शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
2
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
3
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
4
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेर नाही आली; दरवाजा तोडला तर...
5
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
6
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
7
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
8
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
9
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
10
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
11
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
12
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
13
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
14
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
15
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
16
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
17
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
18
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन
19
Video - दारूने भरलेले ग्लास, तळलेले शेंगदाणे... बंगळुरूच्या सेंट्रल जेलमध्ये कैद्यांची जंगी पार्टी
20
सत्य साईबाबा: चमत्कारी जीवन, भक्तांमध्ये दिग्गज सेलिब्रेटी, आजही जगभर अनुयायी; काय होते वैशिष्ट्य?

घरकुलासाठी जिल्हाकचेरीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 23:11 IST

घरकूल लाभार्थ्यांना घरे द्या तथा नजूलच्या जागेवर वास्तव्यास असलेल्यांना कायमस्वरुपी पट्टे द्या, या मुख्य मागणीकरिता किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात शेकडो नागरिक मोर्चाच्या स्वरुपात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.

ठळक मुद्देशेकडो लाभार्थ्यांचा सहभाग : घरकुलाचा तात्काळ लाभ द्या

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : घरकूल लाभार्थ्यांना घरे द्या तथा नजूलच्या जागेवर वास्तव्यास असलेल्यांना कायमस्वरुपी पट्टे द्या, या मुख्य मागणीकरिता किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात शेकडो नागरिक मोर्चाच्या स्वरुपात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.जैन भवनजवळून निघालेल्या या मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले होते. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. यावेळी बोलताना किशोर जोरगेवार म्हणाले, अतिशय शांतप्रिय जिल्हा म्हणून चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आहे. असे असले तरी येथील नागरिकांची अन्यायाविरोधात संघर्ष करण्याची क्षमता अद्याप लोप पावलेली नाही. त्यामुळे आमच्यावर अन्यायकारक निर्णय लादण्याची चुक करु नका, आमचा अधिकार हक्काने द्या, अन्यथा रस्त्यावर उतरुन संघर्षातून मिळवू, असा इशाराही त्यांनी दिला.हक्काच घर मिळालेच पाहिजे, असा नारा बुलंद करत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी मोर्चाच्या मार्गावरील महात्मा गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर, बॅ. राजाभाऊ खोब्रागडे, इंदिरा गांधी यांच्या पुतळयाला जोरगेवार यांनी माल्यार्पण केले.मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचताच जोरगेवार यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनीही याबाबत तत्काळ बैठक लावण्याचे आश्वासन जोरगेवार यांना दिले.यावेळी विनोद अनंतवार, सुनील पाटील, अमोल शेंडे, देविदास बानबले, इरफान शेख, सलीम मामू, कांबळेजी, संजय बुटले, वैष्णवी मेश्राम, वंदना, हातगावकर, संतोषी चव्हाण, रजनी चिंचोळकर, शांता धांडे, माला तुरारे, सुजाता बल्ली, विजया बच्छाव, टिकाराम गावंडे, आनंद इंगळे, विनोद दुर्गे, रुपेश पांडे, राशीद हुसैन, ईमरान खान, दीपक पद्मगिरीवार, किशोर बोल्लमवार, सुधीर माजरे, मुन्ना जोगी आदींची उपस्थिती होती.अशी केली थट्टाघरकूल योजनेच्या नावावर शासनाने २१ हजार ७९५ हून अधिक नागरिकांडून अर्ज भरुन घेतले. यातील १९ हजार ७६४ अर्ज पात्र ठरविण्यात आले आहे. तर दोन हजार २२२ अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहे. मात्र यात लाभार्थी ठरलेल्यांना अद्याप घराचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे घरकुल लाभार्थी असूनही हक्काच घर प्रत्यक्षात साकार झालेल नाही. ही या लाभार्थ्यांची एक प्रकारे थट्टा असून शासनाने नागरिकांना फक्त घराचे स्वप्न दाखवून त्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांमध्ये रोष आहें. एकीकडे योजनेतील हक्काच्या घरापासून वंचित ठेवल्या जात आहे. तर दुसरीकडे असलेले घरही नजूलच्या जागेवर असल्याचे कारण समोर करुन त्यांना बेघर करण्याचे काम प्रशासनाकडून केले जात आहे, असा आरोप किशोर जोरगेवार यांनी यावेळी केला.या आहेत मागण्याघरकुल योजनेतील सर्व लाभार्थ्यांना तात्काळ घरकुल बांधून देण्यात यावे, या योजनेतील अटी शिथील करुन अपात्र ठरलेल्या अर्जदारांनाही घकुलाचा लाभ देण्यात यावा, या योजनेची नोंदणी प्रक्रिया पुन्हा सुरु करुन अधिकाधिक नागरिकांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा, नझूलच्या जागेवर घरे बांधून राहत असलेल्या नागरिकांना स्थायीस्वरुपी पट्टे देण्यात यावे, आदी मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे.