शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
4
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
5
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
8
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
9
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
10
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
11
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
12
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
13
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
14
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
15
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
17
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
18
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
19
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
20
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर

बाभळीमुळे मानव-वन्यजीव संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 22:40 IST

शहरी भागात ठिकठिकाणी वाढलेली काटेरी बाभळीचे जंगल वन्यप्राणी-मानव संघर्षाला कारणीभूत ठरत आहे. हा संघर्ष टाळण्यासाठी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, वेकोलिचे क्षेत्र तसेच अन्य उद्योगाचे क्षेत्र आणि लगतची गावे याठिकाणी वाढलेली काटेरी बाभळीचे कुत्रिम जंगल नष्ट करून इतर प्रजातीच्या वृक्षाची लागवड करण्याची मागणी इको-प्रोने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देइको-प्रोचे वनमंत्र्यांना निवेदन : समस्यांकडे वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरी भागात ठिकठिकाणी वाढलेली काटेरी बाभळीचे जंगल वन्यप्राणी-मानव संघर्षाला कारणीभूत ठरत आहे. हा संघर्ष टाळण्यासाठी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, वेकोलिचे क्षेत्र तसेच अन्य उद्योगाचे क्षेत्र आणि लगतची गावे याठिकाणी वाढलेली काटेरी बाभळीचे कुत्रिम जंगल नष्ट करून इतर प्रजातीच्या वृक्षाची लागवड करण्याची मागणी इको-प्रोने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.यावेळी वनमंत्री यांच्यासोबत झालेल्या चर्चेत उर्जानगर परिसरातील वाघ समस्या आणि त्यावरील उपायाबाबत कार्यवाही करण्याबाबत मुख्य वनसंरक्षक यांना पत्र देण्यात आलेले आहे. उर्जानगर परिसरात बिबट, अस्वल यासोबत आता वाघांचे दर्शन सामान्य नागरिकांना येता-जाता होऊ लागले आहे. यामुळे या परिसरासह लगतच्या गावात मानव-वन्यजीव संघर्ष निर्माण होत आहे. मागील दोन वर्षात अनेक अस्वल वीज केंद्र आणि वेकोलिच्या वसाहतीमधून वनविभागाने पकडून इतरत्र हलविले आहे. मात्र समस्या आजही कायमच आहे, कारण मूळ समस्येवर उपाययोजना होताना दिसत नाहीे. मागील एक वर्षांपासून चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्र व लगतच्या गावातील शिवारात वाघिणीने पिल्लांसह बस्तान मांडले आहे. नुकतेच नवजात पिल्लांसह पुन्हा दुसऱ्या वाघिणीचे दर्शन येथील नागरिकांना झालेले आहे, तसे व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाले होते. एकंदरीत सदर कुत्रीम जंगल हे आता वाघासारख्या प्राण्यांचे प्रजनन केंद्र होत चालले आहे. ही चंद्रपूर शहराकरिता मोठी धोक्याची घंटा आहे. याचा प्रत्यय मागील काही महिन्यांपासून सातत्याने येत आहे.मागील अनेक वर्षांपासून या परिसरांमध्ये काटेरी बाभूळ म्हणजे प्रोसोपिस या प्रजातीच्या वनस्पतीचे कृत्रिम जंगल तयार झालेले आहे. दाटी-वाटीने वाढणाºया या वनस्पतीमुळे जंगलसदृश्य स्थिती निर्माण होते. या परिसरात मोकाट जनावरांची संख्यासुध्दा मोठया प्रमाणात आहेत. त्यामुळे वन्यप्राणी यांना योग्य लपण, खाद्य व पाणी या ठिकाणी मिळते. पूर्वी बिबट आणि अस्वल यांचे वास्तव्य असलेले हे कुत्रिम जंगल वाघांनासुध्दा आकर्षित करू लागल्याचे निवेदनात म्हटले आहे.