शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

कोळसा खाणींमुळे चंद्रपूरने गाठला तापमानाचा उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:11 IST

चंद्रपूर जिल्ह्याच्या तापमानात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. याला कारणीभूत जिल्ह्यातील कोळसा खाणी असल्याचे आता स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात वेकोलिच्या कोळसा खाणींचे जाळे अधिक असल्याने या खुल्या खदानींचे दुष्परिणाम मानवी जीवावर उठले आहे.

ठळक मुद्देदिवसेंदिवस तापमानात वाढ । ब्लॅक गोल्ड सिटीला उष्णतेची झळ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याच्या तापमानात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. याला कारणीभूत जिल्ह्यातील कोळसा खाणी असल्याचे आता स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात वेकोलिच्या कोळसा खाणींचे जाळे अधिक असल्याने या खुल्या खदानींचे दुष्परिणाम मानवी जीवावर उठले आहे. कोळसा खाणीमुळे चंद्रपूर जिल्ह्याने तापमानाचा उच्चांक गाठल्याने उन्हाळ्यात जनजीवन प्रभावित होत आहे.चंद्रपूर ब्लॅक गोल्ड सिटीचा जिल्हा म्हणून महाराष्ट्राच्या नकाशावर परिचित आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दगडी कोळसाचे जाळे असल्याने वेकोलिने जिल्ह्याच्या बहुतांश भागात खुल्या व भूमिगत कोळसा खाणी निर्माण केल्या. चंद्रपूर व राजुरा तालुका तर वेकोलिच्या कोळसा खाणींसाठी अग्रेसर मानला जातो. दुर्गापूर, रयतवारी, पद्मपापूर, गोवरी, सास्ती, धोपटाळा, पोवनी, गोयेगाव, अंतरगाव, साखरी परिसरात वेकोलिच्या खुल्या कोळसा खाणी आहे. या परिसरात कोळसा खाणी मोठ्या प्रमाणात असल्याने कोळशामुळे येथील वातावरण नेहमीच उष्ण असते. सध्या तापमानाचा पारा ४६ अंश सेल्सीअसच्या पार गेला आहे. नागरिकांना सकाळी ८ वाजतापासूनच उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहे. पूर्वी एवढे तापमान नव्हते. परंतु खदानीमुळे आता परिसर अधिकच उष्ण झाला आहे.खाणींमध्ये वर्षभर उष्णतावेकोलिच्या कोळसा खाणीत मोठ्या प्रमाणात कोळशाची उष्णता असते. वर्षभर येथील वातावरण उष्ण असते. त्यामुळे बाहेरच्या वातावरणावरही त्याचा मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम जाणवतो. कोळसा खाणीत उन्हाळ्यात तर भीषण परिस्थिती असते. खाणीत काम करणाऱ्या कामगारांचे या कालावधीत मोठे हाल होतात. तीव्र उष्णतेचा त्यांना सामना करावा लागतो. खाणीजवळच्या गावातही उष्णतेचा कहर असतो.कोळसा खाणी निर्माण होण्यापूर्वी गोवरी - सास्ती परिसरातील वातावरण थंड होते. परंतु वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे आता या परिसरात वर्षभर उष्णता असते. खाणींच्या दुष्परिणामांचा फटका नागरिकांना बसत आहे. - मारोती पाटील लोहे, गोवरीचंद्रपूरच्या परिसरात कोळसा खाणींचे जाळे पसरले आहे. वीज केंद्र आहे. यामुळे वातावरणात कार्बनडाय आॅक्साईड, कार्बन मोनाक्साईड, मिथेन यारखे वायू पसरत असल्याने तापमानात वाढ होत आहे.- प्रा. योगेश दुधपचारे, चंद्रपूर

टॅग्स :Temperatureतापमान