शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
3
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
4
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
5
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
6
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
7
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
8
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
9
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
10
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
11
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
12
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
13
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
14
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
15
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
16
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
17
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
18
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
19
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
20
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय

रेतीघाट लिलावाअभावी घरकुलांची बांधकामे प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 06:00 IST

भोजराज गोवर्धन । लोकमत न्यूज नेटवर्क मूल : प्रधानमंत्री व रमाई आवास योजने अंतर्गत मागेल त्याला घरकूल योजना प्रत्येक ...

ठळक मुद्देनागरिकांची मागणी । घाटांचे लिलाव तात्काळ करा

भोजराज गोवर्धन ।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : प्रधानमंत्री व रमाई आवास योजने अंतर्गत मागेल त्याला घरकूल योजना प्रत्येक गावोगावी राबविण्यात येत आहे. मात्र शासनाने तालुक्यातील रेतीघाट लिलाव न केल्याने घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना रेती घ्यावी कुठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने एकीकडे घरकुलाचे तत्काळ बांधकाम करावे, अशी अट घालून दिलेली असताना दुसरीकडे घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी रेती उपलब्ध नसल्याने लाभार्थी सध्या द्विधा मनस्थितीत असून शासनाच्या अशा चुकीच्या धोरणाचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे.तालुक्यात उच्च दर्जाची रेती प्रत्येकच रेतीघाटामध्ये आहे, येथील रेतीघाट घेण्यासाठी मोठी स्पर्धासुध्दा असते. यावर्षी ३० सप्टेंबर रोजी वाळुघाटाची मुदत संपल्यामुळे ज्या कुणी कंत्राटदारानी रेतीचा साठा करून ठेवलेला होता, त्यांना परवानाच्या माध्यमातून विक्री केली, आणि उर्वरित रेतीसाठा विक्री करीत आहेत. त्यांना दरसुध्दा जास्त असतो. यामुळे रेतीसाठा केलेल्या कंत्राटदारांकडून रेती घेणे लाभार्थ्यांना शक्य नाही. दीड महिन्यापासून रेतीघाट लिलाव न झाल्याने घरकुलांचे बांधकाम थांबवून देण्याची पाळी आता लाभार्थ्यांवर आली आहे. महसुल विभागातील अधिकाऱ्यांच्या नजरचुकीने एखाद्या घरकुल लाभार्थ्यांच्या घरी रेती गेली तर त्या अधिकाऱ्यांवरही विनाकारण आरोप केले जाते. यामुळे महसुल प्रशासनातील अधिकारीही आता वेगवेगळे पथक तयार करून रेती घाटाजवळ अधिकाºयांना तैनात करण्यात आले आहे. याचा सर्वसामान्य नागरिकांना फटका बसत आहे.शासनाने शासकीय व खाजगी घरांच्या बांधकामासाठी तालुक्यातील एक रेती घाट वर्षेभरासाठी राखीव ठेवल्यास सर्वसामान्य नागरिकांना घराचे बांधकाम करणे सोयीचे होऊ शकतो, विशेषत: शासनाने ठरवून दिलेल्या नियम व अटीचेही काटेकोपणे पालन केल्या जाईल. त्यासोबतच शासनाच्या महसुलातही मोठया प्रमाणात वाढ होऊ शकतो. मात्र शासनच चुकीचे नियम तयार करून गरजू असलेल्या लाभार्थ्यांना घराचे व इतर बांधकाम करण्यावर अन्याय करीत आहे.तालुक्यात रमाई घरकुल योजनेचे ७८१ तर पंतप्रधान घरकुल योजनेचे १३५ लाभार्थ्यांचे ध्येय निश्चित केले आहे. त्यापैकी अनेक लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम सुरू केलेले आहे. परंतु रेतीघाटांचा लिलाव न झाल्याने अनेक लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम थांबवून दिले आहे. त्यामुळे शासनाने शासनाच्या इमारतीसाठी तालुक्यातील एक रेतीघाट राखीव ठेवण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मंगेश पोटवार यांनी केले आहे.वाळुघाटांचा लिलाव नाही -तहसीलदारमूल तालुक्यातील रेतीघाटांची मुदत ३० सप्टेंबर रोजी समाप्त झाली. त्यानंतर रेतीघाटांचा अजूनतरी लिलाव झालेला नाही, अशी प्रतिक्रिया मूलचे तहसीलदार डी. जी. जाधव यांनी लोकमतला दिली.

टॅग्स :sandवाळू