शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

तोकड्या जागेत कसे बांधावे घरकूल ?

By admin | Updated: June 11, 2014 23:49 IST

गडचांदूर येथील आगग्रस्तांना त्याच वॉर्डामध्ये जागेच्या सीमा ठरवून ग्रामपंचायत प्रशासनाने प्रत्येक कुटुंबाला ३५० ते ४०० स्केअर फुट जागेचे प्लॉट वाटप करून दिले आहे. परंतु एवढ्या कमी जागेत राहायचे कसे,

नागरिकांमध्ये संताप : ग्रामपंचायत प्रशासनाने पाडले जागेचे हिस्सेरत्नाकर चटप - लखमापूरगडचांदूर येथील आगग्रस्तांना त्याच वॉर्डामध्ये जागेच्या सीमा ठरवून ग्रामपंचायत प्रशासनाने प्रत्येक कुटुंबाला ३५० ते ४०० स्केअर फुट जागेचे प्लॉट वाटप करून दिले आहे. परंतु एवढ्या कमी जागेत राहायचे कसे, घरे कसे उभे करायचे, असा सवाल येथील नागरिक उपस्थित करीत आहेत. आगग्रस्तांच्या म्हणण्यानुसार याआधी प्रत्येक कुटुंबाकडे ७०० ते ८०० तर कुणाकडे १००० चौरस फूट जागा होती. आगीत सर्वच जळून खाक झाल्याने जागेच्या सीमा राहिल्या नाही. त्याप्रमाणात सर्वांना जुन्या प्लॉटप्रमाणे आता जागा देण्यात यायला हवी होती. परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने तसे न करता कमी जागेचे प्लॉट दिलेले आहे. प्रत्येक कुटुंबात चार ते पाच जण राहतात. यात लहान मुलं आणि वृद्धांचीही संख्या आहे. त्यामुळे कमी जागेत कुटुंबियांचा उदरनिर्वाह होणे शक्य नाही. त्यासाठी ग्रामपंचायतीकडून पुनर्वसनाची अपेक्षा होती. परंतु ग्रामपंचायत प्रशासन जखमेवर मीठ चोळत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमध्ये दिसत आहे. सदर वस्ती अतिक्रमणाखाली असून येथे गेल्या २० वर्षांपासून नागरिक राहतात. हक्काचे घर विकत घेता आले नसल्याने व दारिद्रय अधिक प्रमाणात असल्याने टिनाचे पत्रे आणि लाकडी खांब, ताटवे जमा करून राहण्यापुरत्या झोपड्या नगारिकांनी उभ्या केल्या. या वस्तीत गेल्या अनेक वर्षांपासून मुलभूत सुविधांचा अभाव असून पावसाळ्यात चिखल तुडवत मुख्य रस्त्यापर्यंत यावे लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर काही प्रमाणात पाणी टंचाईचा सामनाही नागरिकांना करावा लागत आहे. घरातील सर्वच सदस्य काही ना काही काम करून पोटाची भाकर शोधतात. एक- एक पैसा जमा करून काहींनी घरी टिव्ही, कुलर, कपाट, भांडी आदी वस्तू खरेदी केल्या. मात्र त्याहीे आगीत जळून खाक झाल्याने पुन्हा संसार कसा उभा करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. काही कुटुंबियांकडे बकऱ्या, जनावरे, कोंबड्या, कुत्रे आहेत. त्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांप्रमाणे त्यांचीही जबाबदारी आहे. त्यांच्या निवाऱ्यासाठी अधिक जागा असणे गरजेचे आहे.