शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाची धूळ उभ्या पिकांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 22:47 IST

यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. सुरुवातीच्या काळात दुबार पेरणीनंतर अतिवृष्टी, वातावरण बदलामुळे पिकांवर झालेला विविध रोगांचा प्रादुर्भाव, यामुळे बळीराजा आर्थिक संकटात अडकला आहे. हे संकट कायम असतानाच उमरेड-चिमूर-वरोरा या राष्ट्रीय महामार्गावरील धुळीमुळे कापसाचे पीक काळवंडले आहे. महामार्गालगतच्या शेतकऱ्यांना या नव्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे.

ठळक मुद्देरस्त्या लगतच्या शेतकऱ्यावर नवे संकट : चौपदरीकरणाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. सुरुवातीच्या काळात दुबार पेरणीनंतर अतिवृष्टी, वातावरण बदलामुळे पिकांवर झालेला विविध रोगांचा प्रादुर्भाव, यामुळे बळीराजा आर्थिक संकटात अडकला आहे. हे संकट कायम असतानाच उमरेड-चिमूर-वरोरा या राष्ट्रीय महामार्गावरील धुळीमुळे कापसाचे पीक काळवंडले आहे. महामार्गालगतच्या शेतकऱ्यांना या नव्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे.उमरेड-चिमूर-वरोरा या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम मागील काही महिन्यापासून सुरू आहे. चिमूर - वरोरा हा मार्ग निर्माण काळापासून समस्यांच्या गर्तेत अडकला आहे. हा मार्ग पूर्णत: खोदण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतुकीकरिता पर्यायी मार्ग तयार करण्यात आला. या पर्यायी मार्गावर विविध समस्या उद्भवत आहेत. बांधकाम विभागाच्या चुकीच्या नियोजनाचा फटका वाहनचालकासह आता शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे.वरोरा-चिमूर मार्गाचे कंत्राट एस.आर.के.कंपनीकडे असून मागील तीन महिन्यांच्या काळापासून चिमूर परिसरातील मार्गाचे काम ठप्प आहे. सोबतच या मार्गावर पाणी मारण्याचे काम नियमित होत नसल्याने या मार्गावरून मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. ही धूळ लगतच्या शेतातील उभ्या पिकांवर बसत असल्याने पिकांचा रंग हळूहळू काळवंडू लागला आहे. विविध संकटातून धडपड करीत वाचवलेले पीक नव्या संकटात अडकल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. याचा उत्पादनावर परिणाम होणार असल्याने शेतकरी नव्या चिंतेत अडकला आहे. याकडे कंत्राट कंपनीचे प्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. त्यांच्याकडे वारंवार मागणी करूनही ते पर्यायी मार्गावर पाणी मारण्याच्या बाबतीत दुर्लक्ष करीत आहेत.यामुळे कंत्राटी कंपनीने शेतकऱ्यांच्या होत असलेल्या नुकसानीची भरपाई करावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत. या मार्गावर उदभवणाºया विविध समस्यांकडे आता तरी बांधकाम विभाग लक्ष देणार काय, असा प्रश्न शेतकरी,नागरिक करीत आहेत.निर्माणाधीन रस्त्याच्या कामावर नियमित पाणी मारत नसल्याने रस्त्यालगतचे पीक धुळीने काळवंडले आहेत. याचा परिणाम झाडाच्या वाढीवर होवून उत्पादन कमी होणार आहे. तेव्हा रस्त्यालगतच्या पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांना संबधित कंपानीने भरपाई द्यावी.-प्रशांत कोल्हेशेतकरी वहानगाव (बोथली) तथा तालुका अध्यक्ष मनसे