शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

पोकळ शेंगामुळे सोयाबीनची उतारी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 22:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोवरी : कमी पावसामुळे यावर्षी सोयाबीनला पोकळ शेंगा लागल्याने सोयाबीनच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. राजुरा ...

ठळक मुद्देएकरी तीन पोते सोयाबीन उत्पादन : कमी पावसाचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : कमी पावसामुळे यावर्षी सोयाबीनला पोकळ शेंगा लागल्याने सोयाबीनच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. राजुरा तालुक्यात बहुतांश ठिकाणी कमी पाऊस झाल्याने सोयाबीनच्या शेंगा भरल्या नाही. त्यामुळे काही शेतकऱ्यांना एकरी तीन पोते सोयाबीनचे उत्पादन झाल्याने शेतकऱ्यांना सोयाबीन पिकावर केलेला खर्चही भरून निघाला नाही. त्यामुळे यंदा पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.यावर्षी बऱ्यापैकी पाउस येईल या आशेवर शेतकरी असतानाच गुलाबी बोंडअळीच्या भीतीपोटी यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची लागवड केली होती. सोयाबीन हे तीन महिन्याच्या कालावधीत होणारे पीक असल्याने दिवाळीत आर्थिक चणचण भागविण्यासाठी शेतकरी सोयाबीनचे उत्पादन घेतो. परंतू यावर्षी सोयाबीनच्या शेंगात दाणा भरत असतानाच अचानक पाऊस गायब झाला. पावसाअभावी सोयाबीनच्या शेंगात दाणा भरला नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीनला पोकळ शेंगा लागल्या. या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय होती, त्या शेतकऱ्यांनी सोयाबीनला पाणी देऊन कसेबसे सोयाबीनचे पीक जगविले.यावर्षी पावसाने शेतकऱ्यांना दगा दिला. ऐनवेळी पिकांच्या भरणीवर पाऊस आला नाही. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. राजुरा तालुक्यातील बहुतांश भागात पाऊस पडला नसल्याने त्याचा शेतकऱ्यांवर मोठा परिणाम झाला आहे . ज्या ठिकाणी वेळेवर पाऊस झाला त्या ठिकाणी सोयाबीनचे उत्पादन बऱ्यांपैकी झाले आहे. तर काही शेतकºयांना पावसाअभावी एकरी तीन पोते सोयाबीनचे एवढे कमी उत्पादन झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.शेतमाल हमीभावाचा कायदा गेला कुठे?शासनाने शेतमाल हमीभावाचा कायदा केला आहे. शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा व्यापाऱ्यांना व कृषी उत्पन्न बाजार समित्यांना कमी भावात शेतमाल खरेदी करता येणार नाही, असा कायदा करण्यात आला. हमीभावापेक्षा शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करून दंडाची तरतूद कायद्यात आहे. परंंतू व्यापाऱ्यांकडून शेतमाल हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी करीत असल्याने शेतमाल हमीभावाचा कायदा गेला कुठे, असा सवाल शेतकरी विचारत आहे.माझ्या अडीच एकर शेतात यंदा सोयाबीनचे पीक घेतले होते. परंतु पावसाअभावी सोयाबीनचा दाणा भरला नाही. त्यामुळे सोयाबीनला पोकळ शेंगा लागून उत्पादनात घट झाली आहे.-प्रमोदन गजानन लांडे, शेतकरी, गोवरी