शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

दमदार पावसाने पेरणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 22:40 IST

तीन आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर वरुण राजाने जिल्हयात सर्वदूर हजेरी लावली. पावसाच्या आगमनानंतर खरीप हंगामांतर्गत कामाला वेगाने सुरुवात झाली असून पेरणीची कामे जोमात सुरु आहेत.

ठळक मुद्देखरीप हंगाम : तलाव, बोड्यांमध्ये साचले पाणी, धरणातील उपयुक्त जलसाठा मात्र निरंक

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तीन आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर वरुण राजाने जिल्हयात सर्वदूर हजेरी लावली. पावसाच्या आगमनानंतर खरीप हंगामांतर्गत कामाला वेगाने सुरुवात झाली असून पेरणीची कामे जोमात सुरु आहेत.ज्या शेतकऱ्यांकडे सिंचन सुविधा उपलब्ध होत्या अशा शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकले होते. रोवणीसाठी पऱ्हे तयार झाले असतानांही पावसाचे आगमन न झाल्याने अशा शेतकऱ्यांचे टेंशन वाढले होते. अशातच जिल्हाभर पावसाच्या हजेरीने मशागतीच्या कामांना अंतीम रुप देवून पेरणीची कामे सुरु करण्यात आली. तर दुसरीकडे रोवणीयोग्य पऱ्हे व समाधानकारक पाऊस बरसल्याने काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये चिखलणीची कामेही सुरु केली आहे.जिल्ह्यात १ लक्ष ९२ हजार हेक्टर क्षेत्रात भात पीक लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र मृग व रोहिणी नक्षत्रात पाऊस न बरसल्याने पेरणीच्या कामाला प्रारंभ होऊ शकला नाही. आद्रा नक्षत्राच्या सहाव्या दिवशी पाऊस बरसल्याने मशागतीच्या कामांना अंतीम रुप देण्यात आले.दरम्यान जिल्ह्यातील पवनी, लाखांदूर, भंडारा, साकोली, मोहाडी, तुमसर व लाखनी तालुक्यात पावसाने हजेरी लावली. विशेषत: मागील तीन दिवसात पावसाच्या हजेरीमुळे खरीपाच्या कामाला जोर आला आहे. शेतकरी कृषी केंद्रात साहित्य खरेदीसाठी गर्दी करीत आहे.सरासरी ४५ मिमी पाऊसजिल्ह्यात रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास दमदार पावसाने हजेरी लावली. यात सरासरी ४५.१ मिमी पाऊस बरसल्याची नोंद करण्यात आली आहे. यात भंडारा व साकोली तालुक्यात अतिवृष्टी झाली. भंडारात ६६.५ मिमी तर साकोली तालुक्यात ७२.६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. लाखनीत ३२, मोहाडी ४०.३, तुमसर ४६.१ तर लाखांदूरात ४४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.