शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क राजुरा : राज्य शासनाच्या कृषी विभागांतर्गत योजनांतून शेतकऱ्यांना अनुदानावर बी-बियाणे, शेतीपयोगी साहित्य मिळते. याकरिता शेतकऱ्यांना ऑनलाईन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

राजुरा : राज्य शासनाच्या कृषी विभागांतर्गत योजनांतून शेतकऱ्यांना अनुदानावर बी-बियाणे, शेतीपयोगी साहित्य मिळते. याकरिता शेतकऱ्यांना ऑनलाईन माहिती भरावी लागते. मात्र, मागील काही दिवसांपासून ऑनलाईन कामामध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याने शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

विशेष म्हणजे, या योजनांचा लाभ घेण्यासाठी २४ मे हा शेवटचा दिवस होता. अशावेळी ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर बळीराजाला कृषी योजनांपासून वंचित राहावे लागणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने या गंभीर प्रश्नी लक्ष घालून ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख वाढवावी, अशी मागणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर नरड यांनी केली आहे.

शेतीचा खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. बी-बियाणे व शेतीपयोगी साहित्य खरेदीसाठी शेतकरी कृषी केंद्रात जात आहेत. सध्या शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे मेटाकुटीला आला आहे. रब्बी पिके हातात आली असतानाच वरुणराजा बरसल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे बळीराजा चांगलाच आर्थिक अडचणीत सापडला आहे. तरीही शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी कंबर कसली आहे. पण शासकीय योजनांसाठी त्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.

मागील काही दिवसांपासून ऑनलाईनमध्ये तांत्रिक बिघाड असल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. यामुळे कृषी योजनांचा लाभ मिळविण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यातच २४ मे हा शेवटचा दिवस असल्याने शेतकऱ्यांत मोठा रोष पाहायला मिळत आहे. मुळात ऑनलाईन व्यवस्थेत तांत्रिक घोळ असतानाही याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. त्यांच्या याच बेजबाबदारपणामुळे शेतकरी कृषी योजनांपासून वंचित राहू शकतो. शासनाने अनुदानावर मिळणाऱ्या योजनांसाठी ऑनलाईनची तारीख वाढवावी, अशी मागणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर नरड यांनी केली आहे.