शहरं
Join us  
Trending Stories
1
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
2
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
3
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
4
Vijay Hazare Trophy: कॅप्टनची वैभवपेक्षा जलद सेंच्युरी! बिहारनं ५७४ धावांसह सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
5
H-1B व्हिसा आता 'मेरिट'वर! १ लाख डॉलर अतिरिक्त फी अन् पगाराची अट; पाहा काय आहे नवीन नियम
6
Eclipse 2026: २०२६ मध्ये ४ ग्रहणांची मालिका, विशेषतः होळीला चंद्रग्रहण वेधणार जगाचं लक्ष?
7
"नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?"; युती होताच भाजपाचा खोचक सवाल
8
...म्हणून उद्धव आणि राज ठाकरेंनी जागावाटप, उमेदवार याबाबत काहीच घोषणा केली नाही; कारण सांगताच सगळे हसले
9
२६ डिसेंबरपासून आणखी एका कंपनीचा IPO उघडणार; आतापासून GMP ₹१२५ वर, कोणती आहे कंपनी?
10
Shiv Sena UBT & MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
11
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
12
अतिश्रीमंतांचा 'आक्रमक' गुंतवणुकीवर भर! 'या' क्षेत्रात लावतात ७०% पैसे; सोन्याकडे मात्र पाठ
13
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
14
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
15
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
16
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
17
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
18
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
19
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
20
Vijay Hazare Trophy स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीचा धमाका! वादळी शतकासह रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

दीड हजार गावांना मिळणार भरीव निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 22:39 IST

जिल्ह्यातील पंधराशेहून अधिक गावांना प्रधानमंत्री क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत विविध आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी थेट निधी मिळणार आहे. हा निधी थेट ग्रामपंचायतीला मिळणार असून यासंदर्भातील प्रस्ताव सादर करावे, अशी सूचना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात शनिवारी पार पडलेल्या सरपंच मेळाव्यात ते बोलत होते.

ठळक मुद्देहंसराज अहीर : नियोजन भवनात सरपंच मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील पंधराशेहून अधिक गावांना प्रधानमंत्री क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत विविध आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी थेट निधी मिळणार आहे. हा निधी थेट ग्रामपंचायतीला मिळणार असून यासंदर्भातील प्रस्ताव सादर करावे, अशी सूचना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात शनिवारी पार पडलेल्या सरपंच मेळाव्यात ते बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आ.म.यादव, समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, अर्चना जिवतोडे, वरोरा पंचायत समिती सभापती रोहिणी देवतळे, भद्रावतीच्या सभापती विद्या कांबळे, पोंभूर्णाच्या सभापती अल्का आत्राम, गोंडपिपरीचे सभापती दीपक सातपूते, प्रवीण सुर, राजू गायकवाड, मारोती गायकवाड उपस्थित होते.केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले, केंद्र शासनाने देशातील सर्व राज्यांमधील खनिज विकास प्रतिष्ठान मार्फ त क्षेत्राचा विकास व्हावा, यासाठी योजना आखली आहे.खाणीमुळे बाधीत झालेल्या गावांमध्ये सामाजिक विकास व मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी निधीचा वापर केला जाणार आहे. नागरिकांना शाश्वत उपजीविकेचे साधन मिळावे, यासाठी निधीचा वापर करण्याचे दिशा निर्देश केंद्र शासनाने दिलेले आहे. महाराष्ट्रात चंद्रपूर हा सर्वाधिक खनिज बाधित जिल्हा आहे. त्यामुळे जादा निधी मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबतचे सादरीकरण जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. जी. डी. कामडे यांनी केले.निधीचा असा होईल विनियोगकेंद्र शासनाकडून मिळणाऱ्या निधीचा वापर गावातील शुद्ध पेयजलासाठी करावा. प्रत्येक गावाने एटीएम आरो मशीन लावावे. शाळा, ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्रातही सोलर यंत्राद्वारे शाश्वत वीजपुरवठा करावा. गावाच्या शेजारील नाल्याचे खोलीकरण करण्यासाठी निधी खर्च केला जाणार आहे. यासाठी सरपंच कृती आराखडा तयार करणार आहेत.