शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तोकड्या जागेत कसे बांधावे घरकूल ?

By admin | Updated: June 11, 2014 23:49 IST

गडचांदूर येथील आगग्रस्तांना त्याच वॉर्डामध्ये जागेच्या सीमा ठरवून ग्रामपंचायत प्रशासनाने प्रत्येक कुटुंबाला ३५० ते ४०० स्केअर फुट जागेचे प्लॉट वाटप करून दिले आहे. परंतु एवढ्या कमी जागेत राहायचे कसे,

नागरिकांमध्ये संताप : ग्रामपंचायत प्रशासनाने पाडले जागेचे हिस्सेरत्नाकर चटप - लखमापूरगडचांदूर येथील आगग्रस्तांना त्याच वॉर्डामध्ये जागेच्या सीमा ठरवून ग्रामपंचायत प्रशासनाने प्रत्येक कुटुंबाला ३५० ते ४०० स्केअर फुट जागेचे प्लॉट वाटप करून दिले आहे. परंतु एवढ्या कमी जागेत राहायचे कसे, घरे कसे उभे करायचे, असा सवाल येथील नागरिक उपस्थित करीत आहेत. आगग्रस्तांच्या म्हणण्यानुसार याआधी प्रत्येक कुटुंबाकडे ७०० ते ८०० तर कुणाकडे १००० चौरस फूट जागा होती. आगीत सर्वच जळून खाक झाल्याने जागेच्या सीमा राहिल्या नाही. त्याप्रमाणात सर्वांना जुन्या प्लॉटप्रमाणे आता जागा देण्यात यायला हवी होती. परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने तसे न करता कमी जागेचे प्लॉट दिलेले आहे. प्रत्येक कुटुंबात चार ते पाच जण राहतात. यात लहान मुलं आणि वृद्धांचीही संख्या आहे. त्यामुळे कमी जागेत कुटुंबियांचा उदरनिर्वाह होणे शक्य नाही. त्यासाठी ग्रामपंचायतीकडून पुनर्वसनाची अपेक्षा होती. परंतु ग्रामपंचायत प्रशासन जखमेवर मीठ चोळत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमध्ये दिसत आहे. सदर वस्ती अतिक्रमणाखाली असून येथे गेल्या २० वर्षांपासून नागरिक राहतात. हक्काचे घर विकत घेता आले नसल्याने व दारिद्रय अधिक प्रमाणात असल्याने टिनाचे पत्रे आणि लाकडी खांब, ताटवे जमा करून राहण्यापुरत्या झोपड्या नगारिकांनी उभ्या केल्या. या वस्तीत गेल्या अनेक वर्षांपासून मुलभूत सुविधांचा अभाव असून पावसाळ्यात चिखल तुडवत मुख्य रस्त्यापर्यंत यावे लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर काही प्रमाणात पाणी टंचाईचा सामनाही नागरिकांना करावा लागत आहे. घरातील सर्वच सदस्य काही ना काही काम करून पोटाची भाकर शोधतात. एक- एक पैसा जमा करून काहींनी घरी टिव्ही, कुलर, कपाट, भांडी आदी वस्तू खरेदी केल्या. मात्र त्याहीे आगीत जळून खाक झाल्याने पुन्हा संसार कसा उभा करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. काही कुटुंबियांकडे बकऱ्या, जनावरे, कोंबड्या, कुत्रे आहेत. त्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांप्रमाणे त्यांचीही जबाबदारी आहे. त्यांच्या निवाऱ्यासाठी अधिक जागा असणे गरजेचे आहे.