शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
2
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
3
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
4
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
5
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
6
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
7
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
8
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
9
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
10
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
11
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
12
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
13
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

शेकडो क्विंटल सोयाबीन बियाणे उगवलेच नाही

By admin | Updated: June 19, 2014 23:45 IST

मागील हंगामात सोयाबीन पीक हाती येताना अकाली पाऊस आल्याने सोयाबीनची प्रतवारी खराब झाली. त्यामुळे या हंगामात सोयाबिनचे बियाणे दुकानातून शेतकरी नेत आहे. घरी आणल्यानंतर त्या बियाणांची

वरोरा : मागील हंगामात सोयाबीन पीक हाती येताना अकाली पाऊस आल्याने सोयाबीनची प्रतवारी खराब झाली. त्यामुळे या हंगामात सोयाबिनचे बियाणे दुकानातून शेतकरी नेत आहे. घरी आणल्यानंतर त्या बियाणांची उगवण क्षमता घरीच प्रयोग करून तपासत आहेत. ७० टक्केपेक्षा कमी उगवण क्षमता असलेले शेकडो क्विंटल सोयाबीनचे बियाणे शेतकऱ्यांनी दुकानदारांना परत केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसोबतच कृषी केंद्र संचालकही धास्तावले आहेत.गतवर्षीच्या हंगामात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीनचे पीक हाती येण्यास बराच कालावधी लागला. सोयाबीन शेतात उभे असताना अकाली पाऊस झाला. त्यामुळे शेंगातील दाण्यांना अंकूर फुटले. या शेतकऱ्यांनी सोयाबीन कापून शेतात ठेवले होते. तेही पाण्यात सापडल्याने त्याची प्रतवारी घटली. चालु वर्षाच्या हंगामाकरिता सोयाबीन बियाणांची टंचाई निर्माण झाली. त्यामुळे सोयाबीन बियाणांच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. सोयाबीनचे पीक अल्पकालावधीतील आहे. त्यामुळे सोयाबीन निघाल्यावर दुसरे पीक घेता येत असल्याने शेतकरी सोयाबीनला पसंती देतात. यावर्षी सोयाबीन बियाणे बाजारात आले असले तरी, त्याच्या उगवण क्षमतेमुळे सारेच संभ्रमात पडले आहेत. त्यामुळे कृषी विभागाने जनजागृती करीत सोयाबीनची उगवण क्षमता घरीच तपासण्याचे प्रयोग शेतकऱ्यांना दाखविले. शेतकरी, सोयाबीन बियाणे कृषी केंद्रातून घेवून जात आहेत. कृषी विभागाने मार्गदर्शन केल्याप्रमाणे त्याची उगवण क्षमता घरी तपासून बघत आहे. उगवण क्षमता ७० पेक्षा कमी आहे, असे बियाणे कृषी केंद्राकडे परत देत आहे. आजपावेतो शेकडो क्विंटल सोयाबीन बियाणे उगवण क्षमतेअभावी शेतकऱ्यांनी परत केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बियाण्यांअभावी संकटात सापडल्याचे दिसून येत आहे. ज्या कृषी केंद्रातून सोयाबीन बियाणे घेतले, ते उगवण क्षमतेत अयशस्वी झाले. असे बियाणे बिल दाखविल्यास परत कृषी केंद्राने घ्यावे, असे असताना काही कृषी केंद्र संचालक घेण्यास नकार देत असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. बियाणे परत न घेणाऱ्या कृषी केंद्र संचालकावर कारवाई करणे गरजेचे झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)