शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

किती ही लूट? ठोक भाजीमार्केटमध्ये कांदा २५ रुपये, तर घराजवळ ३५ रुपये किलो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 05:00 IST

व्यापारी शेतकऱ्यांकडून भाजीपाला खरेदी करुन तो विक्रीसाठी घेऊन येतात. मात्र ज्या दराने तो भाजीपाला शहरांमध्ये विकला जातो. त्यातील पैसे शेतकऱ्यांच्या वाट्याला कमी व दलाल आणि व्यापाऱ्यांच्या वाट्याला जास्त जातात. यामुळे अनेकदा शेतकरी थेट आपल्या शेतातील भाजीपाला विकण्यासाठी स्वत: घेऊन येऊन विक्री करताना दिसून येतात. 

ठळक मुद्देकिलोमागे दहा ते २० रुपयांची लूट : गंजवॉर्डात खरेदीसाठी गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील गंजवॉर्डात भाजीपाल्याचे दर नियंत्रणात आहेत. परंतु, किरकोड मार्केटमध्ये तसेच घराजवळ हातठेल्यावर भाजीपाला विक्रीसाठी येणाऱ्यांच्या भाजीपाल्याच्या दरात दहा ते वीस रुपयांचा फरक दिसून येत आहे. त्यामुळे ग्राहकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. भाजीपाल्याच्या दरात नेहमीच चढउतार होत असते. चंद्रपुरातील गंजवॉर्ड तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती येथे विक्रेत्यासह परिसरातील शेतकरी आपला माल विक्रीसाठी आणत असतात. त्यामुळे येथील दर हे नियंत्रणात असतात. तसेच गंजवाॅर्डात दररोज बाजार भरत असल्याने अनेकजण सकाळच्या वेळेस येथे गर्दी करीत असतात. गंजवॅार्ड तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कांदे २५ रुपये, टमाटर २५ रुपये किलोने विक्री केले जात आहे. परंतु, हातठेलेवाले कांदे ३० ते ३५ रुपये तर टमाटर ३० ते ४० रुपये दराने विक्री करीत              आहेत. 

एवढा फरक कसा 

गंजवॉर्डात तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला स्वस्त मिळतो. याबाबाबत माहिती आहे. परंतु, तेथे पाव, दीडपाव भाजीपाला दिला जात नाही. तसेच घरापासून दूर असल्याने जाणेही परवडत नाही. त्यामुळे घरपोच येणाऱ्यांकडून भाजीपाला खरेदी केला जातो.- प्रतिभा कोडापे, गृहिणी

घरापासून गंजवार्ड दूर येतो. त्यामुळे काही कामानिमित्त त्या परिसरात जाणे झाले तरच तेथून भाजीपाल्याची खरेदी करते. नाहीतर घराकडे येणाऱ्या हातठेल्यावाल्याकडून भाजीपाला खरेदी करतो. गंजवॉर्डपेक्षा घरपोच मिळणारा भाजीपाला महाग असतो.- रंजना खडसे, गृहिणी

कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा २५ रुपये, रामनगर चौकात ३५ रुपये

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ठोक दराने भाजीपाल्याची विक्री केली जाते. अनेक व्यापारी येथेच किरकोळ विक्रीसाठी बसतात. येथे काद्यांची विक्री व टमाटरची विक्री २५ रुपये किलो तर रामनगर येथे ३५ ते ४० रुपये दराने विक्री केली जात आहे. 

पिकवतात शेतकरी, जास्तीचा पैसा तिसऱ्याच्याच हातात!व्यापारी शेतकऱ्यांकडून भाजीपाला खरेदी करुन तो विक्रीसाठी घेऊन येतात. मात्र ज्या दराने तो भाजीपाला शहरांमध्ये विकला जातो. त्यातील पैसे शेतकऱ्यांच्या वाट्याला कमी व दलाल आणि व्यापाऱ्यांच्या वाट्याला जास्त जातात. यामुळे अनेकदा शेतकरी थेट आपल्या शेतातील भाजीपाला विकण्यासाठी स्वत: घेऊन येऊन विक्री करताना दिसून येतात. 

अर्धा-पाव किलोसाठी होलसेल बाजारात जाणे परवडत नाही!गंजवॉर्डात थेट शेतकऱ्यांचा माल विक्रीसाठी असतो. याऊलट हातठेल्यावर विक्री विकणारे कृषी उत्पन्न बाजार समिती तेथून भाजीपाला खरेदी करून त्यात स्वत:चा मुनाफा व मेहनत काढून विक्री करीत असल्याने काही प्रमाणात महाग असतात.-  संजय गेडाम, विक्रेते

कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच गंजवॉर्डात शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी आणतात. व्यापारी खरेदी करून विक्री करतात. त्यामुळे थोड्या कमी दरात भाजीपाला मिळत असतो.- राजू रायपुरे,विक्रेते 

 

 

 

टॅग्स :onionकांदाMarketबाजार