शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मानवाधिकाराचे संरक्षण झालेच पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 22:08 IST

मानवाधिकाराशिवाय कोणत्याही व्यक्तीला सन्मानाने जगता येत नाही. जगातील प्रत्येक देशात हीच मागणी ऐरणीवर आहे. त्यामुळे मानवाधिकाराचे संरक्षण झालेच पाहिजे, असे प्रतिपादन अमेरिकेतील अमेरिकेतील एडीनबोरो विद्यापीठाचे संशोधक प्रा. डॉ.जॉर्ज एडवर्ड रिचड यांनी केले. शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयातील ‘मानव अधिकार व दुर्लक्षित समाज’ या विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्राप्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

ठळक मुद्देजार्ज एडवर्ड रिचर्ड : शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मानवाधिकाराशिवाय कोणत्याही व्यक्तीला सन्मानाने जगता येत नाही. जगातील प्रत्येक देशात हीच मागणी ऐरणीवर आहे. त्यामुळे मानवाधिकाराचे संरक्षण झालेच पाहिजे, असे प्रतिपादन अमेरिकेतील अमेरिकेतील एडीनबोरो विद्यापीठाचे संशोधक प्रा. डॉ.जॉर्ज एडवर्ड रिचड यांनी केले. शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयातील ‘मानव अधिकार व दुर्लक्षित समाज’ या विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्राप्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.शांताराम पोटदुखे यांच्या स्मृतीनिमित्त महाविद्यालयाच्या छोटूभाई पटेल स्मृती सभागृहात हा कार्यक्रम झाला. चर्चासत्राला शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञ, संशोधक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. चर्चासत्रात युजीसी मान्यताप्राप्त नियतकालिकेतील ६५ शोधनिबंध प्रकाशित करण्यात आले. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश विकास सिरपूरकर, संस्था उपाध्यक्ष रमेश मामीडवार, सचिव प्रशांत पोटदुखे, प्राचार्य डॉ.अंजली हस्तक, डॉ.ए.पी.पिल्लई, अ‍ॅड. कुमकुम सिरपुरकर आदींची उपस्थिती होती. निवृत्त न्यायमूर्ती सिरपूरकर उद्घाटनपर भाषणात दुर्लक्षित समाजाची व्याख्या स्पष्ट केली.ते म्हणाले, दुर्लक्षित समाज व मानव अधिकार या दोन्ही संकल्पना आजच्या समाज जीवनात अभ्यासणे व त्याचे विश्लेषण करणे काळाची गरज आहे. सिरपूरकर कुटुंबीयांतर्फे अ‍ॅड.एस.वाय. सिरपूरकर व सुनंदा सिरपूरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सुवर्ण पदक प्राप्त विधी विद्यार्थ्यांना प्रायोजित करण्यात येत असल्याची घोषणा केली. माजी प्राचार्य पिल्लई यांनी भारतीय संविधानातील तरतुदींची माहिती दिली.प्राचार्य डॉ. हस्तक प्रास्ताविक, संचालन उपप्राचार्य डॉ. बेन्नी एम.जे. व प्रा.डॉ.पूर्णेदू कार यांनी केले. आभार प्रा.डॉ.मनिषा आवळे यांनी मानले. यावेळी शफीक अहमद, अ‍ॅड. संजय सिरपूरकर, मंजूषा थोडगे, अ‍ॅड. अजित लाभे, अ‍ॅड. पुरुषोत्तम सातपुते, चकनलवार, डॉ. संजयकुमार सिंग उपस्थित होते.प्रथम सत्राचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ.श्रीकांत कोमावार व वक्ते म्हणून डॉ. अशोक पावडे, अ‍ॅड. जयश्री सातपूते, प्राचार्य डॉ. फडणवीस, प्राचार्य डॉ. चांडक, प्रा.डॉ.पंकज काकडे यांनी सत्रात सहअध्यक्ष म्हणून भूमिका पार पाडली. संचालन अ‍ॅड. नंदिता नायर व अ‍ॅड. वनिता लालवाणी यांनी केले.