शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

दीड हजार गावांना मिळणार भरीव निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 22:39 IST

जिल्ह्यातील पंधराशेहून अधिक गावांना प्रधानमंत्री क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत विविध आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी थेट निधी मिळणार आहे. हा निधी थेट ग्रामपंचायतीला मिळणार असून यासंदर्भातील प्रस्ताव सादर करावे, अशी सूचना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात शनिवारी पार पडलेल्या सरपंच मेळाव्यात ते बोलत होते.

ठळक मुद्देहंसराज अहीर : नियोजन भवनात सरपंच मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील पंधराशेहून अधिक गावांना प्रधानमंत्री क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत विविध आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी थेट निधी मिळणार आहे. हा निधी थेट ग्रामपंचायतीला मिळणार असून यासंदर्भातील प्रस्ताव सादर करावे, अशी सूचना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात शनिवारी पार पडलेल्या सरपंच मेळाव्यात ते बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आ.म.यादव, समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, अर्चना जिवतोडे, वरोरा पंचायत समिती सभापती रोहिणी देवतळे, भद्रावतीच्या सभापती विद्या कांबळे, पोंभूर्णाच्या सभापती अल्का आत्राम, गोंडपिपरीचे सभापती दीपक सातपूते, प्रवीण सुर, राजू गायकवाड, मारोती गायकवाड उपस्थित होते.केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले, केंद्र शासनाने देशातील सर्व राज्यांमधील खनिज विकास प्रतिष्ठान मार्फ त क्षेत्राचा विकास व्हावा, यासाठी योजना आखली आहे.खाणीमुळे बाधीत झालेल्या गावांमध्ये सामाजिक विकास व मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी निधीचा वापर केला जाणार आहे. नागरिकांना शाश्वत उपजीविकेचे साधन मिळावे, यासाठी निधीचा वापर करण्याचे दिशा निर्देश केंद्र शासनाने दिलेले आहे. महाराष्ट्रात चंद्रपूर हा सर्वाधिक खनिज बाधित जिल्हा आहे. त्यामुळे जादा निधी मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबतचे सादरीकरण जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. जी. डी. कामडे यांनी केले.निधीचा असा होईल विनियोगकेंद्र शासनाकडून मिळणाऱ्या निधीचा वापर गावातील शुद्ध पेयजलासाठी करावा. प्रत्येक गावाने एटीएम आरो मशीन लावावे. शाळा, ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्रातही सोलर यंत्राद्वारे शाश्वत वीजपुरवठा करावा. गावाच्या शेजारील नाल्याचे खोलीकरण करण्यासाठी निधी खर्च केला जाणार आहे. यासाठी सरपंच कृती आराखडा तयार करणार आहेत.