शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
3
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
4
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
5
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
6
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
7
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
8
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
9
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
10
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
11
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
12
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
13
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
14
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
15
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
16
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
17
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
18
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
19
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
20
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड

शेकडो क्विंटल सोयाबीन बियाणे उगवलेच नाही

By admin | Updated: June 19, 2014 23:45 IST

मागील हंगामात सोयाबीन पीक हाती येताना अकाली पाऊस आल्याने सोयाबीनची प्रतवारी खराब झाली. त्यामुळे या हंगामात सोयाबिनचे बियाणे दुकानातून शेतकरी नेत आहे. घरी आणल्यानंतर त्या बियाणांची

वरोरा : मागील हंगामात सोयाबीन पीक हाती येताना अकाली पाऊस आल्याने सोयाबीनची प्रतवारी खराब झाली. त्यामुळे या हंगामात सोयाबिनचे बियाणे दुकानातून शेतकरी नेत आहे. घरी आणल्यानंतर त्या बियाणांची उगवण क्षमता घरीच प्रयोग करून तपासत आहेत. ७० टक्केपेक्षा कमी उगवण क्षमता असलेले शेकडो क्विंटल सोयाबीनचे बियाणे शेतकऱ्यांनी दुकानदारांना परत केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसोबतच कृषी केंद्र संचालकही धास्तावले आहेत.गतवर्षीच्या हंगामात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीनचे पीक हाती येण्यास बराच कालावधी लागला. सोयाबीन शेतात उभे असताना अकाली पाऊस झाला. त्यामुळे शेंगातील दाण्यांना अंकूर फुटले. या शेतकऱ्यांनी सोयाबीन कापून शेतात ठेवले होते. तेही पाण्यात सापडल्याने त्याची प्रतवारी घटली. चालु वर्षाच्या हंगामाकरिता सोयाबीन बियाणांची टंचाई निर्माण झाली. त्यामुळे सोयाबीन बियाणांच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. सोयाबीनचे पीक अल्पकालावधीतील आहे. त्यामुळे सोयाबीन निघाल्यावर दुसरे पीक घेता येत असल्याने शेतकरी सोयाबीनला पसंती देतात. यावर्षी सोयाबीन बियाणे बाजारात आले असले तरी, त्याच्या उगवण क्षमतेमुळे सारेच संभ्रमात पडले आहेत. त्यामुळे कृषी विभागाने जनजागृती करीत सोयाबीनची उगवण क्षमता घरीच तपासण्याचे प्रयोग शेतकऱ्यांना दाखविले. शेतकरी, सोयाबीन बियाणे कृषी केंद्रातून घेवून जात आहेत. कृषी विभागाने मार्गदर्शन केल्याप्रमाणे त्याची उगवण क्षमता घरी तपासून बघत आहे. उगवण क्षमता ७० पेक्षा कमी आहे, असे बियाणे कृषी केंद्राकडे परत देत आहे. आजपावेतो शेकडो क्विंटल सोयाबीन बियाणे उगवण क्षमतेअभावी शेतकऱ्यांनी परत केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बियाण्यांअभावी संकटात सापडल्याचे दिसून येत आहे. ज्या कृषी केंद्रातून सोयाबीन बियाणे घेतले, ते उगवण क्षमतेत अयशस्वी झाले. असे बियाणे बिल दाखविल्यास परत कृषी केंद्राने घ्यावे, असे असताना काही कृषी केंद्र संचालक घेण्यास नकार देत असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. बियाणे परत न घेणाऱ्या कृषी केंद्र संचालकावर कारवाई करणे गरजेचे झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)