शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मानवाधिकाराचे संरक्षण झालेच पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 22:08 IST

मानवाधिकाराशिवाय कोणत्याही व्यक्तीला सन्मानाने जगता येत नाही. जगातील प्रत्येक देशात हीच मागणी ऐरणीवर आहे. त्यामुळे मानवाधिकाराचे संरक्षण झालेच पाहिजे, असे प्रतिपादन अमेरिकेतील अमेरिकेतील एडीनबोरो विद्यापीठाचे संशोधक प्रा. डॉ.जॉर्ज एडवर्ड रिचड यांनी केले. शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयातील ‘मानव अधिकार व दुर्लक्षित समाज’ या विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्राप्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

ठळक मुद्देजार्ज एडवर्ड रिचर्ड : शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मानवाधिकाराशिवाय कोणत्याही व्यक्तीला सन्मानाने जगता येत नाही. जगातील प्रत्येक देशात हीच मागणी ऐरणीवर आहे. त्यामुळे मानवाधिकाराचे संरक्षण झालेच पाहिजे, असे प्रतिपादन अमेरिकेतील अमेरिकेतील एडीनबोरो विद्यापीठाचे संशोधक प्रा. डॉ.जॉर्ज एडवर्ड रिचड यांनी केले. शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयातील ‘मानव अधिकार व दुर्लक्षित समाज’ या विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्राप्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.शांताराम पोटदुखे यांच्या स्मृतीनिमित्त महाविद्यालयाच्या छोटूभाई पटेल स्मृती सभागृहात हा कार्यक्रम झाला. चर्चासत्राला शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञ, संशोधक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. चर्चासत्रात युजीसी मान्यताप्राप्त नियतकालिकेतील ६५ शोधनिबंध प्रकाशित करण्यात आले. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश विकास सिरपूरकर, संस्था उपाध्यक्ष रमेश मामीडवार, सचिव प्रशांत पोटदुखे, प्राचार्य डॉ.अंजली हस्तक, डॉ.ए.पी.पिल्लई, अ‍ॅड. कुमकुम सिरपुरकर आदींची उपस्थिती होती. निवृत्त न्यायमूर्ती सिरपूरकर उद्घाटनपर भाषणात दुर्लक्षित समाजाची व्याख्या स्पष्ट केली.ते म्हणाले, दुर्लक्षित समाज व मानव अधिकार या दोन्ही संकल्पना आजच्या समाज जीवनात अभ्यासणे व त्याचे विश्लेषण करणे काळाची गरज आहे. सिरपूरकर कुटुंबीयांतर्फे अ‍ॅड.एस.वाय. सिरपूरकर व सुनंदा सिरपूरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सुवर्ण पदक प्राप्त विधी विद्यार्थ्यांना प्रायोजित करण्यात येत असल्याची घोषणा केली. माजी प्राचार्य पिल्लई यांनी भारतीय संविधानातील तरतुदींची माहिती दिली.प्राचार्य डॉ. हस्तक प्रास्ताविक, संचालन उपप्राचार्य डॉ. बेन्नी एम.जे. व प्रा.डॉ.पूर्णेदू कार यांनी केले. आभार प्रा.डॉ.मनिषा आवळे यांनी मानले. यावेळी शफीक अहमद, अ‍ॅड. संजय सिरपूरकर, मंजूषा थोडगे, अ‍ॅड. अजित लाभे, अ‍ॅड. पुरुषोत्तम सातपुते, चकनलवार, डॉ. संजयकुमार सिंग उपस्थित होते.प्रथम सत्राचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ.श्रीकांत कोमावार व वक्ते म्हणून डॉ. अशोक पावडे, अ‍ॅड. जयश्री सातपूते, प्राचार्य डॉ. फडणवीस, प्राचार्य डॉ. चांडक, प्रा.डॉ.पंकज काकडे यांनी सत्रात सहअध्यक्ष म्हणून भूमिका पार पाडली. संचालन अ‍ॅड. नंदिता नायर व अ‍ॅड. वनिता लालवाणी यांनी केले.