शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
3
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
4
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
5
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
7
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
8
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
9
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
10
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
11
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
12
शुक्र गोचर २०२५: शुक्रादित्य राजयोग; 'या' ६ राशी हात लावतील तिथे सोनं करतील!
13
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
14
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
15
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
16
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
17
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
18
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
19
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
20
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?

समाधानकारक पावसाने शेतकरी सुखावला

By admin | Updated: July 10, 2016 00:39 IST

पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या बळीराजावर वरुणराजाने कृपादृष्टी दाखविली. मूल तालुक्यात ४५७.४ मिमी पाऊस पडला असून समाधानकारक पावसाने शेतकरी सुखावला असल्याचे चित्र दिसत आहे.

बोडी-तलावात पाणी साठले : पेरण्यांच्या कामांना अचानक वेगमूल: पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या बळीराजावर वरुणराजाने कृपादृष्टी दाखविली. मूल तालुक्यात ४५७.४ मिमी पाऊस पडला असून समाधानकारक पावसाने शेतकरी सुखावला असल्याचे चित्र दिसत आहे.आजच्या स्थितीत धानाच्या ९० टक्के पेरण्या आटोपल्या असून उर्वरित पेरण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू असल्याचे दिसून येते. तसेच धानाच्या पिकाला जोड म्हणून पर्यायी पिकालासुद्धा शेतकऱ्यांनी पसंती दर्शवित कापूस, तुर, सोयाबीन, भाजीपाला याचादेखील पेरा पूर्ण केल्याचे दिसून येते. यावर्षी १६० हेक्टरवर आवत्याची पेरणी झाली आहे, हे विशेष!मूल तालुक्यात दोन नक्षत्र कोरडे जात असल्याने शेतकरी चिंतातूर झाला होता. यावर्षी भरपूर पाऊस येणार ही हवामान खात्याची भविष्यवानी खोटी ठरणार काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना वेळोवेळी सतावत होता. मात्र प्रथमत: ३ जूनला ३६.८ मिमी पाऊस पडून पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर कमी-अधीक प्रमाणात पाऊस पडल्याने आजच्या स्थितीत ४५७.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांची धावपळ झाल्याचे दिसून येते. काही शेतकऱ्यांनी चिखल पऱ्हे टाकण्यास पसंती दर्शविली तर काहींनी आवत्या धानाच्या पेऱ्याला पसंती दिल्याचे दिसते. तालुक्यातील पिकाखाली क्षेत्र २४ हजार हेक्टर असून धान पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १० हजार ७६० हेक्टर आहे. आजच्या स्थितीत ९ हजार ४५० हेक्टरसाठी धानाचे पऱ्हे १०५० हेक्टर पेरण्यात आले. एकंदरीत ९० टक्के धानाच्या पेरण्यापूर्ण झाल्या आहेत. पर्यायी पीक म्हणून शेतकऱ्यांनी तूर २१० हेक्टर, सोयाबीन ७९९ हेक्टर, कापूस १७० हेक्टर, भाजीपाला १५ हेक्टर, लागवड केली आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालय मूल अंतर्गत जलशिवार योजनेअंतर्गत मृद संधारण कामामुळे शेतकऱ्यांना संरक्षित पाणी देण्याची सोय उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे पिकांना नक्कीच फायदा होईल, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.मूल तालुक्यात मागील वर्षी १११ गावांपैकी मोजक्या गावातच धानाचे पिक झाले. उर्वरित गावामध्ये दुष्काळाची झळ शेतकऱ्यांना सोसावी लागली. मात्र दुष्काळाचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नाही. तसेच पिकविम्याची रक्कमदेखील देण्यास शासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे सतत दोन वर्षे मूल तालुक्यातील शेतकरी पिकविम्यापासून वंचित होत असल्याने शेतकऱ्यात असंतोष दिसून येत आहे. या गंभीर बाबीकडे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)