शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

कापूस उत्पादक शेतकऱ्यांची भाववाढीची आशा मावळली

By admin | Updated: December 27, 2015 01:26 IST

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचे नुकतेच सूप वाजले. यात विदर्भातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या कापूस व धानाला वाढीव भाव मिळेल, ....

अधिवेशन संपले : कापसाच्या भावाला उतरती कळानांदाफाटा : नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचे नुकतेच सूप वाजले. यात विदर्भातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या कापूस व धानाला वाढीव भाव मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र अधिवेशन संपूनही कापूस व धानाचे भाव मात्र समाधानकारक वाढल्याचे दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत निराशा पसरली आहे.कापसाला सहा हजार व धानाला चार हजार रुपये भाव मिळावा, यासाठी यापूर्वी विरोधी पक्षात असताना मुख्यमंत्र्यांनी आंदोलने केली. देशाच्या पंतप्रधानांनीही ५० टक्के नफा अधिक उत्पादन खर्च भरून निघेल इतका हमी भाव देण्याचे आश्वासन निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिले. परंतु अधिवेशनात कापूस व धान उत्पादक शेतकऱ्यांबाबत काहीच निर्णय न घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. कृषी विद्यापीठाच्या परीक्षण अहवालानुसार कापसाला साधरणत: सहा हजार ८०० व धानाला पाच हजार रुपये भाव देण्याची शिफारस करण्यात आली आहे. यातच खते व बियाण्यांच्या वाढत्या किंमतीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाल्याचे दिसते. यावर्षी कापसाला ४ हजार १०० हमीभाव जाहीर करण्यात आला. गरजेपोटी मोठ्या प्रमाणात पीक घेणाऱ्या कोरपना, जिवती, राजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी अर्धाधिक कापूस लगतच्या यवतमाळ, आदिलाबाद जिल्ह्यात विक्री केला आहे. वाहतूक खर्च व मजुरांची मजुरी बघता मोठा आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. त्यामुळे कापूस व धान उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. काही दिवसाआधी कापसाच्या भावात २०० ते ३०० रुपयांची वाढ झाली. बाजारात ४ हजार ४०० रुपयांपर्यंत कापसाची खरेदी करण्यात आली. परंतु दोन दिवसांतच चित्र पालटले आणि आता कापसाला चार हजार रुपयात विक्री करावी लागत आहे. यातच शासनाची अनेक केंद्रावरील खरेदीही बंद असल्याचे दिसते. नगदी पीक म्हणून समजल्या जाणाऱ्या कापूस व धान उत्पादक शेतकऱ्यांना कवडीमोल भावात पिकाची विक्री करावी लागत आहे. एकीकडे शासन शेतकऱ्यांना अनेक योजनांची खिरापत वाटप करीत असले तरी दुसरीकडे उत्पादित केलेल्या मालाला भाव मिळत नसल्याचे वास्तव आहे. (वार्ताहर)