शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
5
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
6
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
7
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
8
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
9
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
10
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
11
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
12
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
13
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
14
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
15
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
16
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
17
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
18
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
19
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
20
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल

बल्लारपूर तालुक्यात अतिवृष्टीने शेकडो घरांची पडझड

By admin | Updated: July 13, 2016 01:59 IST

मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने जनजीवनावर चांगलाच परिणाम केला.

चार कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविले : विसापूर, कळमना, कोठारीत जास्त नुकसान बल्लारपूर : मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने जनजीवनावर चांगलाच परिणाम केला. अतिवृष्टीने पळसगाव येथील दोन कुटुंबाचे, कोठारी येथील एकाचे तर विसापूर येथे एका कुटुंबाचे घरे जमीनदोस्त झाल्याने स्थानिक व तहसील प्रशासनाने सुरक्षितस्थळी तात्पुरता निवारा दिला आहे. बल्लारपूर शहरासह ग्रामीण भागात १०० वर घरांची पडझड झाली असून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बल्लारपूर शहरात विविध वॉर्डात १५ ते २० घरांची पडझड झाली असून दोन घरे पूर्णता पडली आहेत. पळसगाव येथील संतोष घोडे व झिंगुबाई घोडे यांचे घर पडल्याने दोन्ही कुटुंबाना गावातील समाज मंंदिरात निवारा देण्यात आला. विसापूर येथील रविंद्र कष्टी व भाऊजी कष्टी यांचे घरे पडली असून शेजाऱ्यांच्या घरी आसरा घेतल्याची माहिती आहे. कोठारी येथील एका कुटुंबाला निसर्गाने निवारा हिरावल्याने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. विसापूर, चुनाभट्टी येथील नागरिकांचे २० ते २५ घरे अशंंता पडल्याने नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. कळमना, कोठारी, नांदगाव (पोडे), किन्ही, कोर्टीमक्ता, बामणी (दुधोली), पळसगाव, गिलबिली, मानोरा आदी गावातील १०० वर घरांची पडझड झाली आहे. मंगळवारी पावसाने विश्रांती घेतल्याने तहसीलदार विकास अहीर यांनी तलाठी विनोद गणफाडे, आर.जी. चव्हाण, शंकर खरुले, शकुंतला कोडापे यांच्यासह पंचायत समितीचे अभियंता श्रीवास्त, नगर पालिकेचे अभियंता यांना पडझड झालेल्या घरांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत, असे तहसीलदार विकास अहीर यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी) चारगाव व हडस्तीचा संपर्क तुटला वर्धा नदीचा जलस्तर वाढल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी इरई नदीवरील चारवट व हडस्ती गावाकडे जाणाऱ्या पुलावर पाच ते सहा फुट पाणी असल्याने बल्लारपूर तालुक्याशी मंगळवारी सकाळपासून संपर्क तुटला. विसापूर, नांदगाव (पोडे), चारवट, हडस्ती व बल्लारपूर येथील शेती पुराच्या पाण्याखाली आली आहे. अशीच स्थिती वर्धा नदीच्या काठावरील दहेली, लावारी, कळमना, आमडी, कोठारी, पळसगाव येथे निर्माण झाली आहे. हजारो हेक्टरवरील पीक पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.