शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
2
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
3
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
4
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
5
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
6
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
7
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
8
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
9
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
10
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
11
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
12
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
13
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
14
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!
15
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
16
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
17
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
18
"मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
19
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
20
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर

कोळसा खाणींमुळे चंद्रपूरने गाठला तापमानाचा उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:11 IST

चंद्रपूर जिल्ह्याच्या तापमानात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. याला कारणीभूत जिल्ह्यातील कोळसा खाणी असल्याचे आता स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात वेकोलिच्या कोळसा खाणींचे जाळे अधिक असल्याने या खुल्या खदानींचे दुष्परिणाम मानवी जीवावर उठले आहे.

ठळक मुद्देदिवसेंदिवस तापमानात वाढ । ब्लॅक गोल्ड सिटीला उष्णतेची झळ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याच्या तापमानात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. याला कारणीभूत जिल्ह्यातील कोळसा खाणी असल्याचे आता स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात वेकोलिच्या कोळसा खाणींचे जाळे अधिक असल्याने या खुल्या खदानींचे दुष्परिणाम मानवी जीवावर उठले आहे. कोळसा खाणीमुळे चंद्रपूर जिल्ह्याने तापमानाचा उच्चांक गाठल्याने उन्हाळ्यात जनजीवन प्रभावित होत आहे.चंद्रपूर ब्लॅक गोल्ड सिटीचा जिल्हा म्हणून महाराष्ट्राच्या नकाशावर परिचित आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दगडी कोळसाचे जाळे असल्याने वेकोलिने जिल्ह्याच्या बहुतांश भागात खुल्या व भूमिगत कोळसा खाणी निर्माण केल्या. चंद्रपूर व राजुरा तालुका तर वेकोलिच्या कोळसा खाणींसाठी अग्रेसर मानला जातो. दुर्गापूर, रयतवारी, पद्मपापूर, गोवरी, सास्ती, धोपटाळा, पोवनी, गोयेगाव, अंतरगाव, साखरी परिसरात वेकोलिच्या खुल्या कोळसा खाणी आहे. या परिसरात कोळसा खाणी मोठ्या प्रमाणात असल्याने कोळशामुळे येथील वातावरण नेहमीच उष्ण असते. सध्या तापमानाचा पारा ४६ अंश सेल्सीअसच्या पार गेला आहे. नागरिकांना सकाळी ८ वाजतापासूनच उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहे. पूर्वी एवढे तापमान नव्हते. परंतु खदानीमुळे आता परिसर अधिकच उष्ण झाला आहे.खाणींमध्ये वर्षभर उष्णतावेकोलिच्या कोळसा खाणीत मोठ्या प्रमाणात कोळशाची उष्णता असते. वर्षभर येथील वातावरण उष्ण असते. त्यामुळे बाहेरच्या वातावरणावरही त्याचा मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम जाणवतो. कोळसा खाणीत उन्हाळ्यात तर भीषण परिस्थिती असते. खाणीत काम करणाऱ्या कामगारांचे या कालावधीत मोठे हाल होतात. तीव्र उष्णतेचा त्यांना सामना करावा लागतो. खाणीजवळच्या गावातही उष्णतेचा कहर असतो.कोळसा खाणी निर्माण होण्यापूर्वी गोवरी - सास्ती परिसरातील वातावरण थंड होते. परंतु वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे आता या परिसरात वर्षभर उष्णता असते. खाणींच्या दुष्परिणामांचा फटका नागरिकांना बसत आहे. - मारोती पाटील लोहे, गोवरीचंद्रपूरच्या परिसरात कोळसा खाणींचे जाळे पसरले आहे. वीज केंद्र आहे. यामुळे वातावरणात कार्बनडाय आॅक्साईड, कार्बन मोनाक्साईड, मिथेन यारखे वायू पसरत असल्याने तापमानात वाढ होत आहे.- प्रा. योगेश दुधपचारे, चंद्रपूर

टॅग्स :Temperatureतापमान