शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 01:01 IST

नाशिक : विजांचा कडकडाट आणि जोरदार वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या परतीच्या पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोपडून काढले. दुपारनंतर जिल्ह्यात एकूण १८.८६ मि.मी. इतकी पावसाची नोंद झाली, तर या पावसामुळे काही नद्यांना पुन्हा एकदा पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले तर टमाटा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

ठळक मुद्देपूरपरिस्थिती : शहरात अवघ्या दीड तासात ४० मि.मी. पाऊस

गोदेला आलेल्या पुरात वाहनेदेखील वाहून गेली.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : विजांचा कडकडाट आणि जोरदार वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या परतीच्या पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोपडून काढले. दुपारनंतर जिल्ह्यात एकूण १८.८६ मि.मी. इतकी पावसाची नोंद झाली, तर या पावसामुळे काही नद्यांना पुन्हा एकदा पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले तर टमाटा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. शेतामध्ये साचलेल्या पाण्यामुळेदेखील पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, शहरात अवघ्या दीड तासात ४० मि.मी. पाऊस झाला आहे.येत्या १४ तारखेपर्यंत जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.जिल्ह्यात सर्वदूर बरसलेल्या परतीच्या पावसाने चांगलीच दाणादाण उडवून दिली. दुपारनंतर टप्प्याटप्प्याने बरसलेल्या पाऊसधारांनी जिल्ह्यातील अनेक भागाला झोडपून काढले. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस हा येवला आणि बागलाण तालुक्यामध्ये झाला. सुमारे दीड ते दोन तास झालेल्या पावसामुळे शेतकºयांना पिकांची चिंता लागली आहे. येवला येथे ५९ मि.मी. तर बागलाणला ४४ मि.मी. पावसाची नोंद झाली. येवला तालुक्यालादेखील परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले असून, रविवारी झालेल्या पावसाने काही ठिकाणी घरांचे छप्पर उडाले तर पिकांचेदेखील नुकसान झाले आहे.रविवारी जिल्ह्यात सरासरी १८.८६ मि.मी. इतका पाऊस झाला असून, या हंगामात एकूण १५९३ मि.मी. इतकापाऊस नोंदला गेला आहे. यामध्ये परतीच्या पावसाची गेल्या आठ दिवसांची आकडेवारी मोठी आहे.  इगतपुरी अािण त्र्यंबकेश्वरलादेखील परतीच्या पावसाने पुन्हा एकदा दणका दिला. इगतपुरीत रविवारी ४० तर त्र्यंबकेश्वरला १३ मि.मी. पाऊस नोंदला गेला. अन्य तालुक्यांमध्ये निफाड आणि सिन्नरच्या शेतकºयांना पावसाचा फटका बसला आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत नाशिक तालुक्यात ४८ मि.मी. पावसाची नोंद झाली.धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाला नसला तरी सदर परिस्थिती पुढील आठ दिवस कायम राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत जिल्ह्णात धरणक्षेत्र परिसरात पाऊस झाला नसला तरी जिल्ह्णातील मध्यवर्ती भागात जोरदार पाऊस झाल्याने नद्या, नाले, ओहळांच्या पाणीपातळीत वाढ झाली. पावसानंतर सुमारे तासभर रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहत होते. यामुळे वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला. येत्या १४ तारखेपर्यंत जिल्ह्णात अनेक ठिकाणी विशेषत: घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता विर्तविण्यात आलेली आहे. दिंडोरीत झालेल्या पावसामुळे परिसरातील शेतकºयांच्या टमाटा पिकाचे नुकसान झाले आहे. वाहून गेल्याने पिंंपळगावच्या शेतकºयाचा मृत्यूपिंपळगाव बसवंत : पूरपाण्याचा अंदाज न आल्याने फरशी पुलावरून वाहून गेल्याने रामचंद्र फकिरा पवार (४५) यांचा मृत्यू झाला. पवार शनिवारी (दि.५) सायंकाळी त्यांच्या शेतातून गावात येत होते. अचानक मुसळधार पाऊस झाल्याने येथील पराशरी नदीला पूर आल्यामुळे फरशी पूलही पाण्याखाली गेला. त्यातच पाण्याचा प्रवाह वाढला. पवार यांनी पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला; मात्र पाण्याच्या प्रवाहात ते वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रात्री उशिरा येथील प्राथमिक रु ग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलीस निरीक्षक संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पंडित वाघ तपास करीत आहेत.

टॅग्स :floodपूरNashikनाशिक