शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

बल्लारपूर तालुक्यात अतिवृष्टीने शेकडो घरांची पडझड

By admin | Updated: July 13, 2016 01:59 IST

मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने जनजीवनावर चांगलाच परिणाम केला.

चार कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविले : विसापूर, कळमना, कोठारीत जास्त नुकसान बल्लारपूर : मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने जनजीवनावर चांगलाच परिणाम केला. अतिवृष्टीने पळसगाव येथील दोन कुटुंबाचे, कोठारी येथील एकाचे तर विसापूर येथे एका कुटुंबाचे घरे जमीनदोस्त झाल्याने स्थानिक व तहसील प्रशासनाने सुरक्षितस्थळी तात्पुरता निवारा दिला आहे. बल्लारपूर शहरासह ग्रामीण भागात १०० वर घरांची पडझड झाली असून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बल्लारपूर शहरात विविध वॉर्डात १५ ते २० घरांची पडझड झाली असून दोन घरे पूर्णता पडली आहेत. पळसगाव येथील संतोष घोडे व झिंगुबाई घोडे यांचे घर पडल्याने दोन्ही कुटुंबाना गावातील समाज मंंदिरात निवारा देण्यात आला. विसापूर येथील रविंद्र कष्टी व भाऊजी कष्टी यांचे घरे पडली असून शेजाऱ्यांच्या घरी आसरा घेतल्याची माहिती आहे. कोठारी येथील एका कुटुंबाला निसर्गाने निवारा हिरावल्याने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. विसापूर, चुनाभट्टी येथील नागरिकांचे २० ते २५ घरे अशंंता पडल्याने नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. कळमना, कोठारी, नांदगाव (पोडे), किन्ही, कोर्टीमक्ता, बामणी (दुधोली), पळसगाव, गिलबिली, मानोरा आदी गावातील १०० वर घरांची पडझड झाली आहे. मंगळवारी पावसाने विश्रांती घेतल्याने तहसीलदार विकास अहीर यांनी तलाठी विनोद गणफाडे, आर.जी. चव्हाण, शंकर खरुले, शकुंतला कोडापे यांच्यासह पंचायत समितीचे अभियंता श्रीवास्त, नगर पालिकेचे अभियंता यांना पडझड झालेल्या घरांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत, असे तहसीलदार विकास अहीर यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी) चारगाव व हडस्तीचा संपर्क तुटला वर्धा नदीचा जलस्तर वाढल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी इरई नदीवरील चारवट व हडस्ती गावाकडे जाणाऱ्या पुलावर पाच ते सहा फुट पाणी असल्याने बल्लारपूर तालुक्याशी मंगळवारी सकाळपासून संपर्क तुटला. विसापूर, नांदगाव (पोडे), चारवट, हडस्ती व बल्लारपूर येथील शेती पुराच्या पाण्याखाली आली आहे. अशीच स्थिती वर्धा नदीच्या काठावरील दहेली, लावारी, कळमना, आमडी, कोठारी, पळसगाव येथे निर्माण झाली आहे. हजारो हेक्टरवरील पीक पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.