शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

खाकी वर्दीतून पाझरली मानवता

By admin | Updated: June 22, 2015 01:04 IST

खाली वर्दीतल्या पोलीस दादाला पाहिले की, भल्या-भल्यांना घाम फुटतो. मात्र गुन्हेगारांना ‘बाजीराव’ चे फटके देत वठणीवर आणणाऱ्या....

भटकलेल्या महिलेला दिला आश्रयती म्हणाली, साहेब, आजच्या धडीला पोलिसच देव हायेत...!राजकुमार चुनारकर खडसंगीखाली वर्दीतल्या पोलीस दादाला पाहिले की, भल्या-भल्यांना घाम फुटतो. मात्र गुन्हेगारांना ‘बाजीराव’ चे फटके देत वठणीवर आणणाऱ्या पोलिसांची प्रतिमा याच वर्तुळात कार्यरत काही भ्रष्ट घटकांमुळे डागाळली गेली. पोलिसांना दया-माया नसते. त्यांच्यातलं माणूसपण संपलं, असेही शेरे लावले जातात. मात्र खाकी वर्दीतही एक संवेदनशिल माणूस दडलेला असतो, याची प्रचिती नुकतीच चिमूर शहरात आली. पोलीस प्रशासनाबाबत सर्वसामान्यांमध्ये असलेल्या वाईट कल्पना चुकीच्या ठरवत चिमूर क्रांती नगरीत नव्यानेच रुजू झालेले ठाणेदार मनिष ठाकरे यांनी रात्रीच्या कर्तव्यावर असताना एका ६५ वर्षीय महिलेची आपबिती ऐकून घेऊन तिला पोलीस ठाण्यातच रात्रभर आश्रय दिला. मोठ्या आस्थेनं काय हवे, काय नको, अशी विचारणा करून दुसऱ्या दिवशी तिला तिच्या राहत्या गावी रवाना केले.‘सदरक्षणाय खलनिग्रहनाय’ असे ब्रीद असलेले पोलीस समाज जेव्हा झोपतो, तेव्हा खाकी वर्दीतील पोलीस पहारा देत समाजाला सुरक्षा देतात. शुक्रवारी रात्री कर्तव्यावर निघालेले चिमूरचे ठाणेदार मनिष ठाकरे आपल्या ताफ्यासह वडाळा पैकू परिसरात गस्त करीत होते. दरम्यान, बसस्थानक परिसरात अचानक एक महिला पोलिसांच्या वाहनाला हात दाखवत आडवी झाली. तेव्हा आपले वाहन थांबवून ठाकरे यांनी तिला काय झाले, म्हणून विचारणा केली. ती घाबरलेल्या अवस्थेत होती. तिने आपबिती त्यांना आपबिती सांगितली.नागपूर जिल्ह्यातील कुही येथील रहिवासी असलेल्या सदर वृद्धेचे नाव रमाबाई श्रीरंग मेश्राम आहे. ती चुकून चिमूर शहरात पोहोचली. तिच्या जवळ कुठलेही साधन नव्हते. तिची ती अवस्था पाहून खाकी वर्दीतील मानवता पाझरली. मनिष ठाकरे यांनी तिला आपल्या सोबत पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर या महिलेने दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर फोन केला. मात्र प्रतिसाद मिळला नाही. तेव्हा एका महिला शिपायाला बोलावून सदर वृद्धेला जेवण देण्यात आले. तिची झोपण्याचीही व्यवस्था करण्यात आली. पोलिसांनी केलेली मदत पाहून भारावलेल्या त्या वृद्धेने आजच्या घडीला, पोलिसच देव आहेत, अशा भावना व्यक्त केल्या. रात्री बेरात्री फिरणाऱ्यांना दुरुनच पोलिसांची गाडी दिसली त्यांची भंबेरी उडते. मात्र एका अनोळखी महिलेला खाकी वर्दीतील अधिकाऱ्याने मानवता दाखवित केलेली मदत तिच्यासाठी लाख मोलाची ठरली.