शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
3
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
4
दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
5
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
6
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
7
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
8
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
9
'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
10
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
11
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
12
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
13
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
14
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
15
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
16
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
17
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
18
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
19
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
20
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र

शेकडो नागरिकांचा हिरावला रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 00:42 IST

प्लास्टिक पत्रावळी, वाट्या, ग्लासांवर शासनाने बंदी घातली असतानाही लग्न हंगामात सर्रास वापर करण्यात येत असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. प्लास्टिकच्या पत्राळी व वाट्यांमुळे ग्रामीण क्षेत्रात पळस, मोह व चाराच्या पानापासून पत्राळी, द्रोन तयार करणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांचा रोजगार हिरावला आहे.

ठळक मुद्देप्लास्टिकचा वापर वाढला : पत्रावळी, द्रोण बनविणारे हात झाले रिकामे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्लास्टिक पत्रावळी, वाट्या, ग्लासांवर शासनाने बंदी घातली असतानाही लग्न हंगामात सर्रास वापर करण्यात येत असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. प्लास्टिकच्या पत्राळी व वाट्यांमुळे ग्रामीण क्षेत्रात पळस, मोह व चाराच्या पानापासून पत्राळी, द्रोन तयार करणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांचा रोजगार हिरावला आहे.तातडीने प्रशासनाने प्लास्टिकच्या पत्रावळी, वाट्या व ग्लासांवर बंदी घालावी, अशी मागणी ग्रामीण भागातील पत्रावळी, द्रोण बनविणाºया नागरिकांनी केली आहे. प्लास्टिक पत्रावळी, वाट्या, ग्लासामुळे पर्यावरणाचे नुकसान होते तसेच प्लास्टिकच्या पत्रावळी, ग्लास, वाट्यांचा उपयोग करणाºया मानवाला होत असल्याचे दिसून येत आहे.प्लास्टिकच्या ग्लास, वाटीत थंड व गरम पदार्थ पिल्याने कॅन्सरसारखा गंभीर आजार होण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय संस्थेच्या संशोधनातून पुढे आली आहे. असे सर्व गंभीर आजार होत असताना संपूर्ण जिल्हाभरात प्लास्टिकच्या पत्रावळी, वाट्या, ग्लासांचा वापर केला जात आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने प्लास्टिक पत्रावळी, ग्लास, वाट्यांवर बंदी घालण्याचा ठराव घेण्याची गरज जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीच्या आमसभेत प्लास्टिकच्या वाट्या, ग्लास, पत्रावळींवर गावबंदी घालण्याचा ठराव घेण्याची गरज आहे. ग्रामपंचायतींतर्गत येणाºया गावात जर कुणी लग्नमध्ये प्लास्टिकच्या पत्रावळी, ग्लास, वाट्याचा उपयोग करीत असेल तर अशा उपयोग करणाºया इसमास पाच ते दहा हजारांचा दंड ठोठावण्याचा ठराव घेण्याची गरज आहे.या ठरावातून ग्रामपंचायतीला फायदे होतील. प्लास्टिकच्या पत्रावळी, वाट्या, ग्लासापासून कचरा होणार नाही व गावात सर्वत्र स्वच्छता राहील, प्लास्टिकच्या पत्रावळी, वाट्या, ग्लास हे लवकर कुजत नसल्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होत आहे. मात्र या प्लास्टिक साहित्याच्या बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.नियम कागदावरचशासनाने राज्यात प्लास्टिक बंदी केली. पण, स्थानिक स्वराज्य संस्था अंमलबजावणी करीत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील पारंपरिक कारागीर विविध प्रकारच्या पानांपासून पत्रावळी व द्रोण बनविणे बंद केले. याचा अनिष्ठ परिणाम रोजगारावर झाला.