शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
2
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
3
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
4
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
5
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
6
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
7
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
8
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
9
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
10
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
11
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
12
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
13
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
14
तेजस्वी पिछाडीवर, तिकडे तेज प्रताप यादवांची काय अवस्था...; 'हम तो डुबेंगे सनम...' खरे ठरतेय? 
15
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
16
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
17
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
18
Health And Ritual: दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी ही पूर्वापार परंपरा; मेंदू होतो सुपरफास्ट!
19
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
20
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाची धूळ उभ्या पिकांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 22:47 IST

यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. सुरुवातीच्या काळात दुबार पेरणीनंतर अतिवृष्टी, वातावरण बदलामुळे पिकांवर झालेला विविध रोगांचा प्रादुर्भाव, यामुळे बळीराजा आर्थिक संकटात अडकला आहे. हे संकट कायम असतानाच उमरेड-चिमूर-वरोरा या राष्ट्रीय महामार्गावरील धुळीमुळे कापसाचे पीक काळवंडले आहे. महामार्गालगतच्या शेतकऱ्यांना या नव्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे.

ठळक मुद्देरस्त्या लगतच्या शेतकऱ्यावर नवे संकट : चौपदरीकरणाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. सुरुवातीच्या काळात दुबार पेरणीनंतर अतिवृष्टी, वातावरण बदलामुळे पिकांवर झालेला विविध रोगांचा प्रादुर्भाव, यामुळे बळीराजा आर्थिक संकटात अडकला आहे. हे संकट कायम असतानाच उमरेड-चिमूर-वरोरा या राष्ट्रीय महामार्गावरील धुळीमुळे कापसाचे पीक काळवंडले आहे. महामार्गालगतच्या शेतकऱ्यांना या नव्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे.उमरेड-चिमूर-वरोरा या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम मागील काही महिन्यापासून सुरू आहे. चिमूर - वरोरा हा मार्ग निर्माण काळापासून समस्यांच्या गर्तेत अडकला आहे. हा मार्ग पूर्णत: खोदण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतुकीकरिता पर्यायी मार्ग तयार करण्यात आला. या पर्यायी मार्गावर विविध समस्या उद्भवत आहेत. बांधकाम विभागाच्या चुकीच्या नियोजनाचा फटका वाहनचालकासह आता शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे.वरोरा-चिमूर मार्गाचे कंत्राट एस.आर.के.कंपनीकडे असून मागील तीन महिन्यांच्या काळापासून चिमूर परिसरातील मार्गाचे काम ठप्प आहे. सोबतच या मार्गावर पाणी मारण्याचे काम नियमित होत नसल्याने या मार्गावरून मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. ही धूळ लगतच्या शेतातील उभ्या पिकांवर बसत असल्याने पिकांचा रंग हळूहळू काळवंडू लागला आहे. विविध संकटातून धडपड करीत वाचवलेले पीक नव्या संकटात अडकल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. याचा उत्पादनावर परिणाम होणार असल्याने शेतकरी नव्या चिंतेत अडकला आहे. याकडे कंत्राट कंपनीचे प्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. त्यांच्याकडे वारंवार मागणी करूनही ते पर्यायी मार्गावर पाणी मारण्याच्या बाबतीत दुर्लक्ष करीत आहेत.यामुळे कंत्राटी कंपनीने शेतकऱ्यांच्या होत असलेल्या नुकसानीची भरपाई करावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत. या मार्गावर उदभवणाºया विविध समस्यांकडे आता तरी बांधकाम विभाग लक्ष देणार काय, असा प्रश्न शेतकरी,नागरिक करीत आहेत.निर्माणाधीन रस्त्याच्या कामावर नियमित पाणी मारत नसल्याने रस्त्यालगतचे पीक धुळीने काळवंडले आहेत. याचा परिणाम झाडाच्या वाढीवर होवून उत्पादन कमी होणार आहे. तेव्हा रस्त्यालगतच्या पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांना संबधित कंपानीने भरपाई द्यावी.-प्रशांत कोल्हेशेतकरी वहानगाव (बोथली) तथा तालुका अध्यक्ष मनसे