शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

शेकडो क्विंटल सोयाबीन बियाणे उगवलेच नाही

By admin | Updated: June 19, 2014 23:45 IST

मागील हंगामात सोयाबीन पीक हाती येताना अकाली पाऊस आल्याने सोयाबीनची प्रतवारी खराब झाली. त्यामुळे या हंगामात सोयाबिनचे बियाणे दुकानातून शेतकरी नेत आहे. घरी आणल्यानंतर त्या बियाणांची

वरोरा : मागील हंगामात सोयाबीन पीक हाती येताना अकाली पाऊस आल्याने सोयाबीनची प्रतवारी खराब झाली. त्यामुळे या हंगामात सोयाबिनचे बियाणे दुकानातून शेतकरी नेत आहे. घरी आणल्यानंतर त्या बियाणांची उगवण क्षमता घरीच प्रयोग करून तपासत आहेत. ७० टक्केपेक्षा कमी उगवण क्षमता असलेले शेकडो क्विंटल सोयाबीनचे बियाणे शेतकऱ्यांनी दुकानदारांना परत केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसोबतच कृषी केंद्र संचालकही धास्तावले आहेत.गतवर्षीच्या हंगामात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीनचे पीक हाती येण्यास बराच कालावधी लागला. सोयाबीन शेतात उभे असताना अकाली पाऊस झाला. त्यामुळे शेंगातील दाण्यांना अंकूर फुटले. या शेतकऱ्यांनी सोयाबीन कापून शेतात ठेवले होते. तेही पाण्यात सापडल्याने त्याची प्रतवारी घटली. चालु वर्षाच्या हंगामाकरिता सोयाबीन बियाणांची टंचाई निर्माण झाली. त्यामुळे सोयाबीन बियाणांच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. सोयाबीनचे पीक अल्पकालावधीतील आहे. त्यामुळे सोयाबीन निघाल्यावर दुसरे पीक घेता येत असल्याने शेतकरी सोयाबीनला पसंती देतात. यावर्षी सोयाबीन बियाणे बाजारात आले असले तरी, त्याच्या उगवण क्षमतेमुळे सारेच संभ्रमात पडले आहेत. त्यामुळे कृषी विभागाने जनजागृती करीत सोयाबीनची उगवण क्षमता घरीच तपासण्याचे प्रयोग शेतकऱ्यांना दाखविले. शेतकरी, सोयाबीन बियाणे कृषी केंद्रातून घेवून जात आहेत. कृषी विभागाने मार्गदर्शन केल्याप्रमाणे त्याची उगवण क्षमता घरी तपासून बघत आहे. उगवण क्षमता ७० पेक्षा कमी आहे, असे बियाणे कृषी केंद्राकडे परत देत आहे. आजपावेतो शेकडो क्विंटल सोयाबीन बियाणे उगवण क्षमतेअभावी शेतकऱ्यांनी परत केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बियाण्यांअभावी संकटात सापडल्याचे दिसून येत आहे. ज्या कृषी केंद्रातून सोयाबीन बियाणे घेतले, ते उगवण क्षमतेत अयशस्वी झाले. असे बियाणे बिल दाखविल्यास परत कृषी केंद्राने घ्यावे, असे असताना काही कृषी केंद्र संचालक घेण्यास नकार देत असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. बियाणे परत न घेणाऱ्या कृषी केंद्र संचालकावर कारवाई करणे गरजेचे झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)