शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

तोकड्या जागेत कसे बांधावे घरकूल ?

By admin | Updated: June 11, 2014 23:49 IST

गडचांदूर येथील आगग्रस्तांना त्याच वॉर्डामध्ये जागेच्या सीमा ठरवून ग्रामपंचायत प्रशासनाने प्रत्येक कुटुंबाला ३५० ते ४०० स्केअर फुट जागेचे प्लॉट वाटप करून दिले आहे. परंतु एवढ्या कमी जागेत राहायचे कसे,

नागरिकांमध्ये संताप : ग्रामपंचायत प्रशासनाने पाडले जागेचे हिस्सेरत्नाकर चटप - लखमापूरगडचांदूर येथील आगग्रस्तांना त्याच वॉर्डामध्ये जागेच्या सीमा ठरवून ग्रामपंचायत प्रशासनाने प्रत्येक कुटुंबाला ३५० ते ४०० स्केअर फुट जागेचे प्लॉट वाटप करून दिले आहे. परंतु एवढ्या कमी जागेत राहायचे कसे, घरे कसे उभे करायचे, असा सवाल येथील नागरिक उपस्थित करीत आहेत. आगग्रस्तांच्या म्हणण्यानुसार याआधी प्रत्येक कुटुंबाकडे ७०० ते ८०० तर कुणाकडे १००० चौरस फूट जागा होती. आगीत सर्वच जळून खाक झाल्याने जागेच्या सीमा राहिल्या नाही. त्याप्रमाणात सर्वांना जुन्या प्लॉटप्रमाणे आता जागा देण्यात यायला हवी होती. परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने तसे न करता कमी जागेचे प्लॉट दिलेले आहे. प्रत्येक कुटुंबात चार ते पाच जण राहतात. यात लहान मुलं आणि वृद्धांचीही संख्या आहे. त्यामुळे कमी जागेत कुटुंबियांचा उदरनिर्वाह होणे शक्य नाही. त्यासाठी ग्रामपंचायतीकडून पुनर्वसनाची अपेक्षा होती. परंतु ग्रामपंचायत प्रशासन जखमेवर मीठ चोळत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमध्ये दिसत आहे. सदर वस्ती अतिक्रमणाखाली असून येथे गेल्या २० वर्षांपासून नागरिक राहतात. हक्काचे घर विकत घेता आले नसल्याने व दारिद्रय अधिक प्रमाणात असल्याने टिनाचे पत्रे आणि लाकडी खांब, ताटवे जमा करून राहण्यापुरत्या झोपड्या नगारिकांनी उभ्या केल्या. या वस्तीत गेल्या अनेक वर्षांपासून मुलभूत सुविधांचा अभाव असून पावसाळ्यात चिखल तुडवत मुख्य रस्त्यापर्यंत यावे लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर काही प्रमाणात पाणी टंचाईचा सामनाही नागरिकांना करावा लागत आहे. घरातील सर्वच सदस्य काही ना काही काम करून पोटाची भाकर शोधतात. एक- एक पैसा जमा करून काहींनी घरी टिव्ही, कुलर, कपाट, भांडी आदी वस्तू खरेदी केल्या. मात्र त्याहीे आगीत जळून खाक झाल्याने पुन्हा संसार कसा उभा करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. काही कुटुंबियांकडे बकऱ्या, जनावरे, कोंबड्या, कुत्रे आहेत. त्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांप्रमाणे त्यांचीही जबाबदारी आहे. त्यांच्या निवाऱ्यासाठी अधिक जागा असणे गरजेचे आहे.