शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

कोरपना तालुक्यातील महामार्ग बनले ‘मृत्युमार्ग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 23:43 IST

कोरपना तालुक्यातून एक राष्ट्रीय महामार्ग, चार राज्य महामार्ग जातात. याचबरोबर प्रमुख जिल्हा महामार्ग, तालुका महामार्ग व ग्रामीण रस्तेही मोठ्या प्रमाणात आहेत.

ठळक मुद्देरस्त्यावर जीवघेणे खड्डे : निधीच्या तरतुदींचा केवळ देखावा

लोकमत न्यूज नेटवर्ककन्हाळगाव : कोरपना तालुक्यातून एक राष्ट्रीय महामार्ग, चार राज्य महामार्ग जातात. याचबरोबर प्रमुख जिल्हा महामार्ग, तालुका महामार्ग व ग्रामीण रस्तेही मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र यातील एकही रस्ता आजघडीला खड्ड्यावाचून नाही. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी अनेकदा निधींची तरतुदही करण्यात आली. परंतु, कागदापलीकडे काहीही दिसत नाही. रस्त्याची थातूरमातूर डागडूजी करण्यात आली. या मार्गावरुन प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.तालुक्यातील पूर्व-पश्चिम दिशेला जोडणाºया प्रमुख राज्य महामार्ग क्र. १० नांदेड-मुखेड-भोकर-हिमायतनगर-किनवट-स्टेट बॉर्डर-कोरपना-राजूरा-जुनोना-चिचपल्ली-गडचिरोली ते राज्य सीमेला जानेवारी महिन्यात राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३ बी मध्ये परावर्तीत करण्यात आले. यापूर्वीपासून या महामार्गावर खड्ड्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. आजघडीला आदिलाबाद- कोरपना- राजूरा-बामणी- गोंडपिपरी- आष्टी राष्ट्रीय महामार्गादरम्यान एकट्या कोरपना तालुक्यातील महामार्गाच्या लांबीत राजुरा तालुका सीमा ते राज्यसीमेच्या पट्ट्यात अनेक मोठ्या स्वरूपातील तर शंभरावर अधिक छोटे-मध्यम खड्डे निर्माण झाले आहे. रस्त्याच्या बाजूच्या कडाही पुरत्या दबल्याने रात्रीच्या वेळी प्रवास करणे अतिशय जिकरीचे ठरत आहे. त्यामुळे सद्या या महामार्गाला राष्ट्रीय महामार्ग म्हणणे म्हणजेच धाडसाचे होईल.महाकुर्ला- धानोरा- भोयगाव-गडचांदूर- देवाडा, राळेगाव- वणी-वनोजा- अंतरगाव- गडचांदूर, कोरपना- वेळाबाई- मुकुटबन- पारवा (वणी मार्ग), गडचांदूर- सोनापूर-जिवती राज्य महामार्ग खड्ड्यांचे गचक्याने गेल्या दोन दशकांपासून सहन करत आहे. भोयगाव ते कवठाळा फाट्याच्या दरम्यान मार्गावर पायी चालणेही कठीण होऊन बसले आहे. वनसडी- नारंडा-कवठाळा फाटा-पौनी प्रमुख जिल्हा महामार्गाची दशा याहून वेगळी नाही. कोरपना-धनकदेवी-जिवती या मार्गाचे कामही अत्यंत कासवगतीने सुरू आहे. यातील बहुतांश झालेले काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने आदिवासी बहुल व अतिदुर्गम समजल्या जाणाºया या भागाचे चांगल्या रस्त्याचे स्वप्न अजूनही अधांतरीच आहे. कोरपना-कन्हाळगाव- सावलहिरा- येल्लापूर हा मार्गही अनेक दशकांपासून रखडलेलाच आहे. आजही येथील नागरिकांना पायीच जाणे हाच पर्याय आहे. याचबरोबर कोरपना- गांधीनगर-कोडशी (बु), जांभूळधरा- रूपापेठ, कोरपना- हातलोणी- घाटराई, आवारापूर- कढोली- नारंडा, नादा-बाखर्डी, रामपूर- खिर्डी- वडगाव-इंजापूर, कोठोडा- रायपूर- परसोडा आदी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.ग्रामीण रस्तेही उपेक्षिततालुक्यातील कोरपना-कन्हाळगाव-कुसळ, कोडशी(बु)-कोडशी(खु) जेवरा-गांधीनगर, पिपरी-झोटींग-वनोजा, अंतरगाव-सांगोडा फाटा, सावलहिरा-टांगाळा, कन्हाळगाव-चनई-मांडवा, शेरज (खु)- पिपरी, लोणी, कातलाबोडी- सोनूर्ली-चिंचोली रस्त्याचेही भोग अद्यापही संपले नाही. त्यामुळे या रस्त्यांचेही भाग्य कधी उजळणार, हा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे.खड्ड्यांमुळे चार महिन्यांपासून बसेस बंदभोयगाव मार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांंमुळे कोरपना, पेल्लोरा, भोयगाव, गडचांदूर, कवठाळा आदी बसेस बंद झाल्या आहेत. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. दोन दशकांपासून या रस्त्याची अवस्था कमी अधिक अशीच आहे. मात्र आश्वासनांच्या पलीकडे रस्त्याचे एक किलोमीटरही दुरुस्तीचे काम झाले नाही.