवारांची टीका
12
सेबीचा नवा नियम! F&O ट्रेडिंगमध्ये १ ऑक्टोबरपासून पोझिशन लिमिट वाढणार; लहान गुंतवणूकदारांना फायदा
13
स्वार्थी ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'नंतरही भारताची अर्थव्यवस्था 'बम-बम'! ग्रोथ पाहून पंतप्रधान मोदीही खूश; स्पष्टच बोलले...
14
“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?
15
'या' देशात भाड्याने मिळते पत्नी; लग्न करून एकत्रही राहू शकता, पण मोजावे लागतील 'इतके' पैसे!
16
"काँग्रेसच्या स्टेजवरून माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान..."; पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक
17
Ganesh Visarjan: गौरी-गणपतीच्या निरोपासाठी जय्यत तयारी
18
बुरख्यातली गर्लफ्रेंड निघाली मुलगा! एकत्र प्रवास करूनही ओळखू शकला नाही बॉयफ्रेंड; पुढचं ऐकून व्हाल हैराण
19
अवनीत कौरने विराट कोहलीच्या इंस्टाग्राम पोस्ट लाइकवर सोडलं मौन, म्हणाली - "मी कधीच विसरत नाही..."
20
"अकाली एक्झिट वगैरे शब्द...", प्रिया मराठेच्या निधनानंतर अभिजीतची भावुक पोस्ट

स्वच्छतेबाबत पुरस्कृत महापालिकेचा सार्थ अभिमान

By admin | Updated: May 29, 2017 00:29 IST

शाची सर्वप्रथम सुत्रे स्वीकारलयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारत, स्वस्थ भारत हा नारा देत संपूर्ण देशभरात स्वच्छतेविषयी क्रांती घडविली आहे.

हंसराज अहीर: महापालिकेत सत्कार व गुणगौरव सोहळाचंद्रपूर: देशाची सर्वप्रथम सुत्रे स्वीकारलयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारत, स्वस्थ भारत हा नारा देत संपूर्ण देशभरात स्वच्छतेविषयी क्रांती घडविली आहे. आज संपूर्ण देशात लोकांमध्ये स्वच्छतेविषयी जी जागरूकता व त्या दिशेने सामूहिक प्रयत्न होताना आपण बघतो, त्याला पंतप्रधानांची तळमळ आणि धडपड कारणीभूत आहे. २६ मे रोजी केंद्र सरकारने व्यक्तींचा सत्कार व चंद्रपूर शहर महानगरपालिकेला स्वच्छतेबाबत प्राप्त झालेल्या राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल गुणगौरव करण्याची संधी लाभल्याने विशेष आनंद व आत्मिय समाधान वाटते, पुरस्कृत झालेल्या महापालिकेचाही सार्थ अभिमान वाटतो, अशा शब्दात केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.चंद्रपूर शहर महानगर पालिकेच्या सभागृहामध्ये शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास आ. नाना शामकुळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समिती सभापती राहुल पावडे, माजी नगराध्यक्ष रमेश कोतपल्लीवार, गयाचरण त्रिवेदी, विजय राऊत, माजी महापौर राखी कंचर्लावार, भाजप मनपा गटनेते वसंत देशमुख, मनपा स्थायी समितीचे माजी सभापती संतोष लहामगे, राजेश मून, मनपा उपायुक्त देवळीकर उपस्थित होते.यावेळी ना. अहीर यांनी केंद्र सरकारच्या विकासाभिमुख अशा तीन वर्षाच्या सफ ल कारकीर्दीचा परामर्श घेत पंतप्रधानांच्या अविश्रांत परिश्रमातून देश घडतो आहे व देशाचे आमुलाग्र अशा विकासात परिवर्तन होत आहे. राष्ट्र हेच सर्वस्व मानून प्रधानमंत्री १८ तास या देशाच्या सेवेत घालवत असल्याने आम्हा सर्वांच्या जबाबदारीत भर पडली आहे. देशाचे नागरिक म्हणून राष्ट्रहिताशी अभिप्रेत असे कार्य आपल्या हातून घडविण्यासाठी आम्हास सिध्द व्हावे लागेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. आम्हास देश व लोकसेवेची संधी देणारेच खऱ्या अर्थाने ब्रम्हा, विष्णू, महेश आहेत. सेवकाचे काम आम्हासारख्या लोकप्रतिनिधींचे आहे, ही खुनगाठ मनाशी बांधून प्रत्येकाने आपल्या कर्तव्याला न्याय दिल्यास देशात क्रांती घडेल. गेल्या तीन वर्षात पंतप्रधानांच्या नेतृत्वात कार्य करणाऱ्या मंत्र्यांवर कोणतेही आरोप झाले नाही. याकडे लक्ष वेधत केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनी स्वच्छतेचा अर्थ केवळ स्वच्छतेशी निगडीत नसून ते स्वच्छ व पारदर्शी अशा जीवन पध्दतीलाही आहे, असे सांगितले. आज चंद्रपूर महानगरपालिकेत ज्यांच्या अविश्रांत परिश्रमाने या महानगरपालिकेला स्वच्छतेचा पुरस्कार लाभला, त्या सर्वांप्रति ऋण व्यक्त करणे हे कर्तव्य समजून आज या गुणगौरव कार्यक्रमाच्या माध्यमातून सत्कार केला जात आहे. या सत्कारातून इतरांनाही नक्कीच प्रेरणा मिळेल, असे ते म्हणाले.यावेळी आ. नाना श्यामकुळे यांनी भाजप लोकप्रतिनिधींनी विकासाच्या वाटा प्रशस्त केल्या असल्याचे सांगत वरोरा नाका पूल, महिला रूग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बाबुपेठ उड्डाणपूल, इरई खोलीकरण, अमृत योजना व नगरविकासाच्या विविध योजना भाजप लोकप्रतिनिधीच्या परिश्रमाचे फ लित आहे. भाजप नेतृत्वातील सरकारने विकासाचे स्वप्न घेवून सत्ता सांभाळली आहे व विकासातून शब्द पाळलेला आहे, असे सांगितले.महापोरांनी आपल्या कार्यकाळातील भावी योजनांची माहिती उपस्थितांना दिली.याप्रसंगी ना. हंसराज अहीर, आ. नाना श्यामकुळे यांनी माजी महापौर राखी कंचर्लावार यांचा स्वच्छतेच्या राज्य पुरस्काराबद्दल शाल, श्रीफ ळ व पुष्पगुच्छ देवून विशेष सत्कार केला. यावेळी उपमहापौर अनिल फु लझेले. राहुल पावडे, देवानंद वाढई, आशा आबोजवार, उपायुक्त देवळीकर, रवी हजारे, गर्गेलवार, रूपेश गोटे, चिंचोळकर, गजानन धकाते, संजय हजारे, कुसूम मेश्राम, सुमन मेश्राम, तारांचद चालखुरे, जया भोयर, धनंजय समर्थ, शंभूनाथ सिंह, उदय मैलारपवार, प्रदीप मडावी, महेंद्र हजारे, विजय पोतनूरवार यांचाही ना. अहीर यांच्या हस्ते भावपूर्ण सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला बहुसंख्य नगरसेवक उपस्थित होते.