शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

गरिबांचे शेकडो टन धान्य पावसात भिजले

By admin | Updated: June 19, 2014 00:00 IST

सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून गोरगरिबांना स्वस्त धान्य दुकानातून वितरित केले जाणारे काल मंगळवारपासून येथील रेल्वे रॅक पार्इंटवर पावसात भिजून ओलेचिंब झाले आहेत.

जमिनीवर उतरविले धान्य: कंत्राटी कंपनीचा संतापजनक प्रतापचंद्रपूर: सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून गोरगरिबांना स्वस्त धान्य दुकानातून वितरित केले जाणारे काल मंगळवारपासून येथील रेल्वे रॅक पार्इंटवर पावसात भिजून ओलेचिंब झाले आहेत. काही धान्य तर चिखलात मिसळून खराब झाले. हा प्रकार आज बुधवारी सकाळी उजेडात आला. या संतापजनक प्रकाराला वखार महामंडळ व संबंधित कंत्राटदारच जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून जिल्हाभर स्वस्त धान्य दुकानातून गहू, तांदूळ, साखर हे धान्य वाटप केले जाते. विविध राज्यातून हे धान्य रेल्वेच्या माध्यमातून आणले जातात. रेल्वे रॅक पार्इंटवर हा माल उतरवून तो तात्काळ ट्रकमध्ये लोड केला जातो व ट्रकद्वारे पडोली येथील शासकीय गोदामात साठविला जातो. यासाठी प्रशासनाकडून कंत्राट दिले जाते. मात्र कंत्राटदारांकडे धान्य नेण्यासाठी ट्रकसारखे मोठे वाहन असणे बंधनकारक असते. रेल्वे रॅक पार्इंटवरून धान्य लोड करण्याचे कंत्राट सध्या एस.के. ट्रान्सलाईन या जळगाव येथील कंपनीला दिले आहे. या कंपनीने जळगाव येथील ट्रकचे क्रमांक देऊन हे कंत्राट मिळवून घेतले. वास्तविक या कंपनीकडे ट्रक फारच कमी असल्याची माहिती आहे.काल मंगळवारी मध्यप्रदेशातून सुमारे ९०० टन गहू रेल्वेने येथील रेल्वे रॅक पार्इंटवर आणण्यात आला. रेल्वेने हे धान्य आल्यानंतर नऊ तासात ते ट्रकमध्ये लोड करावे लागतात. मात्र संबंधित कंत्राटदारांनी हा ९०० टन गहू काल येथील रेल्वे पार्इंटवर जमिनीवरच उतरविला. वास्तविक काल सकाळपासूनच पाऊस येण्याचा अंदाज वर्तविला जात होता. शिवाय पावसाळ्याचेही दिवस सुरू आहेत. असे असतानाही एस.के. ट्रान्सलाईन या कंत्राटी कंपनीने हा माल जमिनीवर डॅम्प केला. अपेक्षेप्रमाणे काल सायंकाळी दमदार पाऊस झाला. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता. त्यामुळे ९०० टनपैकी शेकडो टन धान्य या पावसात भिजत राहिले. वास्तविक या रेल्वे रॅक पार्इंटवर धान्य येणे, हे धान्य सुखरुप शासकीय गोदाम पोहचविणे, ही जबाबदारी वखार महामंडळाची असते. याचे कंत्राट दिले असले तरी त्यावर देखरख वखार महामंडळच ठेवते. पावसाचा अंदाज असताना वखार महामंडळाने एवढे मोठे धान्य जमिनीवर उतरविण्याची परवानगी कशी काय दिली, याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी पार्इंटवरील याच जमिनीवर रासायनिक खते उतरविली होती. तिथेच गहू उतरविला. जिथे गहू पडून होता तिथे पाणी साचून होते. हाच गहू बाहेर काढून वाळवून पुन्हा तो गरिबांच्या माथी मारला जाणार असल्याची माहिती आहे. (शहर प्रतिनिधी)