शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
2
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
3
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
4
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
5
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
6
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
7
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
8
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
9
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
10
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
11
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
12
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
13
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
14
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
16
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
17
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
18
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
19
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
20
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट

समाधानकारक पावसाने शेतकरी सुखावला

By admin | Updated: July 10, 2016 00:39 IST

पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या बळीराजावर वरुणराजाने कृपादृष्टी दाखविली. मूल तालुक्यात ४५७.४ मिमी पाऊस पडला असून समाधानकारक पावसाने शेतकरी सुखावला असल्याचे चित्र दिसत आहे.

बोडी-तलावात पाणी साठले : पेरण्यांच्या कामांना अचानक वेगमूल: पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या बळीराजावर वरुणराजाने कृपादृष्टी दाखविली. मूल तालुक्यात ४५७.४ मिमी पाऊस पडला असून समाधानकारक पावसाने शेतकरी सुखावला असल्याचे चित्र दिसत आहे.आजच्या स्थितीत धानाच्या ९० टक्के पेरण्या आटोपल्या असून उर्वरित पेरण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू असल्याचे दिसून येते. तसेच धानाच्या पिकाला जोड म्हणून पर्यायी पिकालासुद्धा शेतकऱ्यांनी पसंती दर्शवित कापूस, तुर, सोयाबीन, भाजीपाला याचादेखील पेरा पूर्ण केल्याचे दिसून येते. यावर्षी १६० हेक्टरवर आवत्याची पेरणी झाली आहे, हे विशेष!मूल तालुक्यात दोन नक्षत्र कोरडे जात असल्याने शेतकरी चिंतातूर झाला होता. यावर्षी भरपूर पाऊस येणार ही हवामान खात्याची भविष्यवानी खोटी ठरणार काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना वेळोवेळी सतावत होता. मात्र प्रथमत: ३ जूनला ३६.८ मिमी पाऊस पडून पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर कमी-अधीक प्रमाणात पाऊस पडल्याने आजच्या स्थितीत ४५७.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांची धावपळ झाल्याचे दिसून येते. काही शेतकऱ्यांनी चिखल पऱ्हे टाकण्यास पसंती दर्शविली तर काहींनी आवत्या धानाच्या पेऱ्याला पसंती दिल्याचे दिसते. तालुक्यातील पिकाखाली क्षेत्र २४ हजार हेक्टर असून धान पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १० हजार ७६० हेक्टर आहे. आजच्या स्थितीत ९ हजार ४५० हेक्टरसाठी धानाचे पऱ्हे १०५० हेक्टर पेरण्यात आले. एकंदरीत ९० टक्के धानाच्या पेरण्यापूर्ण झाल्या आहेत. पर्यायी पीक म्हणून शेतकऱ्यांनी तूर २१० हेक्टर, सोयाबीन ७९९ हेक्टर, कापूस १७० हेक्टर, भाजीपाला १५ हेक्टर, लागवड केली आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालय मूल अंतर्गत जलशिवार योजनेअंतर्गत मृद संधारण कामामुळे शेतकऱ्यांना संरक्षित पाणी देण्याची सोय उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे पिकांना नक्कीच फायदा होईल, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.मूल तालुक्यात मागील वर्षी १११ गावांपैकी मोजक्या गावातच धानाचे पिक झाले. उर्वरित गावामध्ये दुष्काळाची झळ शेतकऱ्यांना सोसावी लागली. मात्र दुष्काळाचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नाही. तसेच पिकविम्याची रक्कमदेखील देण्यास शासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे सतत दोन वर्षे मूल तालुक्यातील शेतकरी पिकविम्यापासून वंचित होत असल्याने शेतकऱ्यात असंतोष दिसून येत आहे. या गंभीर बाबीकडे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)