शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

दुर्लक्षित सार्वजनिक विहिरी झाल्या हायटेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 22:59 IST

शहरात असलेल्या ४० सार्वजनिक विहिरी जीर्ण अवस्थेत व दुर्लक्षित असल्याने त्याचा वापर भविष्यात होऊ शकतो.

ठळक मुद्देपाण्याची पातळी वाढली : पाणी टंचाईच्यावेळी पाण्याचा वापर

राजू गेडाम ।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : शहरात असलेल्या ४० सार्वजनिक विहिरी जीर्ण अवस्थेत व दुर्लक्षित असल्याने त्याचा वापर भविष्यात होऊ शकतो. ही बाब मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या लक्षात आल्यानंतर राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना माहिती देऊन पाणी टंचाईच्या वेळी त्याचा वापर होऊ शकतो, याची कल्पना विस्तृतपणे सांगितल्यानंतर सार्वजनिक विहिरीची दुरुस्ती करण्यात हिरवी झेंडी देण्यात आली. आणि काय आश्चर्य विहिरीतील उपसा करुन डागडजी केल्याने सदर दुर्लक्षित विहिरी हायटेक झाल्याचे दिसून येत आहे.नेहमी दुर्लक्षित असलेल्या विहिरी आज पाण्याने व्याप्त असून टंचाईच्या वेळी त्याचा वापर होणार असल्याने पाण्याचे स्त्रोत वाढण्यास मदत झाली आहे.नगर परिषद मूल अंतर्गत येणाºया विविध वॉर्डात ४० सार्वजनिक विहिरी आहेत. सदर विहिरी दुर्लक्षित असल्याने त्यातील पाण्याचा वापर तर सोडाच त्या विहिरीकडे ढुंकूनसुद्धा कुणी बघत नव्हते. घाणीच्या साम्राज्यात असलेल्या विहिरी दुर्लक्षितपणामुळे ओस पडल्या होत्या. या ठिकाणी एखाद्यावेळी अनुचित प्रकार घडण्याची भीतीही तेवढीच होती. नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी सार्वजनिक विहिरीबाबत काय करता येईल, याबाबत इंटरनेटचा वापर करुन माहिती शोधली. विहिरीना मूर्त रुप देता येऊ शकते, ही बाब त्यांच्या लक्षात आल्यानंतर नगराध्यक्ष प्राचार्य रत्नमाला भोयर व पदाधिकारी, नगरसेवक यांच्या लक्षात आणून दिली. तसेच जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या कक्षात राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत सार्वजनिक विहिरीबाबतची माहिती देण्यात आली. त्याला ना. मुनगंटीवार यांनी संमती देताच मुख्याधिकारी सरनाईक यांनी पाणी पुरवठा विभागाचे विनोद येनूरकर यांना कल्पना व सविस्तर माहिती देऊन कामाला सुरुवात करण्यात आली. प्रथमत: प्रायोगिक तत्वावर १० सार्वजनिक विहिरीतील गाळ उपसण्यात आला. डागडुजी करुन विहिरीला अप्रतिम रंगविण्यात आले. त्यामुळे आजच्या स्थितीत विहिरी स्वच्छ व सुंदर दिसत आहेत. विहीरीतील पाण्याची पातळी तर वाढली त्याच बरोबरच दुर्लक्षित असलेल्या विहिरी सर्वांचे लक्ष वेधत असल्याचे दिसून येते. वरील विहिरीतील पाण्याचे नमुने वेध शाळेत नेऊन तपासणी केली जाणार आहे. पाणी वापरण्याजोगे करण्यासाठी काय करता येईल. याबाबत पाण्याच्या नमून्यातील निकाल आल्यानंतर कार्यवाही केली जाणार आहे. तूर्तास पाण्याची पातळी वाढली असल्याने व विहिरी सुशोभिते दिसत असल्याने सर्वाचे लक्ष वेधत असून सार्वजनिक कामासाठी पाण्याचा वापर केला जाऊ शकतो. या विहिरींचा कायापालट करण्यासाठी मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी केलेला प्रयोग सर्वांना दिशा देणारा ठरणार आहे. भौतिक विकासाबरोबर शाश्वत विकास महत्वाचा असून तो चिरंतर टिकणारा आहे. छोट्या- छोट्या बाबीतून कल्पना सूचल्या तर त्याचा उपयोग जनसामान्यांना होऊ शकतो, हेच यावरुन दिसून येते.