शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

बस सुविधेअभावी शेकडो विद्यार्थ्यांची गोची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 23:51 IST

विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकारने विविध योजना सुरु केल्या आहेत.

ठळक मुद्देजिवती सीमेवरील वास्तव : शिक्षणासाठी पायी प्रवास

आॅनलाईन लोकमतजिवती : विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकारने विविध योजना सुरु केल्या आहेत. परंतु, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिवती तालुक्यातील महाराष्ट्र-तेलंगणा राज्याच्या सीमेवरील वादग्रस्त गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेर जाण्यासाठी बस उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांची गोची होत आहे.मागील अनेक वर्षांपासून तालुक्याच्या सीमेवरील १४ गावे वादग्रस्त आहेत. येथे एक ते चारपर्यंत प्राथमिक शाळा आहे. त्यामुळे पुढील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचण निर्माण होत आहे. परिणामी अनेक विद्यार्थी अनेक वर्षांपासून तेलंगणा राज्यात तेलगु शिक्षण घेत होते. मात्र मागील दोन-चार वर्षापासून हे सर्व विद्यार्थी मराठी शाळेत प्रवेश घेऊन शिक्षण घेत आहेत. त्यामुळे जिवती तालुक्यातील अनेक शाळेमध्ये तेलगू शाळेतून विद्यार्थ्यांचा प्रवाह मराठी शाळेकडे वळताना दिसून येत आहे. मात्र वाहतुकीच्या साधणांची अडचण असल्याने अनेकांना शिक्षण अर्धवट सोडावे लागत आहे.विद्यार्थ्यांसाठी शासनाने मानव विकास अंतर्गत बस सुरु केल्या. मात्र जिवती तालुक्याच्या सीमेवर १४ वादग्रस्त गावात बसेस जात नसल्यामुळे परिसरातील अनेक विद्यार्थ्यांना पायदळ शाळेत जावे लागत आहे. तर पुढील २५ किमीचे अंतर खासगी आॅटोतून जिवघेणा प्रवास करीत करावा लागत आहे. एकीकडे विद्यार्थ्यांसाठी विविध योजनांची घोषणा करायची पण ग्रामीण भागात अजूनही बहुतेक योजना पोहचल्या नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थीनामध्ये स्थगिती व गळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.