शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

गडचांदुरातील आरोग्य सेवा कोलमडली

By admin | Updated: December 24, 2014 22:57 IST

गडचांदूर शहर व परिसरातील इतर गावांचा विचार केल्यास येथे उपजिल्हा रुग्णालयाची आवश्यकता आहे. गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची प्रचंड गर्दी असते. कधीकधी तर रुग्णांवर उपचार

आशिष देरकर - गडचांदूरगडचांदूर शहर व परिसरातील इतर गावांचा विचार केल्यास येथे उपजिल्हा रुग्णालयाची आवश्यकता आहे. गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची प्रचंड गर्दी असते. कधीकधी तर रुग्णांवर उपचार करण्यासाठी जागाच उपलब्ध नसते. विविध औषधींचा तुटवडा व कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या यामुळे रुग्णालयच आजारी असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गडचांदुरातील आरोग्य सेवा आजही कोलमडलेली आहे.गडचांदूर औद्योगिक परिसर असल्यामुळे येथे अपघाताचे प्रमाण जास्त आहे. दोन-तीन डॉक्टर सोडल्यास खासगी दवाखाने दर्जेदार नसल्यामुळे ग्रामीण रुग्णालयाला गडचांदुरात महत्व आहे. खासगी दवाखान्यात उपचार केल्यास हजारो रुपये मोजावे लागतात. त्यामुळे रुग्ण ग्रामीण रुग्णालयाचा आधार घेतात. मात्र गडचांदूर ग्रामीण रुग्णालयाची अवस्था फार बिकट आहे. त्यामुळे रुग्णांना गडचांदूर रुग्णालयाबद्दल विश्वासार्हताच नाही.येथील ग्रामीण रुग्णालयात औषधांचा नेहमीच तुटवडा असतो. कुत्रा चावला तर ‘रेबीज’ची लस मिळेल याची शाश्वती नसते. रूग्णाला औषधाच्या दुकानातून ती विकत आणावी लागते. बाळंतपणात तर ‘सिझेरियन’ची नवी पद्धत अलीकडे आली आहे. गरिबाला ते परवडणारे नसते. ग्रामीण रुग्णालयात ती सुविधा नसते. अशावेळी जिल्ह्याच्या ठिकाणी वशिला लावूनच रूग्ण न्यावा लागतो. गरीब रुग्णांसमोर अशावेळी फार अडचण निर्माण होते.मोठ्या संख्येने येथे रुग्ण येत असले तरी डॉक्टरांची व कर्मचाऱ्यांची संख्या तुटपुंजी आहे. त्यामुळे ऐनवेळी रुग्णांची संख्या वाढली तर डॉक्टरांचीसुद्धा फजिती होते. कित्येकदा एकाचवेळी अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. उपचारात कमी-जास्त झाल्यास संपूर्ण दोष मात्र डॉक्टरांना दिला जातो. कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे रुग्णांच्या आरोग्याशी खेळले जात आहे. त्यामुळे पैशाचा तुटवडा असला तरी लहान बालक, हृदयरोग, मेंदूविकार, अपघाती रुग्ण अशा किती तरी आजारासाठी रुग्णांना खाजगी रुग्णालयच गाठावे लागते.