शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

विनोदातच आहे मानवी जीवनाचे खरे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 22:54 IST

मानवाच्या जीवनात तीन सत्य आहेत. त्यातील एक सत्य म्हणजे दु:ख आणि या दु:खाचे निवारण करण्याचे उपाय तथागत भगवान बुद्धांनी सांगितले आहे. तरी ज्या नागरिकांना याची कल्पना नाही, अशा रसिकांच्या जीवनातील दु:ख काही प्रमाणात कमी करीत विनोदाच्या माध्यमातून काही काळासाठी हसविण्याचे काम हा विनोद करतो.

ठळक मुद्देके. आत्माराम : पाच हजार नाटके, दोन चित्रपट, टीव्ही मालिकांमध्ये भूमिका

राजकुमार चुनारकर।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : मानवाच्या जीवनात तीन सत्य आहेत. त्यातील एक सत्य म्हणजे दु:ख आणि या दु:खाचे निवारण करण्याचे उपाय तथागत भगवान बुद्धांनी सांगितले आहे. तरी ज्या नागरिकांना याची कल्पना नाही, अशा रसिकांच्या जीवनातील दु:ख काही प्रमाणात कमी करीत विनोदाच्या माध्यमातून काही काळासाठी हसविण्याचे काम हा विनोद करतो. त्यामुळे विनोद हा सर्व दु:खावर मात करण्याचे साधन आहे. तसेच या विनोदातच जीवनाचे खरे दर्शन आहे, असे मत झाडीपट्टीतील पाच हजार नाटकात व दोन मराठी चित्रपटात भूमिका साकारणारे विनोदी कलावंत के. आत्माराम यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केलेरविवारी चिमूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य नगरी येथे आयोजित पहिल्या आंबेडकरवादी साहित्य संमेलनात परिसंवादासाठी के. आत्माराम आले होते. यावेळी लोकमतने त्यांच्याशी संवाद साधला.चाळीस वर्षांची कला सांभाळताना अनेक अडचणींना तोंड देण्याचा प्रसंगही के. आत्माराम यांनी उलगडला. शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन परिवारात कलेचा कुठलाही लवशेष नव्हता. मात्र प्राथमिक शिक्षण घेत असतानाच वयाच्या नवव्या वर्षी प्रथम हवालदाराची भूमिका साकारली आणि यातूनच कलेची आवड निर्माण झाली. याच दरम्यान नागभीड व ब्रह्मपुरी येथे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करीत मिंडाळा येथील संत हरिदास विद्यालयात शिक्षकाची नोकरी स्वीकारली. यासोबतच माझ्यातील कलावंतांच्या जीवनाचाही प्रवास सुरु झाला, असेही के. आत्माराम यांनी सांगितले.एक एक करीत आतापर्यंत तब्बल ४० वर्ष हजारो झाडीपट्टीतील नाटकात आपण काम केले आहे. आताही करीत आहे. यासोबतच ‘पहिलं पाऊल जीवनाचं’ व ‘लाल चुडा’ या दोन मराठी चित्रपटात भूमिका केल्या आहेत.दोन मालिका, तसेच सात नाटकाचे लेखन करीत आज वयाच्या ५८ व्या वर्षीही भूमिका करणे सुरूच आहे, असे त्यांनी सांगितले.नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यामुळे आता नवकलावंतासाठी प्रशिक्षण वर्ग सुरू करून ही कला नवीन कलावंतांपर्यंत पोहचवण्याचे काम करणार असल्याचे सांगून या कलेतून अनेक रसिकांचे दु:ख या विनोदाच्या भूमिकेतून कमी करण्याचा आपला नेहमी प्रयत्न राहिला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.देविदासची भूमिका सर्वाधिक आवडतीमाझ्यातील कलावंत जिवंत ठेवण्यासाठी माझी अर्धांगिनी कांचन हिचाही मोठा वाटा असल्याचे ते आवर्जुन सांगतात. माझ्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत आबासाहेब आचरेकर लिखित ‘झाकून किती झाकायचं’ या नाटकातील देविदास ही भूमिका आवडल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. या क्षेत्रात येणाऱ्या नवीन कलाकारांना संदेश देताना प्रत्येक कलाकारांनी मनापासून मेहनत करावी. कलावंत कधीच रिटायर होत नाही, असेही के.आत्माराम म्हणाले.