शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बाभळीमुळे मानव-वन्यजीव संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 22:40 IST

शहरी भागात ठिकठिकाणी वाढलेली काटेरी बाभळीचे जंगल वन्यप्राणी-मानव संघर्षाला कारणीभूत ठरत आहे. हा संघर्ष टाळण्यासाठी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, वेकोलिचे क्षेत्र तसेच अन्य उद्योगाचे क्षेत्र आणि लगतची गावे याठिकाणी वाढलेली काटेरी बाभळीचे कुत्रिम जंगल नष्ट करून इतर प्रजातीच्या वृक्षाची लागवड करण्याची मागणी इको-प्रोने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देइको-प्रोचे वनमंत्र्यांना निवेदन : समस्यांकडे वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरी भागात ठिकठिकाणी वाढलेली काटेरी बाभळीचे जंगल वन्यप्राणी-मानव संघर्षाला कारणीभूत ठरत आहे. हा संघर्ष टाळण्यासाठी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, वेकोलिचे क्षेत्र तसेच अन्य उद्योगाचे क्षेत्र आणि लगतची गावे याठिकाणी वाढलेली काटेरी बाभळीचे कुत्रिम जंगल नष्ट करून इतर प्रजातीच्या वृक्षाची लागवड करण्याची मागणी इको-प्रोने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.यावेळी वनमंत्री यांच्यासोबत झालेल्या चर्चेत उर्जानगर परिसरातील वाघ समस्या आणि त्यावरील उपायाबाबत कार्यवाही करण्याबाबत मुख्य वनसंरक्षक यांना पत्र देण्यात आलेले आहे. उर्जानगर परिसरात बिबट, अस्वल यासोबत आता वाघांचे दर्शन सामान्य नागरिकांना येता-जाता होऊ लागले आहे. यामुळे या परिसरासह लगतच्या गावात मानव-वन्यजीव संघर्ष निर्माण होत आहे. मागील दोन वर्षात अनेक अस्वल वीज केंद्र आणि वेकोलिच्या वसाहतीमधून वनविभागाने पकडून इतरत्र हलविले आहे. मात्र समस्या आजही कायमच आहे, कारण मूळ समस्येवर उपाययोजना होताना दिसत नाहीे. मागील एक वर्षांपासून चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्र व लगतच्या गावातील शिवारात वाघिणीने पिल्लांसह बस्तान मांडले आहे. नुकतेच नवजात पिल्लांसह पुन्हा दुसऱ्या वाघिणीचे दर्शन येथील नागरिकांना झालेले आहे, तसे व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाले होते. एकंदरीत सदर कुत्रीम जंगल हे आता वाघासारख्या प्राण्यांचे प्रजनन केंद्र होत चालले आहे. ही चंद्रपूर शहराकरिता मोठी धोक्याची घंटा आहे. याचा प्रत्यय मागील काही महिन्यांपासून सातत्याने येत आहे.मागील अनेक वर्षांपासून या परिसरांमध्ये काटेरी बाभूळ म्हणजे प्रोसोपिस या प्रजातीच्या वनस्पतीचे कृत्रिम जंगल तयार झालेले आहे. दाटी-वाटीने वाढणाºया या वनस्पतीमुळे जंगलसदृश्य स्थिती निर्माण होते. या परिसरात मोकाट जनावरांची संख्यासुध्दा मोठया प्रमाणात आहेत. त्यामुळे वन्यप्राणी यांना योग्य लपण, खाद्य व पाणी या ठिकाणी मिळते. पूर्वी बिबट आणि अस्वल यांचे वास्तव्य असलेले हे कुत्रिम जंगल वाघांनासुध्दा आकर्षित करू लागल्याचे निवेदनात म्हटले आहे.