शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
3
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
4
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
5
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
6
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
7
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
8
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
9
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
10
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
11
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
12
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
13
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
14
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
15
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
16
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
17
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
18
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
19
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
20
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र

गरिबांचे शेकडो टन धान्य पावसात भिजले

By admin | Updated: June 19, 2014 00:00 IST

सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून गोरगरिबांना स्वस्त धान्य दुकानातून वितरित केले जाणारे काल मंगळवारपासून येथील रेल्वे रॅक पार्इंटवर पावसात भिजून ओलेचिंब झाले आहेत.

जमिनीवर उतरविले धान्य: कंत्राटी कंपनीचा संतापजनक प्रतापचंद्रपूर: सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून गोरगरिबांना स्वस्त धान्य दुकानातून वितरित केले जाणारे काल मंगळवारपासून येथील रेल्वे रॅक पार्इंटवर पावसात भिजून ओलेचिंब झाले आहेत. काही धान्य तर चिखलात मिसळून खराब झाले. हा प्रकार आज बुधवारी सकाळी उजेडात आला. या संतापजनक प्रकाराला वखार महामंडळ व संबंधित कंत्राटदारच जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून जिल्हाभर स्वस्त धान्य दुकानातून गहू, तांदूळ, साखर हे धान्य वाटप केले जाते. विविध राज्यातून हे धान्य रेल्वेच्या माध्यमातून आणले जातात. रेल्वे रॅक पार्इंटवर हा माल उतरवून तो तात्काळ ट्रकमध्ये लोड केला जातो व ट्रकद्वारे पडोली येथील शासकीय गोदामात साठविला जातो. यासाठी प्रशासनाकडून कंत्राट दिले जाते. मात्र कंत्राटदारांकडे धान्य नेण्यासाठी ट्रकसारखे मोठे वाहन असणे बंधनकारक असते. रेल्वे रॅक पार्इंटवरून धान्य लोड करण्याचे कंत्राट सध्या एस.के. ट्रान्सलाईन या जळगाव येथील कंपनीला दिले आहे. या कंपनीने जळगाव येथील ट्रकचे क्रमांक देऊन हे कंत्राट मिळवून घेतले. वास्तविक या कंपनीकडे ट्रक फारच कमी असल्याची माहिती आहे.काल मंगळवारी मध्यप्रदेशातून सुमारे ९०० टन गहू रेल्वेने येथील रेल्वे रॅक पार्इंटवर आणण्यात आला. रेल्वेने हे धान्य आल्यानंतर नऊ तासात ते ट्रकमध्ये लोड करावे लागतात. मात्र संबंधित कंत्राटदारांनी हा ९०० टन गहू काल येथील रेल्वे पार्इंटवर जमिनीवरच उतरविला. वास्तविक काल सकाळपासूनच पाऊस येण्याचा अंदाज वर्तविला जात होता. शिवाय पावसाळ्याचेही दिवस सुरू आहेत. असे असतानाही एस.के. ट्रान्सलाईन या कंत्राटी कंपनीने हा माल जमिनीवर डॅम्प केला. अपेक्षेप्रमाणे काल सायंकाळी दमदार पाऊस झाला. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता. त्यामुळे ९०० टनपैकी शेकडो टन धान्य या पावसात भिजत राहिले. वास्तविक या रेल्वे रॅक पार्इंटवर धान्य येणे, हे धान्य सुखरुप शासकीय गोदाम पोहचविणे, ही जबाबदारी वखार महामंडळाची असते. याचे कंत्राट दिले असले तरी त्यावर देखरख वखार महामंडळच ठेवते. पावसाचा अंदाज असताना वखार महामंडळाने एवढे मोठे धान्य जमिनीवर उतरविण्याची परवानगी कशी काय दिली, याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी पार्इंटवरील याच जमिनीवर रासायनिक खते उतरविली होती. तिथेच गहू उतरविला. जिथे गहू पडून होता तिथे पाणी साचून होते. हाच गहू बाहेर काढून वाळवून पुन्हा तो गरिबांच्या माथी मारला जाणार असल्याची माहिती आहे. (शहर प्रतिनिधी)