शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

प्रशासनाच्या दुतांनीच वाढविली नागरिकांची डोकेदुखी

By admin | Updated: July 16, 2014 23:59 IST

शासनाच्या धोरणाविषयी ग्रामसेवकांनी सुरु केलेल्या बेमुदत काम बंद आंदोलनामुळे ग्रामीण भागातील जनतेची कामे खोळंबली आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्रे तयार करण्याकरिता तर शेतकऱ्यांना पिक

राजकुमार चुनारकर - खडसंगीशासनाच्या धोरणाविषयी ग्रामसेवकांनी सुरु केलेल्या बेमुदत काम बंद आंदोलनामुळे ग्रामीण भागातील जनतेची कामे खोळंबली आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्रे तयार करण्याकरिता तर शेतकऱ्यांना पिक कर्ज व अन्य योजनांचा लाभ मिळणे दुरापस्त झाले आहे. त्यामुळे ग्रामसेवकांचा शासनाच्या विरोधात चाललेल्या या आंदोलनाचा त्वरित तोडगा काढण्याची मागणी जनतेकडून होत आहे.चिमूर तालुक्यातील ९८ ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी २ जुलैपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतीच्या चाव्या संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे दिल्या आहेत. ग्रामीण जनता आणि शासन यांचा दुत असलेल्या ग्रामसेवकाच्या माध्यमातून शासकीय योजनांची अंमलबजावणी केली जाते. शासनाची कोणतीही माहिती अथवा योजना जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम ग्रामसेवक करीत असतो. ग्रामसेवकाने दिलेल्या कागदपत्राच्या आधारे वरिष्ठ अधिकारी विविध प्रमाणपत्र देतात.महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या नेतृत्वात ग्रामसेवकांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे ग्रामसभासदांना प्रमाणपत्रे उपलब्ध होणे बंद झाले आहे. तालुक्यातील शेतकरी, विद्यार्थ्यांचे अनेक कामे खोळंबली आहेत. यामुळे शैक्षणिक प्रवेश व जात विषयक प्रमाणपत्रापासून विद्यार्थी व शेतकरी वंचित राहत आहेत.