शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
3
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
4
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
8
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
9
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
10
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
11
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
12
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
13
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
14
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
20
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

बल्लारपूर तालुक्यात अतिवृष्टीने शेकडो घरांची पडझड

By admin | Updated: July 13, 2016 01:59 IST

मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने जनजीवनावर चांगलाच परिणाम केला.

चार कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविले : विसापूर, कळमना, कोठारीत जास्त नुकसान बल्लारपूर : मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने जनजीवनावर चांगलाच परिणाम केला. अतिवृष्टीने पळसगाव येथील दोन कुटुंबाचे, कोठारी येथील एकाचे तर विसापूर येथे एका कुटुंबाचे घरे जमीनदोस्त झाल्याने स्थानिक व तहसील प्रशासनाने सुरक्षितस्थळी तात्पुरता निवारा दिला आहे. बल्लारपूर शहरासह ग्रामीण भागात १०० वर घरांची पडझड झाली असून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बल्लारपूर शहरात विविध वॉर्डात १५ ते २० घरांची पडझड झाली असून दोन घरे पूर्णता पडली आहेत. पळसगाव येथील संतोष घोडे व झिंगुबाई घोडे यांचे घर पडल्याने दोन्ही कुटुंबाना गावातील समाज मंंदिरात निवारा देण्यात आला. विसापूर येथील रविंद्र कष्टी व भाऊजी कष्टी यांचे घरे पडली असून शेजाऱ्यांच्या घरी आसरा घेतल्याची माहिती आहे. कोठारी येथील एका कुटुंबाला निसर्गाने निवारा हिरावल्याने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. विसापूर, चुनाभट्टी येथील नागरिकांचे २० ते २५ घरे अशंंता पडल्याने नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. कळमना, कोठारी, नांदगाव (पोडे), किन्ही, कोर्टीमक्ता, बामणी (दुधोली), पळसगाव, गिलबिली, मानोरा आदी गावातील १०० वर घरांची पडझड झाली आहे. मंगळवारी पावसाने विश्रांती घेतल्याने तहसीलदार विकास अहीर यांनी तलाठी विनोद गणफाडे, आर.जी. चव्हाण, शंकर खरुले, शकुंतला कोडापे यांच्यासह पंचायत समितीचे अभियंता श्रीवास्त, नगर पालिकेचे अभियंता यांना पडझड झालेल्या घरांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत, असे तहसीलदार विकास अहीर यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी) चारगाव व हडस्तीचा संपर्क तुटला वर्धा नदीचा जलस्तर वाढल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी इरई नदीवरील चारवट व हडस्ती गावाकडे जाणाऱ्या पुलावर पाच ते सहा फुट पाणी असल्याने बल्लारपूर तालुक्याशी मंगळवारी सकाळपासून संपर्क तुटला. विसापूर, नांदगाव (पोडे), चारवट, हडस्ती व बल्लारपूर येथील शेती पुराच्या पाण्याखाली आली आहे. अशीच स्थिती वर्धा नदीच्या काठावरील दहेली, लावारी, कळमना, आमडी, कोठारी, पळसगाव येथे निर्माण झाली आहे. हजारो हेक्टरवरील पीक पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.