शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
4
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
5
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
6
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
7
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
8
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
11
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
12
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
13
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
14
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
15
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
16
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
17
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
18
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
19
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
20
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?

गरिबांचे शेकडो टन धान्य पावसात भिजले

By admin | Updated: June 19, 2014 00:00 IST

सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून गोरगरिबांना स्वस्त धान्य दुकानातून वितरित केले जाणारे काल मंगळवारपासून येथील रेल्वे रॅक पार्इंटवर पावसात भिजून ओलेचिंब झाले आहेत.

जमिनीवर उतरविले धान्य: कंत्राटी कंपनीचा संतापजनक प्रतापचंद्रपूर: सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून गोरगरिबांना स्वस्त धान्य दुकानातून वितरित केले जाणारे काल मंगळवारपासून येथील रेल्वे रॅक पार्इंटवर पावसात भिजून ओलेचिंब झाले आहेत. काही धान्य तर चिखलात मिसळून खराब झाले. हा प्रकार आज बुधवारी सकाळी उजेडात आला. या संतापजनक प्रकाराला वखार महामंडळ व संबंधित कंत्राटदारच जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून जिल्हाभर स्वस्त धान्य दुकानातून गहू, तांदूळ, साखर हे धान्य वाटप केले जाते. विविध राज्यातून हे धान्य रेल्वेच्या माध्यमातून आणले जातात. रेल्वे रॅक पार्इंटवर हा माल उतरवून तो तात्काळ ट्रकमध्ये लोड केला जातो व ट्रकद्वारे पडोली येथील शासकीय गोदामात साठविला जातो. यासाठी प्रशासनाकडून कंत्राट दिले जाते. मात्र कंत्राटदारांकडे धान्य नेण्यासाठी ट्रकसारखे मोठे वाहन असणे बंधनकारक असते. रेल्वे रॅक पार्इंटवरून धान्य लोड करण्याचे कंत्राट सध्या एस.के. ट्रान्सलाईन या जळगाव येथील कंपनीला दिले आहे. या कंपनीने जळगाव येथील ट्रकचे क्रमांक देऊन हे कंत्राट मिळवून घेतले. वास्तविक या कंपनीकडे ट्रक फारच कमी असल्याची माहिती आहे.काल मंगळवारी मध्यप्रदेशातून सुमारे ९०० टन गहू रेल्वेने येथील रेल्वे रॅक पार्इंटवर आणण्यात आला. रेल्वेने हे धान्य आल्यानंतर नऊ तासात ते ट्रकमध्ये लोड करावे लागतात. मात्र संबंधित कंत्राटदारांनी हा ९०० टन गहू काल येथील रेल्वे पार्इंटवर जमिनीवरच उतरविला. वास्तविक काल सकाळपासूनच पाऊस येण्याचा अंदाज वर्तविला जात होता. शिवाय पावसाळ्याचेही दिवस सुरू आहेत. असे असतानाही एस.के. ट्रान्सलाईन या कंत्राटी कंपनीने हा माल जमिनीवर डॅम्प केला. अपेक्षेप्रमाणे काल सायंकाळी दमदार पाऊस झाला. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता. त्यामुळे ९०० टनपैकी शेकडो टन धान्य या पावसात भिजत राहिले. वास्तविक या रेल्वे रॅक पार्इंटवर धान्य येणे, हे धान्य सुखरुप शासकीय गोदाम पोहचविणे, ही जबाबदारी वखार महामंडळाची असते. याचे कंत्राट दिले असले तरी त्यावर देखरख वखार महामंडळच ठेवते. पावसाचा अंदाज असताना वखार महामंडळाने एवढे मोठे धान्य जमिनीवर उतरविण्याची परवानगी कशी काय दिली, याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी पार्इंटवरील याच जमिनीवर रासायनिक खते उतरविली होती. तिथेच गहू उतरविला. जिथे गहू पडून होता तिथे पाणी साचून होते. हाच गहू बाहेर काढून वाळवून पुन्हा तो गरिबांच्या माथी मारला जाणार असल्याची माहिती आहे. (शहर प्रतिनिधी)