शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

तेंदूपत्ता लिलावाअभावी शेकडो मजुरांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 23:24 IST

कोठारी वनपरिक्षेत्रातील तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी कंत्राटदारांनी लिलावाकडे पाठ फिरविली. त्यामुळे आठ गावात रोजागराची समस्या निर्माण होवून गोरगरीब मजुरांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देकंत्राटदारांनी फि रविली पाठ : दहा गावांमध्ये प्रक्रिया ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्ककोठारी : कोठारी वनपरिक्षेत्रातील तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी कंत्राटदारांनी लिलावाकडे पाठ फिरविली. त्यामुळे आठ गावात रोजागराची समस्या निर्माण होवून गोरगरीब मजुरांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.दरवर्षी प्रमाणे तेंदूपत्ता हंगाम सुरु होणार, या आशेने कोठारी परिसरातील गोरगरीब जनता वाट पाहात होती. कोठारी वन परिक्षेत्रात येणाऱ्या युनिट शेजारी आक्सापूर केमारा, तोहोगाव आणि बल्लारपूर युनिटमध्ये तेंदूपाने संकलन केंद्र सुरु झाले. मात्र, कोठारी आणि परिसरातील आठ गावांत तेंदुपत्ता संकलनाचे काम सुरू झाले नाही. यावर्षी कोठारी युनिट लिलावात खरेदी करण्याच्या निविदा कंत्राटदारांनी भरल्या. परंतु, मात्र युनिटची किंमत अल्प असल्याने शासनाने निविदा मंजूर केली नाही, अशी माहिती पुढे आली. रोजगार देणारा हा हंगाम सुरूच न झाल्याने यावर्षी शेकडो मजुरांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.तेंदूपत्ता संकलन हंगाम १५ दिवसांचा असतो. सर्वसामान्य जनतेला आधार देणारा हा हंगाम रोजगार केव्हा सुरू होणार, असा प्रश्न विचारत आहेत. कंत्राटदारांनी लिलावाकडे पाठ फिरविल्याने जनतेचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. शेतीचा हंगाम पूर्ण करण्यासाठी यातून अनेक आर्थिक लाभ मिळत होता. पण, हाताला कामच नसल्याने अल्पभूधारक शेतकºयांनी चिंता व्यक्त केली. तेंदूपत्ता संकलन सुरू केल्याने मजुरांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल. या परिसरातील शेतीची कामे थंडबस्त्यात आहेत. रोजगाराची दुसरी साधने नाहीत. रोजगाराची समस्या लक्षात घेऊन वन विभागाने कोठारी युनिटमधील आठही गावांत संकलन सुरू करावी, अशी मागणी आहे.वन विभागाने तोडगा काढावातेंदुपत्ता संकलन केंद्र सुरू न झाल्याने कोठारी वन परिक्षेत्रातील सर्वसामान्य नागरिकांच्या हाताला सध्या कोणतीही कामे नाहीत. या परिसरातील जनता प्रामुख्याने नैसर्गिक साधनसंपत्तीवर अवलंबून आहे. पारंपरिक शेती करणाºयांचे प्रमाण अधिक असल्याने आर्थिक परिस्थिती अजुनही बदलली नाही. त्यामुळे हंगामी रोजगाराकडे हजारो मजूर आशावादी नजरेने बघतात. परंतु, हक्काचा रोजगार देणारा तेंदुपत्ता हंगाम अद्याप सुरू करण्यात आला नाही. वन विभागाने या समस्येवर तातडीने तोडगा काढावी, अशी केली जात आहे.