शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

झुडपी जंगलाच्या जागेवर पसरविली शेकडो टन राख

By admin | Updated: August 14, 2015 01:18 IST

महसूल विभागाच्या ताब्यात असलेल्या व झुडपी जंगल म्हणून नमुद केलेल्या जागेवर शेकडो टन राख पसरविण्यात आली आहे.

वरोरा : महसूल विभागाच्या ताब्यात असलेल्या व झुडपी जंगल म्हणून नमुद केलेल्या जागेवर शेकडो टन राख पसरविण्यात आली आहे. ही राख पाण्यात मिसळत असून हवेद्वारे पसरत असल्याने मानवासह प्राण्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महसूल विभागाच्या जागेवर राख पसरविण्यात आली आहे, मात्र याबाबत महसूल विभागच अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.महसूल तसेच वनविभागाच्या ताब्यात असलेली व त्यात झुडपी जंगल म्हणून नमूद केले असेल तर ही जागा वनसंवर्धन अधिनियम १९८० चे कलम २ अन्वये वनेत्तर वापरण्यासाठी देता येत नाही. याचे अधिकार केवळ केंद्र सरकारला आहे. असे असताना भद्रावती तालुक्यातील भटाळी गावानजीकच्या व सध्या महसूल विभागाच्या ताब्यात असलेल्या सर्व्हे क्रमांक ४३ व ५३ मध्ये झुडपी जंगल असे सातबाऱ्यावर नमुद केले आहे. शेकडो टन राख टाकत असताना ही राख ट्रक तसेच टिप्परद्वारे टाकण्यात आली. राख टाकण्याकरीता कित्येक दिवसाचा कालावधी लागला. परंतु, महसूल विभागाच्या ताब्यात असलेल्या व झुडपी जंगल नमुद असलेल्या जागेवर शेकडो टन राख टाकुन त्यावर मुरूम टाकण्यात आला, याची साधी कल्पना महसूल विभागाला नसल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राख टाकण्यास कोणी पुढाकार घेतला व ती राख महसूल विभाग काढणार काय, यामध्ये दोषी असणाऱ्यावर कार्यवाही होईल काय, असे एक ना अनेक प्रश्न तुर्तास अनुत्तरीत आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने याकडे लक्ष देऊन संबधितांवर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. याकडे लक्ष द्यावे. (तालुका प्रतिनिधी)मुरूम टाकून राख दाबण्याचा प्रयत्नकाही महिन्यापुर्वी शेकडो टन राख पसरविण्यात आली. त्यावर मुरूम पसरवून राख दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. या झुडपी जंगल जागेवर मोठ मोठे खड्डे होते. त्या खड्डयातही ही राख पसरविण्यात आली आहे. ही राख खड्ड्यातील पाण्यात मिसळत असल्याने पाणी दुषीत झाले आहे. हे दुषीत पाणी पाळीव प्राणी पिल्यास त्यांना धोका निर्माण होणार आहे. राख भरलेल्या ठिकाणी दलदल निर्माण झाली असून या जागेवरून चालणारी व्यक्ती किंवा जनावरे राखेत गडण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. झोपडपट्टीधारकांना त्रासराख टाकलेल्या ठिकाणच्या काही अंतरावर गिट्टी खदानमध्ये काम करणाऱ्या मजुरांच्या झोपड्या आहेत. हवेमुळे राख त्यांच्या झोपड्यात तसेच पिण्याच्या पाण्यातही मिसळत असल्याने या मजुरांना श्वसनाचे आजार होणे सुरू झाले आहे. या राखेमुळे भटाळी परिसरातील शेतीवर विपरीत परिणाम झाला आहे. पशुपक्षावरही या राखेचा विपरीत परिणाम झाल्याचे परिसरात फिरताना आढळून येते. राखेमुळे जैवविविधता भटाळी परिसरातील नष्ट होण्याचे संकेत दिसुन येत आहे.