शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोरपना तालुक्यातील महामार्ग बनले ‘मृत्युमार्ग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 23:43 IST

कोरपना तालुक्यातून एक राष्ट्रीय महामार्ग, चार राज्य महामार्ग जातात. याचबरोबर प्रमुख जिल्हा महामार्ग, तालुका महामार्ग व ग्रामीण रस्तेही मोठ्या प्रमाणात आहेत.

ठळक मुद्देरस्त्यावर जीवघेणे खड्डे : निधीच्या तरतुदींचा केवळ देखावा

लोकमत न्यूज नेटवर्ककन्हाळगाव : कोरपना तालुक्यातून एक राष्ट्रीय महामार्ग, चार राज्य महामार्ग जातात. याचबरोबर प्रमुख जिल्हा महामार्ग, तालुका महामार्ग व ग्रामीण रस्तेही मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र यातील एकही रस्ता आजघडीला खड्ड्यावाचून नाही. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी अनेकदा निधींची तरतुदही करण्यात आली. परंतु, कागदापलीकडे काहीही दिसत नाही. रस्त्याची थातूरमातूर डागडूजी करण्यात आली. या मार्गावरुन प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.तालुक्यातील पूर्व-पश्चिम दिशेला जोडणाºया प्रमुख राज्य महामार्ग क्र. १० नांदेड-मुखेड-भोकर-हिमायतनगर-किनवट-स्टेट बॉर्डर-कोरपना-राजूरा-जुनोना-चिचपल्ली-गडचिरोली ते राज्य सीमेला जानेवारी महिन्यात राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३ बी मध्ये परावर्तीत करण्यात आले. यापूर्वीपासून या महामार्गावर खड्ड्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. आजघडीला आदिलाबाद- कोरपना- राजूरा-बामणी- गोंडपिपरी- आष्टी राष्ट्रीय महामार्गादरम्यान एकट्या कोरपना तालुक्यातील महामार्गाच्या लांबीत राजुरा तालुका सीमा ते राज्यसीमेच्या पट्ट्यात अनेक मोठ्या स्वरूपातील तर शंभरावर अधिक छोटे-मध्यम खड्डे निर्माण झाले आहे. रस्त्याच्या बाजूच्या कडाही पुरत्या दबल्याने रात्रीच्या वेळी प्रवास करणे अतिशय जिकरीचे ठरत आहे. त्यामुळे सद्या या महामार्गाला राष्ट्रीय महामार्ग म्हणणे म्हणजेच धाडसाचे होईल.महाकुर्ला- धानोरा- भोयगाव-गडचांदूर- देवाडा, राळेगाव- वणी-वनोजा- अंतरगाव- गडचांदूर, कोरपना- वेळाबाई- मुकुटबन- पारवा (वणी मार्ग), गडचांदूर- सोनापूर-जिवती राज्य महामार्ग खड्ड्यांचे गचक्याने गेल्या दोन दशकांपासून सहन करत आहे. भोयगाव ते कवठाळा फाट्याच्या दरम्यान मार्गावर पायी चालणेही कठीण होऊन बसले आहे. वनसडी- नारंडा-कवठाळा फाटा-पौनी प्रमुख जिल्हा महामार्गाची दशा याहून वेगळी नाही. कोरपना-धनकदेवी-जिवती या मार्गाचे कामही अत्यंत कासवगतीने सुरू आहे. यातील बहुतांश झालेले काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने आदिवासी बहुल व अतिदुर्गम समजल्या जाणाºया या भागाचे चांगल्या रस्त्याचे स्वप्न अजूनही अधांतरीच आहे. कोरपना-कन्हाळगाव- सावलहिरा- येल्लापूर हा मार्गही अनेक दशकांपासून रखडलेलाच आहे. आजही येथील नागरिकांना पायीच जाणे हाच पर्याय आहे. याचबरोबर कोरपना- गांधीनगर-कोडशी (बु), जांभूळधरा- रूपापेठ, कोरपना- हातलोणी- घाटराई, आवारापूर- कढोली- नारंडा, नादा-बाखर्डी, रामपूर- खिर्डी- वडगाव-इंजापूर, कोठोडा- रायपूर- परसोडा आदी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.ग्रामीण रस्तेही उपेक्षिततालुक्यातील कोरपना-कन्हाळगाव-कुसळ, कोडशी(बु)-कोडशी(खु) जेवरा-गांधीनगर, पिपरी-झोटींग-वनोजा, अंतरगाव-सांगोडा फाटा, सावलहिरा-टांगाळा, कन्हाळगाव-चनई-मांडवा, शेरज (खु)- पिपरी, लोणी, कातलाबोडी- सोनूर्ली-चिंचोली रस्त्याचेही भोग अद्यापही संपले नाही. त्यामुळे या रस्त्यांचेही भाग्य कधी उजळणार, हा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे.खड्ड्यांमुळे चार महिन्यांपासून बसेस बंदभोयगाव मार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांंमुळे कोरपना, पेल्लोरा, भोयगाव, गडचांदूर, कवठाळा आदी बसेस बंद झाल्या आहेत. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. दोन दशकांपासून या रस्त्याची अवस्था कमी अधिक अशीच आहे. मात्र आश्वासनांच्या पलीकडे रस्त्याचे एक किलोमीटरही दुरुस्तीचे काम झाले नाही.