शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
2
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
3
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
4
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
5
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
6
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
7
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
8
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
9
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
10
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
11
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
12
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
13
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
14
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
15
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
16
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
17
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
18
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
19
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
20
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन

दरवाढीच्या आशेने कापूस घरातच तुंबून

By admin | Updated: November 28, 2015 02:01 IST

घरात जागा नसतानाही शेतकऱ्यांनी दरवाढीच्या आशेने कापूस घरात भरून ठेवला आहे. काही शेतकऱ्यांनी गरजेपोटी कवडीमोल भावात कापसाची विक्री करून आपली अडचण भागविली.

शेतकऱ्यांना जागेची पंचाईत : मायबाप सरकारवरच दरवाढीची आसप्रकाश काळे गोवरीघरात जागा नसतानाही शेतकऱ्यांनी दरवाढीच्या आशेने कापूस घरात भरून ठेवला आहे. काही शेतकऱ्यांनी गरजेपोटी कवडीमोल भावात कापसाची विक्री करून आपली अडचण भागविली. मात्र मायबाप सरकार आतातरी शेतकऱ्यांवर मेहरबान होईल आणि कापूस दरवाढ करेल, या एकाच आशेवर शेतकऱ्यांनी घरीच कापूस ‘हाऊसफुल’ करून ठेवला आहे.कापूस पिकाचे दिवस आज वाईट आले आहे. विदर्भातील कापूस शेतकऱ्यांचे नगदी पीक आहे. शेतकऱ्यांचा वर्षभराचा बजेट कापूस या एकमेव पिकांवर अवलंबून असतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली. उसनवारीने कर्ज काढून शेती पिकविली. मायबाप सरकार कापसाला यावर्षी चांगला भाव देईल, अशी आस शेतकऱ्यांना होती. मात्र सरकारने मागील वर्षीच्या तुलनेत केवळ ५० रुपये दरवाढ करून शेतकऱ्यांच्या तोंडाला यावर्षीही पाने पुसली. शेतकऱ्यांची अवस्था आज वाईट असताना, त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून त्यांना धीर देणारे एकही राजकीय पुढारी शेतकऱ्यांचे दु:ख जाणून घ्यायला तयार नाही. अनेक शेतकऱ्यांनी कापसाची कवडीमोल भावात विक्री करून आपली अडचण भागविली. शासनाने जाहीर केलेला चार हजार १०० रुपये हमीभाव म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर तात्पुरती मलमपट्टी लावण्यासारखा आहे. एवढ्या कमी कापूस दराने शेतकऱ्यांनी केलेला खर्चही भरून निघणार नाही. मग शेतकऱ्यांनी नुकसान सहन करून कापूस विकायचा काय, हा एकच प्रश्न शेतकऱ्यांना छळतो आहे. मात्र शेतकऱ्यांच्या दु:खावर शासकीय यंत्रणेला कायमस्वरूपी उपाय शोधता आलेले नाही.कापूस घरी भरून ठेवला असल्याने शेतकऱ्यांच्या घरी राहायलाही जागा शिल्लक नाही. अनेक शेतकऱ्यांच्या घरी जागेअभावी कापसावरच झोपून रात्रं काढत आहेत. मात्र हे शेतकऱ्यांचे धकधकते वास्तव एकाही राजकीय पुढाऱ्यांना का दिसत नाही, हा एकच सवाल शेतकऱ्यांच्या काळजाला पिळ पाडणारा आहे. निवडणूक काळात शेतकऱ्यांच्या काळजातून बोलणारे राजकीय नेते कुठे गेले, हे आता कळायला मार्ग नाही. कापूस दरवाढीसाठी वेळप्रसंगी जिवाची बाजी लावून रस्त्यावर उतरणारे शेतकऱ्यांचे कैवारी दोन-चार वर्षात कुठे आंदोलन करताना दिसले नाही आणि तसे केलेही असेल. तरी ही हाक मायबाप सरकारला का ऐकता आली नाही, यावर आज विचारमंथन करण्याची वेळ आली आहे.