शहरं
Join us  
Trending Stories
1
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
2
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
3
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
4
MS Dhoni च्या तालमीत तयार झालेल्या CSK क्रिकेटरने दिली गुड न्यूज, लवकरच होणार 'बाबा'
5
"कोणत्याही महापालिकेत युती तुटलेली नाही, पुढच्या दोन दिवसात...", उदय सामंतांचे विधान, पुणे-संभाजीनगरचं काय?
6
BMC Elections: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
7
"मुलगी मित्रांसोबत गेली...", रक्ताच्या थारोळ्यात सापडली नववीची विद्यार्थिनी; ICU मध्ये मृत्यूशी झुंज
8
जागा शिंदेसेनेला सुटली, धनुष्यबाणावर लढण्याची ऑफरही आली, पण..., भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्तीने घेतला मोठा निर्णय  
9
डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? सावधान! सेबीने दिला इशारा; तुमचे पैसे अडकण्याची भीती
10
Mamata Banerjee : "I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप
11
सोलापुरात अभूतपूर्व गोंधळ! भाजपाचे एबी फॉर्म वेळेत न पोहचल्याने संताप, विरोधकांचा दारातच ठिय्या
12
Anjel Chakma : खळबळजनक! बर्थडे पार्टी, शिवीगाळ अन्... एंजेल चकमा हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा
13
सौदी अरेबियानं UAE च्या जहाजांना का केले उद्ध्वस्त?; २४ तासांचा अल्टिमेटम, २ मित्र बनले शत्रू
14
सावधान! 'हॅप्पी न्यू इयर' म्हणण्यापूर्वी १० वेळा विचार करा; एका क्लिकमुळे बँक खातं होईल रिकामं
15
निष्ठवंतांनंतर संभाजीनगर भाजप कार्यालयात रिपाइंचा 'रुद्रावतार'! कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
16
काका-पुतण्याची आघाडी; परभणीत राष्ट्रवादी अ.प. ५७ तर राष्ट्रवादी श.प. ८ जागा लढणार
17
Pisces Yearly Horoscope 2026: मीन राशीसाठी नवीन वर्ष 2026: प्रेमाचे आणि प्रगतीचे वर्ष; परदेश प्रवासासह उत्पन्नात होणार मोठी वाढ!
18
पत्नी असावी तर अशी! BMC निवडणूक लढवणाऱ्या समाधान सरवणकरांना तेजस्विनीची साथ, अभिनेत्रीचं होतंय कौतुक
19
‘मुंबई मनपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष पूर्ण क्षमतेने आणि ताकदीने उमेदवार उतरवणार’, सुनिल तटकरे यांची घोषणा
20
लक्ष्मी नारायण विपरीत राजयोग: ‘या’ राशी ठरतील लकी, मनासारखे घडेल; सुबत्ता-कल्याण-मंगळ काळ!
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो नागरिकांचा हिरावला रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 00:42 IST

प्लास्टिक पत्रावळी, वाट्या, ग्लासांवर शासनाने बंदी घातली असतानाही लग्न हंगामात सर्रास वापर करण्यात येत असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. प्लास्टिकच्या पत्राळी व वाट्यांमुळे ग्रामीण क्षेत्रात पळस, मोह व चाराच्या पानापासून पत्राळी, द्रोन तयार करणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांचा रोजगार हिरावला आहे.

ठळक मुद्देप्लास्टिकचा वापर वाढला : पत्रावळी, द्रोण बनविणारे हात झाले रिकामे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्लास्टिक पत्रावळी, वाट्या, ग्लासांवर शासनाने बंदी घातली असतानाही लग्न हंगामात सर्रास वापर करण्यात येत असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. प्लास्टिकच्या पत्राळी व वाट्यांमुळे ग्रामीण क्षेत्रात पळस, मोह व चाराच्या पानापासून पत्राळी, द्रोन तयार करणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांचा रोजगार हिरावला आहे.तातडीने प्रशासनाने प्लास्टिकच्या पत्रावळी, वाट्या व ग्लासांवर बंदी घालावी, अशी मागणी ग्रामीण भागातील पत्रावळी, द्रोण बनविणाºया नागरिकांनी केली आहे. प्लास्टिक पत्रावळी, वाट्या, ग्लासामुळे पर्यावरणाचे नुकसान होते तसेच प्लास्टिकच्या पत्रावळी, ग्लास, वाट्यांचा उपयोग करणाºया मानवाला होत असल्याचे दिसून येत आहे.प्लास्टिकच्या ग्लास, वाटीत थंड व गरम पदार्थ पिल्याने कॅन्सरसारखा गंभीर आजार होण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय संस्थेच्या संशोधनातून पुढे आली आहे. असे सर्व गंभीर आजार होत असताना संपूर्ण जिल्हाभरात प्लास्टिकच्या पत्रावळी, वाट्या, ग्लासांचा वापर केला जात आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने प्लास्टिक पत्रावळी, ग्लास, वाट्यांवर बंदी घालण्याचा ठराव घेण्याची गरज जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीच्या आमसभेत प्लास्टिकच्या वाट्या, ग्लास, पत्रावळींवर गावबंदी घालण्याचा ठराव घेण्याची गरज आहे. ग्रामपंचायतींतर्गत येणाºया गावात जर कुणी लग्नमध्ये प्लास्टिकच्या पत्रावळी, ग्लास, वाट्याचा उपयोग करीत असेल तर अशा उपयोग करणाºया इसमास पाच ते दहा हजारांचा दंड ठोठावण्याचा ठराव घेण्याची गरज आहे.या ठरावातून ग्रामपंचायतीला फायदे होतील. प्लास्टिकच्या पत्रावळी, वाट्या, ग्लासापासून कचरा होणार नाही व गावात सर्वत्र स्वच्छता राहील, प्लास्टिकच्या पत्रावळी, वाट्या, ग्लास हे लवकर कुजत नसल्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होत आहे. मात्र या प्लास्टिक साहित्याच्या बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.नियम कागदावरचशासनाने राज्यात प्लास्टिक बंदी केली. पण, स्थानिक स्वराज्य संस्था अंमलबजावणी करीत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील पारंपरिक कारागीर विविध प्रकारच्या पानांपासून पत्रावळी व द्रोण बनविणे बंद केले. याचा अनिष्ठ परिणाम रोजगारावर झाला.