शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

दिवाळीच्या तोंडावर डिझेलची शंभरी; गहू, तांदळासह तूप, तेल महागणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2021 05:00 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील ७० टक्के कृषी व्यवस्थेवर निर्भर आहे. अस्मानी व सुलतानी संकटांनी आधीच त्रस्त असणारा बहुसंख्य वर्ग दरवर्षी आपल्या आर्थिक शक्तीनुसार दिवाळी सण साजरा करतो. सध्या पिकांची स्थिती बरी आहे. उत्पादन निघाल्यानंतर बाजारात काय स्थिती राहिल, हे अद्याप सांगता येत नाही. लवकरच दिवाळी येणार आहे. मात्र, डिझेलचे दर प्रति लिटर ९९.१३ पर्यंत पोहोचले. याचा परिणाम देशांतर्गत मालवाहतुकीवर झाला. चंद्रपुरातील व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार मालवाहतुकीच्या दरात २५ ते ३० टक्के वाढ झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र सरकारच्या धोरणामुळे डिझेलच्या दरात वाढली. परिणामी, मालवाहतुकीचे दरही चढे झाल्याने यंदा ऐन दिवाळीच्या तोंडावरच गहू, तांदळासह, तूप व तेल महाग होऊ शकते. कोरोना संकटापासून सावरणे सुरू असताना हे नवेच संकट निर्माण झाल्याने सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक बजेट कोलमडण्याची चिन्हे दिसत आहेत.चंद्रपूर जिल्ह्यातील ७० टक्के कृषी व्यवस्थेवर निर्भर आहे. अस्मानी व सुलतानी संकटांनी आधीच त्रस्त असणारा बहुसंख्य वर्ग दरवर्षी आपल्या आर्थिक शक्तीनुसार दिवाळी सण साजरा करतो. सध्या पिकांची स्थिती बरी आहे. उत्पादन निघाल्यानंतर बाजारात काय स्थिती राहिल, हे अद्याप सांगता येत नाही. लवकरच दिवाळी येणार आहे. मात्र, डिझेलचे दर प्रति लिटर ९९.१३ पर्यंत पोहोचले. याचा परिणाम देशांतर्गत मालवाहतुकीवर झाला. चंद्रपुरातील व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार मालवाहतुकीच्या दरात २५ ते ३० टक्के वाढ झाली. याचा अनिष्ट परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होऊ लागला आहे. डिझेल व पेट्रोल दरवाढीमुळे गहू, तांदूळ, डाळी, तेल, तूप, शेंगदाणा व अन्य तेलजन्य पदार्थांच्या किमती पुन्हा वाढणार आहेत. भाजीपाला सध्या स्वस्त आहे. येत्या काही दिवसांत त्याच्याही किमती गरिबांच्या आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील हजारो कुटुंबे हातावर आणून पानावर खाणारी आहेत. अशा कुटुंबांना या महागाईची सर्वाधिक झळ बसणार आहे. नोकरदार वर्ग हा खर्च पेलू शकेल. पण गरिबांचे काही खरे नाही, या दिशेने बाजाराची वाटचाल सुरू असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

डिझेल शंभरीपार

- डिझेलच्या दरात वाढ झाल्याने चंद्रपूरच्या बाजारावरही परिणाम जाणवू लागला. सध्या प्रति लिटर ९९.१३ पैसे असा दर आहे. येत्या काही दिवसांत पुन्हा वाढण्याची भीती आहे.

मालवाहतूक टक्क्यांनी वाढली- पेट्रोल व डिझेलचे दर वाढले की वाहतुकीचे दर चढे होतात. दिवाळीच्या तोंडावर व्यापारी मालाचा साठा करीत आहेत. मालवाहतुकीचे दर २१ टक्क्यांनी वाढल्याने येत्या काही दिवसांत त्याचा वस्तूंच्या किमतीवर परिणाम जाणवणार आहे. 

किराणा महागणार

चंद्रपूर जिल्ह्यात आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, नागपूर तसेच पंजाबमधून धान्याची आवक होते. साखर, तेल, विविध प्रकारच्या डाळी इटारसी, बैतूल, हैदराबाद येथूनही आणल्या जातात. परराज्यातून मालवाहतूक करण्याचे दर वाढले. यामुळे जीवनाश्यक वस्तूंच्या किमती भडकू शकतात.

 

टॅग्स :DieselडिझेलPetrolपेट्रोल