शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यासह जिल्ह्यात मुसळधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 01:05 IST

तब्बल पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पावसाने शुक्रवारी हजेरी लावली. पहाटे पाच ते सहा दरम्यान जालन्यासह जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस झाला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : तब्बल पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पावसाने शुक्रवारी हजेरी लावली. पहाटे पाच ते सहा दरम्यान जालन्यासह जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस झाला. दिवसभर उघडीप दिल्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास वीजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पुन्हा पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या पावसाचा पिकांना फायदा होणार असल्याने शेतकºयांची पिकांना पाणी देण्याची चिंता तात्पुरती का होईना मिटली आहे.भोकरदन, परतूर, अंबड, घनसावंगी, जाफराबाद, मंठा या तालुक्यांतील बहुतांश भागात पाऊस झाला. जालना तालुक्यातील पीरपिंपळगाव, माळशेंद्रा, गोंदेगाव, वंजारउम्रद, जामवाडी, घाणेवाडी, तांदूळवाडी, गुंडेवाडी, निधोना, इंदेवाडी, धारकल्याण, नंदापूर, रामनगर, विरेगाव, सेवली, सिरसवाडी, रेवगाव आदी भागांत पहाटे चार ते सहा दरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर सकाळी दहा वाजता कडक ऊन पडले. वातावरणात दिवसभर उकाडा जाणवत होता. सायंकाळी पाचनंतर ढग दाटून आले. सुरुवातीला काही मिनिटे हलका पाऊस झाला. मात्र, सहावाजेनंतर पावसाचा जोर चांगलाच वाढला.पावसामुळे जुना जालना भागातील टाऊन हॉल, भाग्यनगर, बाजार गल्ली, आदी भागांत पाणी साचले. नवीन जालन्यात काही ठिकाणी नाल्यांचे पाणी रस्त्यावर आले. जालना शहरातून वाहणाºया कुंडलिका नदीवरील रामतीर्थ बंधाºयावरून प्रथमच पाणी वाहिले. पुराचे पाणी रामतीर्थ पुलाच्या खालील बाजूस असणाºया मंदिराच्या पायºयापर्यंत आले होते.या पावसामुळे शहरातील कुपनलिकांची पाणीपातळी वाढण्यास मदत होणार आहे. सायंकाळी बदनापूर शहरासह तालुक्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली. दोन तास झालेल्या पावसाने जालना-औरंगाबाद हा रस्ता जलमय झाला होता. अंतर्गत भागातील रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली.जालना परिसरात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला. नागेवाडी जवळील टोल नाक्याजवळ नाल्याचे पाणी मुख्य रस्त्यावर आल्याने जालना-औरंगाबाद रस्यावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती.नागेवाडी शिवारात सायंकाळी पाच वाजेनंतर जोदारा पाऊस झाला. त्यामुळे गावाच्या खालील बाजूने वाहणाºया नाल्याचे पाणी मुख्य रस्त्यावरून वाहू लागल्याने टोल नाक्यासमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आले. सुरुवातीला पाण्यातून वाहने नेल्यानंतर पाण्याचा जोर वाढल्याने दोन्ही बाजूची वाहतूक बंद झाली. त्यामुळे जालना-औरंगाबाद मार्गावर दोन्ही बाजूने दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. रात्री आठवाजेपर्यंत ठप्प होती. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.आठ वाजेनंतर पुलावरील पाणी ओसरल्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्ववत झाली. दरम्यान, बसस्थानक परिसरात सीना नदीलाही पाणी आले होते. जालना तालुक्यातील निधोना, घाणेवाडी, पीरपिंपळगाव, गुंडेवाडी, चंदनझिरा, ढवळेश्वर भागातील नाल्यांनाही पूर आला होता.