शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
3
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
4
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
5
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
6
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
7
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
8
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
9
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
10
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
11
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
12
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
13
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
14
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
15
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
16
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
18
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
19
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
20
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी

ऐतिहासिक किल्ला स्मारक संवर्धन काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 23:14 IST

शहरात सुरू असलेले गोंडकालीन ऐतिहासिक किल्ला स्वच्छता अभियान हे देशातील ऐतिहासिक स्मारक संवर्धनाच्या दृष्टीने तसेच स्वच्छतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहे. तसेच अनेक शहरांना आणी युवकांना मार्गदर्शक ठरणारे आहे. ऐतिहासिक किल्ल्यामध्ये मोठा इतिहास आहे. त्यामुळे ऐतिहासिक किल्ला स्मारकांचे संवर्धन होणे काळाजी गरज असल्याचे मत पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देप्रकाश आमटे : चंद्रपुरातील किल्ला स्वच्छता अभियानाला भेट

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरात सुरू असलेले गोंडकालीन ऐतिहासिक किल्ला स्वच्छता अभियान हे देशातील ऐतिहासिक स्मारक संवर्धनाच्या दृष्टीने तसेच स्वच्छतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहे. तसेच अनेक शहरांना आणी युवकांना मार्गदर्शक ठरणारे आहे. ऐतिहासिक किल्ल्यामध्ये मोठा इतिहास आहे. त्यामुळे ऐतिहासिक किल्ला स्मारकांचे संवर्धन होणे काळाजी गरज असल्याचे मत पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले.शहरातील ऐतिहासिक गोंडकालीन किल्ला स्वच्छता अभियानाची पाहणी तसेच श्रमदानात सहभागी सदस्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने सोमवारी पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे व डॉ मंदाकिनी आमटे यांनी चंद्रपूर किल्ल्यावर भेट दिली. यावेळी ते बोलत होते. इको-प्रोतर्फे सुरू करण्यात आलेल्या चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियानास ५९५ दिवस पूर्ण झाले आहे. किल्ला स्वच्छतासोबतच इको-प्रोचे जिल्ह्यातील इतर स्मारकांबाबतसुध्दा कार्य सुरू झालेले आहे. या अभियानासोबतच जिल्हा प्रशासन व पुरातत्व विभागाव्दारे जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा संरक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने योग्य पावले उचलली जात आहे. या अभियानाची पाहणी करण्यास विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी भेट दिली असून अभियानातील श्रमदान करणारे कार्यकत्यांचे मनोबल वाढविण्यास त्यांना प्रोत्साहन दिले आहे. तसेच किल्ला अभियान जाणून घेत अनेक नागरिकसुध्दा यामाध्यमाने ‘हेरीटेज वॉक’मध्ये सहभागी होत आहे. दरम्यान अभियानस्थळी पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी किल्ला स्वच्छता अभियानालाा भेट दिली तसेच इको-प्रो संस्थेच्या मुख्य कार्यालयास भेट देत संस्थेच्या वेग-वेगळया कार्याविषयी माहिती जाणून घेतली.या घाण आणि अस्वच्छता असलेल्या ऐतिहासिक किल्लाची स्वच्छता करण्याकरिता इको-प्रोची युवक स्वंयस्फूर्तपणे समोर येतात. निरंतर हे अभियान चालवितात. हे दुर्मीळ उदाहरण आहे. आपला देश महान आहे. या देशाची गौरवशाली पंरपरा आहे. त्याचे जतन करणे गरजेचे आहे. यातून अनेकांना प्रेरणा मिळते. त्यामुळे या कार्यात युवकांनी सहभागी होऊन योगदान द्यावे, असे आवाहन डॉ. आमटे यांनी केले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी किल्ला स्वच्छता अभियानाबाबत माहिती दिली. यावेळी नितीन रामटेके, धर्मेद्र लुनावत, नितीन बुरडकर, बिमल शहा, संजय सब्बनवार, मनीष गांवडे आदी उपस्थित होते.