शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

ग्रामसभा बळकट करणे हीच दादांना घरी श्रद्धांजली

By admin | Updated: June 9, 2017 00:51 IST

८ जून २००६ रोजी अड्याळ टेकडीचे शिल्पकार गीताचार्य तुकारामदादा यांनी इहलोकीचा प्रवास संपविला असला तरी ..

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : ८ जून २००६ रोजी अड्याळ टेकडीचे शिल्पकार गीताचार्य तुकारामदादा यांनी इहलोकीचा प्रवास संपविला असला तरी त्यांच्या स्वप्नातील खेडे घडविण्यासाठी ग्रामसभांना मजबूत कसे करता येईल, याचा सांगोपांग विचार करून समस्त गुरूदेवभक्तांनी गीताचार्यांना श्रद्धांजली अर्पण केली.गीताचार्य तुकाराम दादा यांनी आपले अख्खे आयुष्य ग्रामगितेवर आधारित खेडे स्वयंभू कसे होतील, यासाठी खर्ची घातले. त्याचा उत्तम प्रयोग त्यांनी अड्याळ टेकडीवर केला. कुठलीही शासकीय मदत न घेता केवळ श्रमदानातून गावगणराज्याचे नंदनवन फुलविले. आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांचे कार्य सुरू होते. अड्याळ टेकडीवर दरवर्षी गीताचार्य तुकाराम दादा यांचा ८ जून रोजी स्मृतीदिन आयोजित करण्यात येतो. कोणाला कोणते निमंत्रण नाही. कोणाला कोणता सांगावा नाही. केवळ दादांवर असलेल्या श्रद्धेपोटी संपूर्ण विदर्भातून शेकडो गुरूदेवभक्त गुरुवारी अड्याळ टेकडीवर एकत्र आले होते. ज्या ठिकाणी दादांना चिरशांती देण्यात आली. अगदी त्याच ठिकाणी या गुरूदेवभक्तांनी एकत्र येवून दादांना श्रद्धांजली अर्पण केली. याठिकाणी झालेल्या सभेत दादांच्या स्वप्नातील गाव निर्माण करण्यासाठी ग्रामसभा कशा मजबुत करता येतील, यावर विचारमंथन करण्यात आले.जल, जंगल आणि जमीन यावर ग्रामसभेचा अधिकार आहे. एरवी ग्रामसभांना लोक येत नसले तरी ग्रामसभेच्या माध्यमातून रोजगाराची निर्मिती झाली तर लोकांचे ग्रामसभेकडे आकर्षण वाढेल आणि ते ग्रामसभांना हजेरी लावतील. यासाठी ग्रामसभेतून रोजगार निर्मिती कशी होईल, याचा विचार करण्यात आला. ग्रामसभेच्या अधिकाराची माहिती देण्यात आली. ग्रामसभांच्या बळकटीकरणासाठी गुरुदेवभक्तांनी पुढे आले पाहिजे. हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल. असे विचारही व्यक्त करण्यात आले.