शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

समाधानकारक पावसाने शेतकरी सुखावला

By admin | Updated: July 10, 2016 00:39 IST

पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या बळीराजावर वरुणराजाने कृपादृष्टी दाखविली. मूल तालुक्यात ४५७.४ मिमी पाऊस पडला असून समाधानकारक पावसाने शेतकरी सुखावला असल्याचे चित्र दिसत आहे.

बोडी-तलावात पाणी साठले : पेरण्यांच्या कामांना अचानक वेगमूल: पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या बळीराजावर वरुणराजाने कृपादृष्टी दाखविली. मूल तालुक्यात ४५७.४ मिमी पाऊस पडला असून समाधानकारक पावसाने शेतकरी सुखावला असल्याचे चित्र दिसत आहे.आजच्या स्थितीत धानाच्या ९० टक्के पेरण्या आटोपल्या असून उर्वरित पेरण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू असल्याचे दिसून येते. तसेच धानाच्या पिकाला जोड म्हणून पर्यायी पिकालासुद्धा शेतकऱ्यांनी पसंती दर्शवित कापूस, तुर, सोयाबीन, भाजीपाला याचादेखील पेरा पूर्ण केल्याचे दिसून येते. यावर्षी १६० हेक्टरवर आवत्याची पेरणी झाली आहे, हे विशेष!मूल तालुक्यात दोन नक्षत्र कोरडे जात असल्याने शेतकरी चिंतातूर झाला होता. यावर्षी भरपूर पाऊस येणार ही हवामान खात्याची भविष्यवानी खोटी ठरणार काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना वेळोवेळी सतावत होता. मात्र प्रथमत: ३ जूनला ३६.८ मिमी पाऊस पडून पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर कमी-अधीक प्रमाणात पाऊस पडल्याने आजच्या स्थितीत ४५७.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांची धावपळ झाल्याचे दिसून येते. काही शेतकऱ्यांनी चिखल पऱ्हे टाकण्यास पसंती दर्शविली तर काहींनी आवत्या धानाच्या पेऱ्याला पसंती दिल्याचे दिसते. तालुक्यातील पिकाखाली क्षेत्र २४ हजार हेक्टर असून धान पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १० हजार ७६० हेक्टर आहे. आजच्या स्थितीत ९ हजार ४५० हेक्टरसाठी धानाचे पऱ्हे १०५० हेक्टर पेरण्यात आले. एकंदरीत ९० टक्के धानाच्या पेरण्यापूर्ण झाल्या आहेत. पर्यायी पीक म्हणून शेतकऱ्यांनी तूर २१० हेक्टर, सोयाबीन ७९९ हेक्टर, कापूस १७० हेक्टर, भाजीपाला १५ हेक्टर, लागवड केली आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालय मूल अंतर्गत जलशिवार योजनेअंतर्गत मृद संधारण कामामुळे शेतकऱ्यांना संरक्षित पाणी देण्याची सोय उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे पिकांना नक्कीच फायदा होईल, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.मूल तालुक्यात मागील वर्षी १११ गावांपैकी मोजक्या गावातच धानाचे पिक झाले. उर्वरित गावामध्ये दुष्काळाची झळ शेतकऱ्यांना सोसावी लागली. मात्र दुष्काळाचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नाही. तसेच पिकविम्याची रक्कमदेखील देण्यास शासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे सतत दोन वर्षे मूल तालुक्यातील शेतकरी पिकविम्यापासून वंचित होत असल्याने शेतकऱ्यात असंतोष दिसून येत आहे. या गंभीर बाबीकडे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)