शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
2
अंजली दमानियांकडून राजीनाम्याची मागणी; मला योग्य वाटेल ते मी करेन, अजित पवारांची प्रतिक्रिया
3
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
4
डरानेवालो को डराओ! 'शिवतीर्थ'समोर बॅनरबाजी; उत्तर भारतीय सेनेने मनसे प्रमुख राज ठाकरेंना डिवचलं
5
KL Rahul: द.आफ्रिकेविरुद्ध केएल राहुल इतिहास रचणार? मोठ्या विक्रमापासून फक्त १५ धावा दूर!
6
पार्थ पवारांच्या कंपनीकडून आणखी एक फसवणूक; जमीन खरेदीचा १४७ कोटींचा नजराणाही बुडवला
7
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
8
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
9
Share Market Today: Nifty ची सुस्त सुरुवात, सेन्सेक्सच्या ३ दिवसांच्या तेजीवर ब्रेक; IT शेअर्स धडाम
10
दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
11
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
12
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
13
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
14
'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
15
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
16
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
17
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
18
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
19
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
20
Dharmendra Health Update : "आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."

शेकडो हेक्टर शेती पुराच्या पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 22:55 IST

मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतेक भागात मुसळधार पाऊस पडल्याने शेकडो हेक्टर शेती पुराच्या पाण्याखाली आली आहे. पुरामुळे कापूस व सोयाबीन पिकावर अनिष्ठ परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला आहे. शुक्रवारी कोरपना तालुक्यातील अंतरगावला पुराने वेढा घातला. तर वर्धा नदीला पूर आल्याने दुपारी २ वाजताच्या सुमारास बल्लारपूर-राजुरा हा मार्ग बंद करण्यात आला.

ठळक मुद्देवर्धा नदीला पूर : वाहून गेलेल्या इसमाचा मृतदेह आढळला, बल्लारपूर-राजुरा मार्ग बंद

