शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

विनोदातच आहे मानवी जीवनाचे खरे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 22:54 IST

मानवाच्या जीवनात तीन सत्य आहेत. त्यातील एक सत्य म्हणजे दु:ख आणि या दु:खाचे निवारण करण्याचे उपाय तथागत भगवान बुद्धांनी सांगितले आहे. तरी ज्या नागरिकांना याची कल्पना नाही, अशा रसिकांच्या जीवनातील दु:ख काही प्रमाणात कमी करीत विनोदाच्या माध्यमातून काही काळासाठी हसविण्याचे काम हा विनोद करतो.

ठळक मुद्देके. आत्माराम : पाच हजार नाटके, दोन चित्रपट, टीव्ही मालिकांमध्ये भूमिका

राजकुमार चुनारकर।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : मानवाच्या जीवनात तीन सत्य आहेत. त्यातील एक सत्य म्हणजे दु:ख आणि या दु:खाचे निवारण करण्याचे उपाय तथागत भगवान बुद्धांनी सांगितले आहे. तरी ज्या नागरिकांना याची कल्पना नाही, अशा रसिकांच्या जीवनातील दु:ख काही प्रमाणात कमी करीत विनोदाच्या माध्यमातून काही काळासाठी हसविण्याचे काम हा विनोद करतो. त्यामुळे विनोद हा सर्व दु:खावर मात करण्याचे साधन आहे. तसेच या विनोदातच जीवनाचे खरे दर्शन आहे, असे मत झाडीपट्टीतील पाच हजार नाटकात व दोन मराठी चित्रपटात भूमिका साकारणारे विनोदी कलावंत के. आत्माराम यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केलेरविवारी चिमूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य नगरी येथे आयोजित पहिल्या आंबेडकरवादी साहित्य संमेलनात परिसंवादासाठी के. आत्माराम आले होते. यावेळी लोकमतने त्यांच्याशी संवाद साधला.चाळीस वर्षांची कला सांभाळताना अनेक अडचणींना तोंड देण्याचा प्रसंगही के. आत्माराम यांनी उलगडला. शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन परिवारात कलेचा कुठलाही लवशेष नव्हता. मात्र प्राथमिक शिक्षण घेत असतानाच वयाच्या नवव्या वर्षी प्रथम हवालदाराची भूमिका साकारली आणि यातूनच कलेची आवड निर्माण झाली. याच दरम्यान नागभीड व ब्रह्मपुरी येथे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करीत मिंडाळा येथील संत हरिदास विद्यालयात शिक्षकाची नोकरी स्वीकारली. यासोबतच माझ्यातील कलावंतांच्या जीवनाचाही प्रवास सुरु झाला, असेही के. आत्माराम यांनी सांगितले.एक एक करीत आतापर्यंत तब्बल ४० वर्ष हजारो झाडीपट्टीतील नाटकात आपण काम केले आहे. आताही करीत आहे. यासोबतच ‘पहिलं पाऊल जीवनाचं’ व ‘लाल चुडा’ या दोन मराठी चित्रपटात भूमिका केल्या आहेत.दोन मालिका, तसेच सात नाटकाचे लेखन करीत आज वयाच्या ५८ व्या वर्षीही भूमिका करणे सुरूच आहे, असे त्यांनी सांगितले.नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यामुळे आता नवकलावंतासाठी प्रशिक्षण वर्ग सुरू करून ही कला नवीन कलावंतांपर्यंत पोहचवण्याचे काम करणार असल्याचे सांगून या कलेतून अनेक रसिकांचे दु:ख या विनोदाच्या भूमिकेतून कमी करण्याचा आपला नेहमी प्रयत्न राहिला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.देविदासची भूमिका सर्वाधिक आवडतीमाझ्यातील कलावंत जिवंत ठेवण्यासाठी माझी अर्धांगिनी कांचन हिचाही मोठा वाटा असल्याचे ते आवर्जुन सांगतात. माझ्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत आबासाहेब आचरेकर लिखित ‘झाकून किती झाकायचं’ या नाटकातील देविदास ही भूमिका आवडल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. या क्षेत्रात येणाऱ्या नवीन कलाकारांना संदेश देताना प्रत्येक कलाकारांनी मनापासून मेहनत करावी. कलावंत कधीच रिटायर होत नाही, असेही के.आत्माराम म्हणाले.