शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

बाभळीमुळे मानव-वन्यजीव संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 22:40 IST

शहरी भागात ठिकठिकाणी वाढलेली काटेरी बाभळीचे जंगल वन्यप्राणी-मानव संघर्षाला कारणीभूत ठरत आहे. हा संघर्ष टाळण्यासाठी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, वेकोलिचे क्षेत्र तसेच अन्य उद्योगाचे क्षेत्र आणि लगतची गावे याठिकाणी वाढलेली काटेरी बाभळीचे कुत्रिम जंगल नष्ट करून इतर प्रजातीच्या वृक्षाची लागवड करण्याची मागणी इको-प्रोने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देइको-प्रोचे वनमंत्र्यांना निवेदन : समस्यांकडे वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरी भागात ठिकठिकाणी वाढलेली काटेरी बाभळीचे जंगल वन्यप्राणी-मानव संघर्षाला कारणीभूत ठरत आहे. हा संघर्ष टाळण्यासाठी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, वेकोलिचे क्षेत्र तसेच अन्य उद्योगाचे क्षेत्र आणि लगतची गावे याठिकाणी वाढलेली काटेरी बाभळीचे कुत्रिम जंगल नष्ट करून इतर प्रजातीच्या वृक्षाची लागवड करण्याची मागणी इको-प्रोने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.यावेळी वनमंत्री यांच्यासोबत झालेल्या चर्चेत उर्जानगर परिसरातील वाघ समस्या आणि त्यावरील उपायाबाबत कार्यवाही करण्याबाबत मुख्य वनसंरक्षक यांना पत्र देण्यात आलेले आहे. उर्जानगर परिसरात बिबट, अस्वल यासोबत आता वाघांचे दर्शन सामान्य नागरिकांना येता-जाता होऊ लागले आहे. यामुळे या परिसरासह लगतच्या गावात मानव-वन्यजीव संघर्ष निर्माण होत आहे. मागील दोन वर्षात अनेक अस्वल वीज केंद्र आणि वेकोलिच्या वसाहतीमधून वनविभागाने पकडून इतरत्र हलविले आहे. मात्र समस्या आजही कायमच आहे, कारण मूळ समस्येवर उपाययोजना होताना दिसत नाहीे. मागील एक वर्षांपासून चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्र व लगतच्या गावातील शिवारात वाघिणीने पिल्लांसह बस्तान मांडले आहे. नुकतेच नवजात पिल्लांसह पुन्हा दुसऱ्या वाघिणीचे दर्शन येथील नागरिकांना झालेले आहे, तसे व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाले होते. एकंदरीत सदर कुत्रीम जंगल हे आता वाघासारख्या प्राण्यांचे प्रजनन केंद्र होत चालले आहे. ही चंद्रपूर शहराकरिता मोठी धोक्याची घंटा आहे. याचा प्रत्यय मागील काही महिन्यांपासून सातत्याने येत आहे.मागील अनेक वर्षांपासून या परिसरांमध्ये काटेरी बाभूळ म्हणजे प्रोसोपिस या प्रजातीच्या वनस्पतीचे कृत्रिम जंगल तयार झालेले आहे. दाटी-वाटीने वाढणाºया या वनस्पतीमुळे जंगलसदृश्य स्थिती निर्माण होते. या परिसरात मोकाट जनावरांची संख्यासुध्दा मोठया प्रमाणात आहेत. त्यामुळे वन्यप्राणी यांना योग्य लपण, खाद्य व पाणी या ठिकाणी मिळते. पूर्वी बिबट आणि अस्वल यांचे वास्तव्य असलेले हे कुत्रिम जंगल वाघांनासुध्दा आकर्षित करू लागल्याचे निवेदनात म्हटले आहे.