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतेक भागात मुसळधार पाऊस पडल्याने शेकडो हेक्टर शेती पुराच्या पाण्याखाली आली आहे. पुरामुळे कापूस व सोयाबीन पिकावर अनिष्ठ परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला आहे. शुक्रवारी कोरपना तालुक्यातील अंतरगावला पुराने वेढा घातला. तर वर्धा नदीला पूर आल्याने दुपारी २ वाजताच्या सुमारास बल्लारपूर-राजुरा हा मार्ग बंद करण्यात आला. शुक्रवारी दिवसभर रिपरिप सुरूच होती. सावली तालुक्यातील भान्सी येथील यशवंत कुमरे (५५) हा शेतकरी गुरुवारी सायंकाळी बैल धुताना नाल्याच्या पुरात वाहून गेला होता. शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळला.वर्धा नदीतील पुराचे पाणी बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव, आमडी, कळमना, बामणी, कुडेसावली, परसोडी, पाचगाव, तोहोगाव, वेजगाव, लाठी या गावांच्या शेतात शिरले. परिणामी शेकडो हेक्टर पीक पाण्याखाली आले आहे. कन्हाळगाव, चनई, धानोली, परसोडा, कारगाव, मांडवा, येरगव्हान, पिपरी, माथा, शेरज, हेटी व कोडसी येथील शेती पुराच्या पाण्यात बुडाली आहे. दोन दिवसांपासून परिसरात संततधार पाऊस पडत असल्याने कोरपना तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अंतरगावाला पुराने वेढा घातला असून सर्वच मार्ग बंद झालेत. कन्हाळगाव, चनई, धानोली, परसोडा, कारगाव, मांडवा, येरगव्हान, पिपरी, माथा, शेरज, हेटी, कोडसी गावालगतच्या शिवारातील पिके पूर्णत: बुडली आहेत. नाल्याचे पाणी अंतररगाव, नांदा, राजुरगुडा, सांगोडा येथ शिरल्याने शेती जलमय झाली आहे.अंतरगाव येथे जाण्याचा रस्ता बंद झाला. शिवाय कोरपना-अंतररगाव-भोयगाव, राजुरगुडा, वलालगुडा मार्गही बंद झाला आहे. गुरुवारी पहाटे बंद झालेले राजूरा-आदिलाबाद, परसोडा, कन्हाळगाव, मांडवा, जिवती मार्ग आज दुपारी सुरू झाला आहे. आसन येथील जिल्हा परिषद शाळेत शिरलेले पाणी ओसरले आहे. दरम्यान शुक्रवारी दिवसभर या परिसरात पावसाची रिपरिप सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले. शेतीचे साहित्य वाहून गेले. पुरामुळे वैनगंगा आणि वर्धा नदीच्या जलस्तरात मोठी वाढ झाली आहे. उमानदीला पूर आल्याने सिंदेवाही तालुक्यातील कळमना, विसापूर, कुकडहेटी, मोहाडी, नलेश्वर, चारगाव, बामणी, गोंड मोहाडी, पांगळी, विसापूर या गावांचा गुरूवारी तालुक्याशी संपर्क काही काळाकरिता तुटला होता.कापूस, सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसानकोठारी : आठ दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने कोठारी परिसरातील नाल्याला पूर आला. दोन दिवसांपासून हजारोे हेक्टरवरील पीक पूराच्या पाण्याखाली आहे. कापूस, सोयाबीन, तूर, मिरची पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत. कोठारी, पळसगाव , आमडी, कळमना, काटवली, बामणी, कुडेसावली, परसोडी, पाचगाव, तोहोगाव, वेजगाव, लाठी येथील पिकांना मोठा फ टका बसला. मागील पंधरा दिवसांपासून शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत होते. पाऊस आला नसता तर पिकांचे नुकसान होईल, अशी धास्ती होती. दरम्यान पावसाचे पुनरागमन आता शाप ठरल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत. वर्धा नदीचे पाणी उलट प्रवाहाने नाल्याद्वारे शेतात शिरत आहे. त्यामुळे हजारो हेक्टरवरील पीक कुजण्याचा धोका निर्माण झाला. पुराच्या पाण्यामुळे उत्पादन घटणार असून शेतकरी हतबल झाले आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादन घेतल्या जाते. भाजीपाला शेतीत पूराचे पाणी गेले. त्यामुळे भाजीपाल्याची शेती उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आली आहे.पुलाअभावी ‘त्या’ दहा गावांचे हालवासेरा : सिंदेवाही तालुक्यातील उमा नदी पुलावरुन गुरूवारी पाणी वाहत असल्याने तब्बल १२ तास वाहतूक बंद होती. परिसरातील १० गावांचा संपर्क सिंदेवाही शहराचा संपर्क तुटला होता. पुरामुळे उमा नदीवरील कळमगाव (गन्ना) गावाजवळील पुलावरुन पाणी वाहू लागले. कळमगाव, नलेश्वर, मोहाडी, कुकडहेटी, विसापूर, चारगाव, बाम्हणी, मोहबोडी, इटोली या गावातील लोकांना सदर पुलावरुन ये-जा करावी लागते. गुरूवारी सदर गावातील नागरिक सिंदेवाही शहरात जावू शकले नाहीत. या नदीवरील पूल कमी उंचीचा असल्याने नागरिकांना दरवर्षी त्रास होतो. परिसरातील शेतकऱ्यांनी यासंदर्भात तक्रार वारंवार प्रशासनाकडे निवेदन दिले. परंतु या समस्येकडे लक्ष दिले नाही. कळमगाव, विसापूर, कुकडहेटी, मोहाडी, नलेश्वर आदी दहा गावांतील नागरिकांना पाणी पुलावरून असल्यास वासेरामार्गे २५ किमी अंतराचा प्रवास करावा लागतो. गुरुवारी पुलावरुन पाणी असल्याने परिसरातील जनजीवन विस्कडीत झाले होते. शाळा बसेस बंद होत्या. तर शाळेत मुले जावू शकले नाही. सिंदेवाही-कळमगाव रस्त्यावरील उमा नदीवरील पुल मोठा तयार करण्याची मागणी कळमगाव परिसरातील जनतेकडून करण्यात येत आहे.धानोरा- गडचांदूर मार्ग बंदघुग्घुस : तीन दिवसांपासुन सुरू असलेल्या पावसामुळे वर्धा पैनगंगा नदी दुथडी वाहत आहे. गुरूवारी सकाळपासून वर्धा नदीवरील धानोरा पुलावरून पाणी वाहत असल्याने गडचांदूर मार्ग बंद झाला आहे. पावसामुळे वेकोलि प्रशासनाने खुल्या खाणीतील खनन बंद केले. धानोरा येथील पावसामुळे एक घर कोसळल्याची घटना घडली.तोहोगाव परिसरातील दहा गावे प्रभाविततोहोगाव : कोठारी- तोहोगाव- लाठी या मार्गावरील दहा गावे बाधित झाली आहे. शेकडो हेक्टरवरील सोयाबिन, कापूस बियाणाचे अतोनात नुकसान झाले आहे. सोयाबिन पीक फुलोºयावर असून पुरामुळे सोयाबिन सडून जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ऐन तोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास या पुराने हिरावला आहे. पदराचे पैसे खर्च करुन सोयाबिन, कापूस, धान पीक शेतात लावले. त्याला खत पाणी घातले व निंदण फवारणी करुन हातचे पैसे पिकावर खर्च केले. परंतु तेच पीक पुरामुळे वाहून जाणार असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे.