शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
2
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
3
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
4
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
5
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
6
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
7
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
8
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
9
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
10
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
11
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
12
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
13
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
14
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
15
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
16
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
17
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
18
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
19
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
20
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर

मुख्याध्यापक जोमात, तर विद्यार्थी कोमात

By admin | Updated: February 13, 2017 00:38 IST

विद्यार्थ्यांच्या सर्वांगिन विकासासाठी शासन कट्टीबद्ध आहे. मात्र मुख्याध्यापकांच्या मनमानी कारभाराने विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आल्याची स्थिती तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये दिसून येत आहे.

गोंडपिंपरी तालुक्यातील जि. प. शाळांतील प्रकार : मुख्याध्यापकांचा मनमानी कारभारआकाश चौधरी गोंडपिपरीविद्यार्थ्यांच्या सर्वांगिन विकासासाठी शासन कट्टीबद्ध आहे. मात्र मुख्याध्यापकांच्या मनमानी कारभाराने विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आल्याची स्थिती तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये दिसून येत आहे. शाळेच्या कार्यालयीन कामाच्या नावावर आपल्या वैयक्तिक कामासाठी मुख्याध्यापक पसार होत आहेत. त्यामुळे मुख्याध्यापकांकडे वर्ग असलेल्या मुलांची शैक्षणिक प्रगती अतिशय बिकट होत चालली आहे. त्यामुळे विद्यार्थी कोमात दिसून येत असून मुख्याध्यापक मात्र आपआपली वैयक्तिक कामे करण्यासाठी जोमात दिसून येत आहेत. गोंडपिपरी तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकांकडून असला प्रकार सुरू आहे. यामुळे पालकांमध्ये रोष पसरला आहे. गोंडपिपरी तालुक्यात ८५ प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत. यापैकी कित्येक शाळेतील मुख्याध्यापक ५० ते ६० किमी अंतरावरुन ये-जा करतात. यामुळे वैयक्तिक कामे करण्यास ते असमर्थ ठरत आहेत. या वैयक्तीक कामावर मात करण्यासाठी अनेक मुख्याध्यापकांनी नवी शक्कल लढविली आहे. मिटींग, लाईट बिल, प्रपत्र तर कधी आॅनलाईन माहितीचा बहाना सांगत हलचल रजिस्टरवर नोंद न करता घरी परस्पर पसार होत असतात. मिटींग अथवा काही कार्यालयीन काम असले तरी पहिले शाळेत येवून हलचल रजिस्टरवर नोंद करून कार्यालयीन कामासाठी बाहेर पडणे व काम संपल्यावर शाळेत येवून पुन्हा हलचल रजिस्टरवर सह्या करणे अनिवार्य आहे. मात्र या नियमांना बगल देत कित्येक मुख्याध्यापकांनी शाळा बुडवून वैयक्तीक कामे करण्याची सवय लावल्याने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाचा बट्याबोळ झाल्याचे दिसून येत आहे. काही मुख्याध्यापकांनी तर चक्क आपल्याकडे असलेले विषय व इतर काही कामे दुसऱ्या शिक्षकांवर लादत आहेत. यामुळे त्या शिक्षकांवर अधिकचा भार पडत आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबाबत काही येत नसल्यास शिविगाळ करणे, धमकावणे असेही प्रकार सुरू आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)कार्यालयीन कामाच्या नावावर अनेक शाळेतील मुख्याध्यापक शाळेला बुट्ट्या मारून आपले वैयक्तिक कामे करताना पहायला मिळत आहे. या मुख्याध्यापकांवर शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने मनमानी कारभार सुरू आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य अंधारात येण्याची वेळ ओढावली आहे. अशा मुख्याध्यापकांची चौकशी करून कार्यवाही करणे गरजेचे आहे.- सुरेश चरडे, नगरसेवक, गोंडपिपरीमुख्याध्यापकांनी कुठलेही कार्यालयीन काम असो, त्यांनी आपल्या शाळेतील सहकारी शिक्षकांना सांगून हलचल रजिस्टरवर नोंद करून जाणे आवश्यक आहे यासंदर्भात शाळा व्यवस्थापन समितीला कळवणेही आवश्यक आहे. असले प्रकार सुरू असतील तर चौकशी करून दोषी मुख्याध्यापकांवर कार्यवाही करू.- झावरू उराडे, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, गोंडपिपरी