शहरं
Join us  
Trending Stories
1
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
2
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
3
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
4
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
5
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
6
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
7
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
8
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
9
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
10
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
11
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
12
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
13
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
14
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
15
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
16
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
17
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
18
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
19
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
20
'लग्न टिकवायचं असेल तर स्त्रीने नेहमीच..." शर्मिला टागोर यांनी लेक सोहाला दिला होता 'हा' सल्ला

दीड हजार गावांना मिळणार भरीव निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 22:39 IST

जिल्ह्यातील पंधराशेहून अधिक गावांना प्रधानमंत्री क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत विविध आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी थेट निधी मिळणार आहे. हा निधी थेट ग्रामपंचायतीला मिळणार असून यासंदर्भातील प्रस्ताव सादर करावे, अशी सूचना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात शनिवारी पार पडलेल्या सरपंच मेळाव्यात ते बोलत होते.

ठळक मुद्देहंसराज अहीर : नियोजन भवनात सरपंच मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील पंधराशेहून अधिक गावांना प्रधानमंत्री क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत विविध आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी थेट निधी मिळणार आहे. हा निधी थेट ग्रामपंचायतीला मिळणार असून यासंदर्भातील प्रस्ताव सादर करावे, अशी सूचना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात शनिवारी पार पडलेल्या सरपंच मेळाव्यात ते बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आ.म.यादव, समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, अर्चना जिवतोडे, वरोरा पंचायत समिती सभापती रोहिणी देवतळे, भद्रावतीच्या सभापती विद्या कांबळे, पोंभूर्णाच्या सभापती अल्का आत्राम, गोंडपिपरीचे सभापती दीपक सातपूते, प्रवीण सुर, राजू गायकवाड, मारोती गायकवाड उपस्थित होते.केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले, केंद्र शासनाने देशातील सर्व राज्यांमधील खनिज विकास प्रतिष्ठान मार्फ त क्षेत्राचा विकास व्हावा, यासाठी योजना आखली आहे.खाणीमुळे बाधीत झालेल्या गावांमध्ये सामाजिक विकास व मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी निधीचा वापर केला जाणार आहे. नागरिकांना शाश्वत उपजीविकेचे साधन मिळावे, यासाठी निधीचा वापर करण्याचे दिशा निर्देश केंद्र शासनाने दिलेले आहे. महाराष्ट्रात चंद्रपूर हा सर्वाधिक खनिज बाधित जिल्हा आहे. त्यामुळे जादा निधी मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबतचे सादरीकरण जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. जी. डी. कामडे यांनी केले.निधीचा असा होईल विनियोगकेंद्र शासनाकडून मिळणाऱ्या निधीचा वापर गावातील शुद्ध पेयजलासाठी करावा. प्रत्येक गावाने एटीएम आरो मशीन लावावे. शाळा, ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्रातही सोलर यंत्राद्वारे शाश्वत वीजपुरवठा करावा. गावाच्या शेजारील नाल्याचे खोलीकरण करण्यासाठी निधी खर्च केला जाणार आहे. यासाठी सरपंच कृती आराखडा तयार करणार आहेत.