शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

पोकळ शेंगामुळे सोयाबीनची उतारी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 22:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोवरी : कमी पावसामुळे यावर्षी सोयाबीनला पोकळ शेंगा लागल्याने सोयाबीनच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. राजुरा ...

ठळक मुद्देएकरी तीन पोते सोयाबीन उत्पादन : कमी पावसाचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : कमी पावसामुळे यावर्षी सोयाबीनला पोकळ शेंगा लागल्याने सोयाबीनच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. राजुरा तालुक्यात बहुतांश ठिकाणी कमी पाऊस झाल्याने सोयाबीनच्या शेंगा भरल्या नाही. त्यामुळे काही शेतकऱ्यांना एकरी तीन पोते सोयाबीनचे उत्पादन झाल्याने शेतकऱ्यांना सोयाबीन पिकावर केलेला खर्चही भरून निघाला नाही. त्यामुळे यंदा पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.यावर्षी बऱ्यापैकी पाउस येईल या आशेवर शेतकरी असतानाच गुलाबी बोंडअळीच्या भीतीपोटी यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची लागवड केली होती. सोयाबीन हे तीन महिन्याच्या कालावधीत होणारे पीक असल्याने दिवाळीत आर्थिक चणचण भागविण्यासाठी शेतकरी सोयाबीनचे उत्पादन घेतो. परंतू यावर्षी सोयाबीनच्या शेंगात दाणा भरत असतानाच अचानक पाऊस गायब झाला. पावसाअभावी सोयाबीनच्या शेंगात दाणा भरला नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीनला पोकळ शेंगा लागल्या. या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय होती, त्या शेतकऱ्यांनी सोयाबीनला पाणी देऊन कसेबसे सोयाबीनचे पीक जगविले.यावर्षी पावसाने शेतकऱ्यांना दगा दिला. ऐनवेळी पिकांच्या भरणीवर पाऊस आला नाही. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. राजुरा तालुक्यातील बहुतांश भागात पाऊस पडला नसल्याने त्याचा शेतकऱ्यांवर मोठा परिणाम झाला आहे . ज्या ठिकाणी वेळेवर पाऊस झाला त्या ठिकाणी सोयाबीनचे उत्पादन बऱ्यांपैकी झाले आहे. तर काही शेतकºयांना पावसाअभावी एकरी तीन पोते सोयाबीनचे एवढे कमी उत्पादन झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.शेतमाल हमीभावाचा कायदा गेला कुठे?शासनाने शेतमाल हमीभावाचा कायदा केला आहे. शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा व्यापाऱ्यांना व कृषी उत्पन्न बाजार समित्यांना कमी भावात शेतमाल खरेदी करता येणार नाही, असा कायदा करण्यात आला. हमीभावापेक्षा शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करून दंडाची तरतूद कायद्यात आहे. परंंतू व्यापाऱ्यांकडून शेतमाल हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी करीत असल्याने शेतमाल हमीभावाचा कायदा गेला कुठे, असा सवाल शेतकरी विचारत आहे.माझ्या अडीच एकर शेतात यंदा सोयाबीनचे पीक घेतले होते. परंतु पावसाअभावी सोयाबीनचा दाणा भरला नाही. त्यामुळे सोयाबीनला पोकळ शेंगा लागून उत्पादनात घट झाली आहे.-प्रमोदन गजानन लांडे, शेतकरी, गोवरी