शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

विनोदातच आहे मानवी जीवनाचे खरे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 22:54 IST

मानवाच्या जीवनात तीन सत्य आहेत. त्यातील एक सत्य म्हणजे दु:ख आणि या दु:खाचे निवारण करण्याचे उपाय तथागत भगवान बुद्धांनी सांगितले आहे. तरी ज्या नागरिकांना याची कल्पना नाही, अशा रसिकांच्या जीवनातील दु:ख काही प्रमाणात कमी करीत विनोदाच्या माध्यमातून काही काळासाठी हसविण्याचे काम हा विनोद करतो.

ठळक मुद्देके. आत्माराम : पाच हजार नाटके, दोन चित्रपट, टीव्ही मालिकांमध्ये भूमिका

राजकुमार चुनारकर।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : मानवाच्या जीवनात तीन सत्य आहेत. त्यातील एक सत्य म्हणजे दु:ख आणि या दु:खाचे निवारण करण्याचे उपाय तथागत भगवान बुद्धांनी सांगितले आहे. तरी ज्या नागरिकांना याची कल्पना नाही, अशा रसिकांच्या जीवनातील दु:ख काही प्रमाणात कमी करीत विनोदाच्या माध्यमातून काही काळासाठी हसविण्याचे काम हा विनोद करतो. त्यामुळे विनोद हा सर्व दु:खावर मात करण्याचे साधन आहे. तसेच या विनोदातच जीवनाचे खरे दर्शन आहे, असे मत झाडीपट्टीतील पाच हजार नाटकात व दोन मराठी चित्रपटात भूमिका साकारणारे विनोदी कलावंत के. आत्माराम यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केलेरविवारी चिमूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य नगरी येथे आयोजित पहिल्या आंबेडकरवादी साहित्य संमेलनात परिसंवादासाठी के. आत्माराम आले होते. यावेळी लोकमतने त्यांच्याशी संवाद साधला.चाळीस वर्षांची कला सांभाळताना अनेक अडचणींना तोंड देण्याचा प्रसंगही के. आत्माराम यांनी उलगडला. शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन परिवारात कलेचा कुठलाही लवशेष नव्हता. मात्र प्राथमिक शिक्षण घेत असतानाच वयाच्या नवव्या वर्षी प्रथम हवालदाराची भूमिका साकारली आणि यातूनच कलेची आवड निर्माण झाली. याच दरम्यान नागभीड व ब्रह्मपुरी येथे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करीत मिंडाळा येथील संत हरिदास विद्यालयात शिक्षकाची नोकरी स्वीकारली. यासोबतच माझ्यातील कलावंतांच्या जीवनाचाही प्रवास सुरु झाला, असेही के. आत्माराम यांनी सांगितले.एक एक करीत आतापर्यंत तब्बल ४० वर्ष हजारो झाडीपट्टीतील नाटकात आपण काम केले आहे. आताही करीत आहे. यासोबतच ‘पहिलं पाऊल जीवनाचं’ व ‘लाल चुडा’ या दोन मराठी चित्रपटात भूमिका केल्या आहेत.दोन मालिका, तसेच सात नाटकाचे लेखन करीत आज वयाच्या ५८ व्या वर्षीही भूमिका करणे सुरूच आहे, असे त्यांनी सांगितले.नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यामुळे आता नवकलावंतासाठी प्रशिक्षण वर्ग सुरू करून ही कला नवीन कलावंतांपर्यंत पोहचवण्याचे काम करणार असल्याचे सांगून या कलेतून अनेक रसिकांचे दु:ख या विनोदाच्या भूमिकेतून कमी करण्याचा आपला नेहमी प्रयत्न राहिला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.देविदासची भूमिका सर्वाधिक आवडतीमाझ्यातील कलावंत जिवंत ठेवण्यासाठी माझी अर्धांगिनी कांचन हिचाही मोठा वाटा असल्याचे ते आवर्जुन सांगतात. माझ्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत आबासाहेब आचरेकर लिखित ‘झाकून किती झाकायचं’ या नाटकातील देविदास ही भूमिका आवडल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. या क्षेत्रात येणाऱ्या नवीन कलाकारांना संदेश देताना प्रत्येक कलाकारांनी मनापासून मेहनत करावी. कलावंत कधीच रिटायर होत नाही, असेही के.आत्माराम म्हणाले.