शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

दुर्लक्षित सार्वजनिक विहिरी झाल्या हायटेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 22:59 IST

शहरात असलेल्या ४० सार्वजनिक विहिरी जीर्ण अवस्थेत व दुर्लक्षित असल्याने त्याचा वापर भविष्यात होऊ शकतो.

ठळक मुद्देपाण्याची पातळी वाढली : पाणी टंचाईच्यावेळी पाण्याचा वापर

राजू गेडाम ।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : शहरात असलेल्या ४० सार्वजनिक विहिरी जीर्ण अवस्थेत व दुर्लक्षित असल्याने त्याचा वापर भविष्यात होऊ शकतो. ही बाब मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या लक्षात आल्यानंतर राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना माहिती देऊन पाणी टंचाईच्या वेळी त्याचा वापर होऊ शकतो, याची कल्पना विस्तृतपणे सांगितल्यानंतर सार्वजनिक विहिरीची दुरुस्ती करण्यात हिरवी झेंडी देण्यात आली. आणि काय आश्चर्य विहिरीतील उपसा करुन डागडजी केल्याने सदर दुर्लक्षित विहिरी हायटेक झाल्याचे दिसून येत आहे.नेहमी दुर्लक्षित असलेल्या विहिरी आज पाण्याने व्याप्त असून टंचाईच्या वेळी त्याचा वापर होणार असल्याने पाण्याचे स्त्रोत वाढण्यास मदत झाली आहे.नगर परिषद मूल अंतर्गत येणाºया विविध वॉर्डात ४० सार्वजनिक विहिरी आहेत. सदर विहिरी दुर्लक्षित असल्याने त्यातील पाण्याचा वापर तर सोडाच त्या विहिरीकडे ढुंकूनसुद्धा कुणी बघत नव्हते. घाणीच्या साम्राज्यात असलेल्या विहिरी दुर्लक्षितपणामुळे ओस पडल्या होत्या. या ठिकाणी एखाद्यावेळी अनुचित प्रकार घडण्याची भीतीही तेवढीच होती. नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी सार्वजनिक विहिरीबाबत काय करता येईल, याबाबत इंटरनेटचा वापर करुन माहिती शोधली. विहिरीना मूर्त रुप देता येऊ शकते, ही बाब त्यांच्या लक्षात आल्यानंतर नगराध्यक्ष प्राचार्य रत्नमाला भोयर व पदाधिकारी, नगरसेवक यांच्या लक्षात आणून दिली. तसेच जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या कक्षात राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत सार्वजनिक विहिरीबाबतची माहिती देण्यात आली. त्याला ना. मुनगंटीवार यांनी संमती देताच मुख्याधिकारी सरनाईक यांनी पाणी पुरवठा विभागाचे विनोद येनूरकर यांना कल्पना व सविस्तर माहिती देऊन कामाला सुरुवात करण्यात आली. प्रथमत: प्रायोगिक तत्वावर १० सार्वजनिक विहिरीतील गाळ उपसण्यात आला. डागडुजी करुन विहिरीला अप्रतिम रंगविण्यात आले. त्यामुळे आजच्या स्थितीत विहिरी स्वच्छ व सुंदर दिसत आहेत. विहीरीतील पाण्याची पातळी तर वाढली त्याच बरोबरच दुर्लक्षित असलेल्या विहिरी सर्वांचे लक्ष वेधत असल्याचे दिसून येते. वरील विहिरीतील पाण्याचे नमुने वेध शाळेत नेऊन तपासणी केली जाणार आहे. पाणी वापरण्याजोगे करण्यासाठी काय करता येईल. याबाबत पाण्याच्या नमून्यातील निकाल आल्यानंतर कार्यवाही केली जाणार आहे. तूर्तास पाण्याची पातळी वाढली असल्याने व विहिरी सुशोभिते दिसत असल्याने सर्वाचे लक्ष वेधत असून सार्वजनिक कामासाठी पाण्याचा वापर केला जाऊ शकतो. या विहिरींचा कायापालट करण्यासाठी मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी केलेला प्रयोग सर्वांना दिशा देणारा ठरणार आहे. भौतिक विकासाबरोबर शाश्वत विकास महत्वाचा असून तो चिरंतर टिकणारा आहे. छोट्या- छोट्या बाबीतून कल्पना सूचल्या तर त्याचा उपयोग जनसामान्यांना होऊ शकतो, हेच यावरुन दिसून येते.