शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

दरवाढीच्या आशेने कापूस घरातच तुंबून

By admin | Updated: November 28, 2015 02:01 IST

घरात जागा नसतानाही शेतकऱ्यांनी दरवाढीच्या आशेने कापूस घरात भरून ठेवला आहे. काही शेतकऱ्यांनी गरजेपोटी कवडीमोल भावात कापसाची विक्री करून आपली अडचण भागविली.

शेतकऱ्यांना जागेची पंचाईत : मायबाप सरकारवरच दरवाढीची आसप्रकाश काळे गोवरीघरात जागा नसतानाही शेतकऱ्यांनी दरवाढीच्या आशेने कापूस घरात भरून ठेवला आहे. काही शेतकऱ्यांनी गरजेपोटी कवडीमोल भावात कापसाची विक्री करून आपली अडचण भागविली. मात्र मायबाप सरकार आतातरी शेतकऱ्यांवर मेहरबान होईल आणि कापूस दरवाढ करेल, या एकाच आशेवर शेतकऱ्यांनी घरीच कापूस ‘हाऊसफुल’ करून ठेवला आहे.कापूस पिकाचे दिवस आज वाईट आले आहे. विदर्भातील कापूस शेतकऱ्यांचे नगदी पीक आहे. शेतकऱ्यांचा वर्षभराचा बजेट कापूस या एकमेव पिकांवर अवलंबून असतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली. उसनवारीने कर्ज काढून शेती पिकविली. मायबाप सरकार कापसाला यावर्षी चांगला भाव देईल, अशी आस शेतकऱ्यांना होती. मात्र सरकारने मागील वर्षीच्या तुलनेत केवळ ५० रुपये दरवाढ करून शेतकऱ्यांच्या तोंडाला यावर्षीही पाने पुसली. शेतकऱ्यांची अवस्था आज वाईट असताना, त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून त्यांना धीर देणारे एकही राजकीय पुढारी शेतकऱ्यांचे दु:ख जाणून घ्यायला तयार नाही. अनेक शेतकऱ्यांनी कापसाची कवडीमोल भावात विक्री करून आपली अडचण भागविली. शासनाने जाहीर केलेला चार हजार १०० रुपये हमीभाव म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर तात्पुरती मलमपट्टी लावण्यासारखा आहे. एवढ्या कमी कापूस दराने शेतकऱ्यांनी केलेला खर्चही भरून निघणार नाही. मग शेतकऱ्यांनी नुकसान सहन करून कापूस विकायचा काय, हा एकच प्रश्न शेतकऱ्यांना छळतो आहे. मात्र शेतकऱ्यांच्या दु:खावर शासकीय यंत्रणेला कायमस्वरूपी उपाय शोधता आलेले नाही.कापूस घरी भरून ठेवला असल्याने शेतकऱ्यांच्या घरी राहायलाही जागा शिल्लक नाही. अनेक शेतकऱ्यांच्या घरी जागेअभावी कापसावरच झोपून रात्रं काढत आहेत. मात्र हे शेतकऱ्यांचे धकधकते वास्तव एकाही राजकीय पुढाऱ्यांना का दिसत नाही, हा एकच सवाल शेतकऱ्यांच्या काळजाला पिळ पाडणारा आहे. निवडणूक काळात शेतकऱ्यांच्या काळजातून बोलणारे राजकीय नेते कुठे गेले, हे आता कळायला मार्ग नाही. कापूस दरवाढीसाठी वेळप्रसंगी जिवाची बाजी लावून रस्त्यावर उतरणारे शेतकऱ्यांचे कैवारी दोन-चार वर्षात कुठे आंदोलन करताना दिसले नाही आणि तसे केलेही असेल. तरी ही हाक मायबाप सरकारला का ऐकता आली नाही, यावर आज विचारमंथन करण्याची वेळ आली आहे.