शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
3
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
4
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
5
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
6
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
7
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
8
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
9
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
10
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
11
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
12
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
13
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
14
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
15
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
16
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
17
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
18
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
19
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
20
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”

‘सुकन्या समृद्धीला’ नेटवर्कचा ताप

By admin | Updated: February 25, 2015 01:23 IST

स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व कामे आॅनलाईन करण्यात आली आहेत.

चंद्रपूर : स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व कामे आॅनलाईन करण्यात आली आहेत. मात्र, इंटरनेट सुविधेत वारंवार येत असलेला बिघाड हा कर्मचारी व लाभार्थ्यांसाठी डोकेदुखीचा विषय ठरत आहे. असाच प्रकार डाक विभागाच्या सुकन्या समृद्ध योजनेचे खाते उघडण्यासाठी दिसून येत आहे. डाक विभागाकडून २ डिसेंबर २०१४ पासून ‘सुकन्या समृद्धी खाते’ ही योजना सुरू करण्यात आली. योजनेचे खाते उघडण्यासाठी पंधरवड्यापासून डाक कार्यालयात गर्दी होत आहे. मात्र, खाते उघडण्यात ‘नेट’ची तांत्रिक अडचण येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. परिणामी, कामे संथगतिने होत असल्याने मन:स्ताप सहन करावा लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचा शुभारंभ केला. २२ जानेवारीला या योजनेची सुरूवात झाली आहे. मुलींना कमी लेखल्या जाऊ नये, तिचे ओझे वाटू नये, मुलीला समाजात मानाचे स्थान मिळावे हा उद्देश सुकन्या योजनेतून डाक विभागाने समोर ठेवला. भविष्यात पालकांना मुलीच्या लग्नासाठी सावकारांकडून कर्ज घेण्याची गरज पडणार नाही, सोबतच ‘बेटी बचाव’ अभियानाला हातभार लागेल, असे बहुविध फायदे या योजनेचे आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांनी या योजनेसाठी डाक कार्यालयात एकच गर्दी केली आहे. त्यामुळे दुर्लक्षीत डाक विभाग अचानक चर्चेत आला. मात्र, कायम विस्कळीत सेवा देण्यात सराईत असलेल्या ‘बीएसएनएल’मुळे खाते उघडण्याला खोडा बसला आहे. शनिवारी नेटवर्क समस्या उद्भवल्याने खाते उघडण्याचे काम ठप्प झाले. खाते आॅनलाईन उघडायचे असून दुसरीकडे नवीन सॉफ्टवेअर असल्याने डाक कर्मचाऱ्यांना हाताळणीची सवय नाही. प्रशिक्षित कर्मचारीही नाहीत. त्यामुळे एकाच अर्ज भरण्यास बराच वेळ लागत आहे. अशा अनेक समस्यांमुळे ग्राहकांना कासवगतीने सेवा मिळत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)योजनेचे नियम सदर खात्यासाठी पालक ठेवीदार तर मुलगी खातेधारक राहणार आहे. मुलीच्या जन्मापासून ते वयाच्या १० वर्षांपर्यंत खाते उघडता येते.पालकाची केवायसी कागदपत्रे, मुलीच्या जन्माचा दाखला आदी कागदपत्रे आवश्यक.वयाच्या १४ वर्षांपर्यंत रक्कम भरावयाची आहे.वर्षात किमान १ हजार रुपये जमा झाले नाही, तर खाते बंद पडेल.मुलीचा जन्म २ डिसेंबर २००३ रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा.