शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक किल्ला स्मारक संवर्धन काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 23:14 IST

शहरात सुरू असलेले गोंडकालीन ऐतिहासिक किल्ला स्वच्छता अभियान हे देशातील ऐतिहासिक स्मारक संवर्धनाच्या दृष्टीने तसेच स्वच्छतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहे. तसेच अनेक शहरांना आणी युवकांना मार्गदर्शक ठरणारे आहे. ऐतिहासिक किल्ल्यामध्ये मोठा इतिहास आहे. त्यामुळे ऐतिहासिक किल्ला स्मारकांचे संवर्धन होणे काळाजी गरज असल्याचे मत पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देप्रकाश आमटे : चंद्रपुरातील किल्ला स्वच्छता अभियानाला भेट

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरात सुरू असलेले गोंडकालीन ऐतिहासिक किल्ला स्वच्छता अभियान हे देशातील ऐतिहासिक स्मारक संवर्धनाच्या दृष्टीने तसेच स्वच्छतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहे. तसेच अनेक शहरांना आणी युवकांना मार्गदर्शक ठरणारे आहे. ऐतिहासिक किल्ल्यामध्ये मोठा इतिहास आहे. त्यामुळे ऐतिहासिक किल्ला स्मारकांचे संवर्धन होणे काळाजी गरज असल्याचे मत पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले.शहरातील ऐतिहासिक गोंडकालीन किल्ला स्वच्छता अभियानाची पाहणी तसेच श्रमदानात सहभागी सदस्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने सोमवारी पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे व डॉ मंदाकिनी आमटे यांनी चंद्रपूर किल्ल्यावर भेट दिली. यावेळी ते बोलत होते. इको-प्रोतर्फे सुरू करण्यात आलेल्या चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियानास ५९५ दिवस पूर्ण झाले आहे. किल्ला स्वच्छतासोबतच इको-प्रोचे जिल्ह्यातील इतर स्मारकांबाबतसुध्दा कार्य सुरू झालेले आहे. या अभियानासोबतच जिल्हा प्रशासन व पुरातत्व विभागाव्दारे जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा संरक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने योग्य पावले उचलली जात आहे. या अभियानाची पाहणी करण्यास विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी भेट दिली असून अभियानातील श्रमदान करणारे कार्यकत्यांचे मनोबल वाढविण्यास त्यांना प्रोत्साहन दिले आहे. तसेच किल्ला अभियान जाणून घेत अनेक नागरिकसुध्दा यामाध्यमाने ‘हेरीटेज वॉक’मध्ये सहभागी होत आहे. दरम्यान अभियानस्थळी पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी किल्ला स्वच्छता अभियानालाा भेट दिली तसेच इको-प्रो संस्थेच्या मुख्य कार्यालयास भेट देत संस्थेच्या वेग-वेगळया कार्याविषयी माहिती जाणून घेतली.या घाण आणि अस्वच्छता असलेल्या ऐतिहासिक किल्लाची स्वच्छता करण्याकरिता इको-प्रोची युवक स्वंयस्फूर्तपणे समोर येतात. निरंतर हे अभियान चालवितात. हे दुर्मीळ उदाहरण आहे. आपला देश महान आहे. या देशाची गौरवशाली पंरपरा आहे. त्याचे जतन करणे गरजेचे आहे. यातून अनेकांना प्रेरणा मिळते. त्यामुळे या कार्यात युवकांनी सहभागी होऊन योगदान द्यावे, असे आवाहन डॉ. आमटे यांनी केले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी किल्ला स्वच्छता अभियानाबाबत माहिती दिली. यावेळी नितीन रामटेके, धर्मेद्र लुनावत, नितीन बुरडकर, बिमल शहा, संजय सब्बनवार, मनीष गांवडे आदी उपस्थित होते.