शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

दरवाढीच्या आशेने कापूस घरातच तुंबून

By admin | Updated: November 28, 2015 02:01 IST

घरात जागा नसतानाही शेतकऱ्यांनी दरवाढीच्या आशेने कापूस घरात भरून ठेवला आहे. काही शेतकऱ्यांनी गरजेपोटी कवडीमोल भावात कापसाची विक्री करून आपली अडचण भागविली.

शेतकऱ्यांना जागेची पंचाईत : मायबाप सरकारवरच दरवाढीची आसप्रकाश काळे गोवरीघरात जागा नसतानाही शेतकऱ्यांनी दरवाढीच्या आशेने कापूस घरात भरून ठेवला आहे. काही शेतकऱ्यांनी गरजेपोटी कवडीमोल भावात कापसाची विक्री करून आपली अडचण भागविली. मात्र मायबाप सरकार आतातरी शेतकऱ्यांवर मेहरबान होईल आणि कापूस दरवाढ करेल, या एकाच आशेवर शेतकऱ्यांनी घरीच कापूस ‘हाऊसफुल’ करून ठेवला आहे.कापूस पिकाचे दिवस आज वाईट आले आहे. विदर्भातील कापूस शेतकऱ्यांचे नगदी पीक आहे. शेतकऱ्यांचा वर्षभराचा बजेट कापूस या एकमेव पिकांवर अवलंबून असतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली. उसनवारीने कर्ज काढून शेती पिकविली. मायबाप सरकार कापसाला यावर्षी चांगला भाव देईल, अशी आस शेतकऱ्यांना होती. मात्र सरकारने मागील वर्षीच्या तुलनेत केवळ ५० रुपये दरवाढ करून शेतकऱ्यांच्या तोंडाला यावर्षीही पाने पुसली. शेतकऱ्यांची अवस्था आज वाईट असताना, त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून त्यांना धीर देणारे एकही राजकीय पुढारी शेतकऱ्यांचे दु:ख जाणून घ्यायला तयार नाही. अनेक शेतकऱ्यांनी कापसाची कवडीमोल भावात विक्री करून आपली अडचण भागविली. शासनाने जाहीर केलेला चार हजार १०० रुपये हमीभाव म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर तात्पुरती मलमपट्टी लावण्यासारखा आहे. एवढ्या कमी कापूस दराने शेतकऱ्यांनी केलेला खर्चही भरून निघणार नाही. मग शेतकऱ्यांनी नुकसान सहन करून कापूस विकायचा काय, हा एकच प्रश्न शेतकऱ्यांना छळतो आहे. मात्र शेतकऱ्यांच्या दु:खावर शासकीय यंत्रणेला कायमस्वरूपी उपाय शोधता आलेले नाही.कापूस घरी भरून ठेवला असल्याने शेतकऱ्यांच्या घरी राहायलाही जागा शिल्लक नाही. अनेक शेतकऱ्यांच्या घरी जागेअभावी कापसावरच झोपून रात्रं काढत आहेत. मात्र हे शेतकऱ्यांचे धकधकते वास्तव एकाही राजकीय पुढाऱ्यांना का दिसत नाही, हा एकच सवाल शेतकऱ्यांच्या काळजाला पिळ पाडणारा आहे. निवडणूक काळात शेतकऱ्यांच्या काळजातून बोलणारे राजकीय नेते कुठे गेले, हे आता कळायला मार्ग नाही. कापूस दरवाढीसाठी वेळप्रसंगी जिवाची बाजी लावून रस्त्यावर उतरणारे शेतकऱ्यांचे कैवारी दोन-चार वर्षात कुठे आंदोलन करताना दिसले नाही आणि तसे केलेही असेल. तरी ही हाक मायबाप सरकारला का ऐकता आली नाही, यावर आज विचारमंथन करण्याची वेळ आली आहे.