शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

प्रशासनाच्या दुतांनीच वाढविली नागरिकांची डोकेदुखी

By admin | Updated: July 16, 2014 23:59 IST

शासनाच्या धोरणाविषयी ग्रामसेवकांनी सुरु केलेल्या बेमुदत काम बंद आंदोलनामुळे ग्रामीण भागातील जनतेची कामे खोळंबली आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्रे तयार करण्याकरिता तर शेतकऱ्यांना पिक

राजकुमार चुनारकर - खडसंगीशासनाच्या धोरणाविषयी ग्रामसेवकांनी सुरु केलेल्या बेमुदत काम बंद आंदोलनामुळे ग्रामीण भागातील जनतेची कामे खोळंबली आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्रे तयार करण्याकरिता तर शेतकऱ्यांना पिक कर्ज व अन्य योजनांचा लाभ मिळणे दुरापस्त झाले आहे. त्यामुळे ग्रामसेवकांचा शासनाच्या विरोधात चाललेल्या या आंदोलनाचा त्वरित तोडगा काढण्याची मागणी जनतेकडून होत आहे.चिमूर तालुक्यातील ९८ ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी २ जुलैपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतीच्या चाव्या संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे दिल्या आहेत. ग्रामीण जनता आणि शासन यांचा दुत असलेल्या ग्रामसेवकाच्या माध्यमातून शासकीय योजनांची अंमलबजावणी केली जाते. शासनाची कोणतीही माहिती अथवा योजना जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम ग्रामसेवक करीत असतो. ग्रामसेवकाने दिलेल्या कागदपत्राच्या आधारे वरिष्ठ अधिकारी विविध प्रमाणपत्र देतात.महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या नेतृत्वात ग्रामसेवकांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे ग्रामसभासदांना प्रमाणपत्रे उपलब्ध होणे बंद झाले आहे. तालुक्यातील शेतकरी, विद्यार्थ्यांचे अनेक कामे खोळंबली आहेत. यामुळे शैक्षणिक प्रवेश व जात विषयक प्रमाणपत्रापासून विद्यार्थी व शेतकरी वंचित राहत आहेत.