शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गारांमुळे शेकडो मासोळ्या मृत्यूमुखी

By admin | Updated: March 10, 2017 01:49 IST

जिल्ह्याच्या विविध भागात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका शेतकऱ्यांसह पशु-पक्षांनाही बसला आहे.

पालकमंत्र्यांचे पंचनामे करण्याचे निर्देश : बल्लारपूर तालुक्यात पिकांचे ५० टक्के नुकसान चंद्रपूर : जिल्ह्याच्या विविध भागात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका शेतकऱ्यांसह पशु-पक्षांनाही बसला आहे. अनेक गावात गारांचा खच पडला. परंतु या गारांमुळे पाण्याचे तापमान खाली येऊन राजुरा तालुक्यातील रामपूर येथील एका शेततलावातील शेकडो मासोळ्या मृत्यूमुखी पडल्या. बल्ल्लारपूर तालुक्यात रबी हंगामातील पिकांचे ५० टक्के नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्याची दखल घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले आहेत.राजुरा तालुक्यातील सास्ती येथून दोन किलोमीटर अंतरावर रामनगर आहे. तेथे राजकुमार निषद यांनी वर्धा नदीलगत शेत आहे. या शेतात जोडधंदा म्हणून राजकुमार निषद यांनी शेततळे तयार करून मत्स्यपालन व्यवसाय करतात. निषद यांचे कुटुंब मोठे असल्याने त्यांनी हा जोडधंदा सुरू केला आहे. परंतु मंगळवारची गारपीट त्यांच्यासाठी नुकसानकारक ठरली. या भागात मोठ्या प्रमाणात गारपीट होऊन शेतात बर्फाळ परिस्थिती निर्माण झाली. रामनगर येथील अनेक शेतातील पिके गारांच्या आच्छादनाखाली झाकली गेली. त्या गारा शेततळ्यातही पडल्या होत्या. रामपूर येथील वार्ताहराने दुसऱ्या ुदिवशी या गावाला भेट दिली. त्यावेळी निषद यांना सकाळी शेततळ्यातील अनेक मासोळ्यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. गारपिटीमुळे या शेततळ्यातील पाणी थंड झाले होते. पाण्याचे तापमान खुप खाली गेले होते. परिणामी पाण्यातील मासोळ्यात ते तापमान सहन करू शकल्या नाही. चार-पाच किलो वजनाच्या मासोळ्या आणि त्यांची पिलेदेखील मृत्युमुखी पडल्याचे आढळून आले. यामध्ये त्यांचे दीड-दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामात बँकांकडून कर्ज घेऊन पेरणी केली होती. रबीतही तीच परिस्थिती आहे. या कर्जाची परतफेड ३१ मार्चपर्यंत करण्याचे नियोजन केलेल्या शेतकऱ्यांना गारपीट व अवकाळी पावसाने दगा दिला आहे. तूर, लाखोळी, बरबटी, हरभरा आदी पूर्ण जमा होईपर्यनत मळणीयंत्र लावले जात नाही. हे उत्पादन जमा करून ठेवण्यात येते.आता ते जमा असलेले पीक अवकाळी पावसात सापडले. त्यामुळे ते ओले होऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)बल्लारपुरात घरांची पडझड, म्हशीचा मृत्यूबल्लारपूर : तालुक्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे सरासरी ५० टक्के नुकसान झाले आहे. बल्लारपूर, विसापूर, भिवकुंड, कोठारी, काटवली कवडजई आदी भागात सर्वाधिक नुकसान झाले आहे. बल्लारपूर परिसरात २९७ एकरातील रबी हंगामातील २०५ एकरामधील पिकांना फटका बसला आहे. कोठारी क्षेत्रात ३९१ एकरपैकी ११९ एकर क्षेत्र बाधित झाले आहे. नांदगाव पोडे, हडस्ती, माना या भागातील २३४ एकरपैकी ११७ एकर क्षेत्रातील पिके प्रभावित झाली आहेत. कळमना परिसरात ७६७ एकरापैकी २२४ एकर, पळसगाव परिसरात २९६ एकरपैकी ८२ एकर आदी क्षेत्रात नुकसान झाले आहे. गारांच्या मारामुळे बामणी येथील संजय कुहिटे यांची शेतात बांधून असलेली म्हैस मरण पावली. दहेली येथील दोन झोपड्यांचे छप्पर उडाले. तर बल्लारपूर येथेही घरांची पडझड झाली. या नुकसानीची माहिती घेण्यासाठी तहसील कार्यालयाने सर्वेक्षण पथक तयार करून माहिती गोळा करणे सुरू केले आहे. सहायक जिल्हाधिकारी अमन मित्तल, तहसीलदार विकास अहीर, मंडळ अधिकारी विजय बोरीकर यांनी बुधवारी अवकाळी पाऊस बाधित भागातील नुकसानीची पाहणी केली. (तालुका प्रतिनिधी)सर्वेक्षण करण्याचे निर्देशअवकाळी पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. जिल्ह्यात मंगळवारी बल्लारपूर, राजुरा आणि चिमूर तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली. त्यात घरांची पडझड होऊन जनावरांचाही मृत्यू झाला आहे. कोठारी परिसरात जनावरांचे मोठे नुकसान झाले. रामनगर येथे शेततळ्यातील मासोळ्या मरण पावल्या आहेत. अवकाळी पावसामुळे रबी हंगामातील पीक बाधित झाले आहे.