शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
5
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
6
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
7
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
8
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
9
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
10
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
11
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
12
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
13
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
14
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
15
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
16
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
17
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
18
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
19
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
20
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!

तहानेने व्याकूळ वाटसरूंसाठी ‘तो’ ठरला जलदूत

By admin | Updated: May 24, 2016 01:18 IST

४५ अंशापार झालेल्या तीव्र उन्हात तहानेने व्याकूळ झालेल्या एखाद्या वाटसरूसमोर अचानक कुणी थंडगार आणि शुद्ध पिण्याचे पाणी घेऊन आले तर...

स्कुटीवर उभारली मोबाईल पाणपोई : नागरिकांना मिळतोयं दिलासाचंद्रपूर : ४५ अंशापार झालेल्या तीव्र उन्हात तहानेने व्याकूळ झालेल्या एखाद्या वाटसरूसमोर अचानक कुणी थंडगार आणि शुद्ध पिण्याचे पाणी घेऊन आले तर त्या वाटसरूच्या मनात समाधानाच्या लहरी उठतील. चंद्रपूर शहरातील तहानलेल्या वाटसरूंना तृप्त करण्याचे काम एक जलदूत करीत आहे. त्याचा हा उपक्रम सर्वांच्याच कौतुकाचा विषय ठरला आहे.सुनिल तिवारी असे त्याचे नाव. पेशाने पत्रकार असलेल्या सुनिल तिवारी यांनी चक्क त्यांच्या स्कुटीवर पाणपोई उभारली आहे. त्यासाठी स्कुटीवर त्यांनी खास व्यवस्था करून घेतली आहे. या ना त्या कारणाने दररोज अनेकदा शहरातून फेरफटका होतो. तेव्हा स्कुटीच्या मागील बाजुला पाण्याची कॅन आवर्जून असते. त्यावर दोन प्लॉस्टीकचे ग्लासही असतात. ही कॅन ठेवण्यासाठी तयार केलेल्या चौकटीवर पाणी बचतीचा संदेशही दिला आहे. रस्त्याने जाताना एखाद्या वाटसरूने हात दाखविला की, ते थांबतात. तहानेने व्याकूळ झालेला वाटसरू मग या छोटेखानी पाणपोईतील पाणी पिवून तृप्त होतो. या मागे प्रसिद्धीचा कोणताही हेतू नाही. केवळ हे करताना मनाला समाधान मिळते, असे सुनिल तिवारी सांगतात. त्यांचे काका सत्यनारायण तिवारी यांनी आजवर २११ वेळा रक्तदान केले आहे. त्यांच्या सामाजिक विचारातूनच मलाही सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली, असे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)ओआरएस पावडरही असते सोबतसध्या खूप उन्ह तापत असल्याने अनेकांना उष्माघात होतो. ही बाब लक्षात घेऊन अलिकडे ओआरएस पावडरदेखील सोबत ठेवतो. रस्त्याने एखादा वाटसरू उष्माघाताने अशक्त झालेला दिसला तर लगेच त्याला सुनिल तिवारी ओआरएस पावडर पाण्यात टाकून पाजतात. त्यातून वाटसरूला दिलासा मिळतो. चंद्रपूर शहर हे ‘हॉट सीटी’ म्हणून ओळखले जाते. पूर्वी चंद्रपुरात ठिकठिकाणी पाणपोई उभारल्या जात असे.परंतु अलिकडे पाणपोईंची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे वाटसरूंना तृष्णातृप्तीसाठी भटकावे लागते. ही गरज लक्षात घेऊन आपल्याला ही मोबाईल पाणपोईची कल्पना सुचली. त्याला नागरिकांचाही चांगला प्रतिसाद आहे.-सुनिल तिवारी, सामाजिक कार्यकर्ते