शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रसंतांच्या समाधीपुढे ‘त्यांनी’ घेतली होती शपथ!

By admin | Updated: January 20, 2015 23:09 IST

शुक्रवार, तारीख २९ आॅक्टोबर २०१०. वेळ सकाळी ११ वाजताची. गुरूकुंज मोझरी येथे राष्ट्रसंतांच्या समाधीपुढे शिस्तीत उभे राहून ‘त्यांनी’ घेतलेली शपथ त्या धिरगंंभीर वातावरणात अधिकच गंभीर भासत होती.

कुणी केली स्वाक्षरी, कुणी मारले अंगठे! गोपालकृष्ण मांडवकर - चंद्रपूरशुक्रवार, तारीख २९ आॅक्टोबर २०१०. वेळ सकाळी ११ वाजताची. गुरूकुंज मोझरी येथे राष्ट्रसंतांच्या समाधीपुढे शिस्तीत उभे राहून ‘त्यांनी’ घेतलेली शपथ त्या धिरगंंभीर वातावरणात अधिकच गंभीर भासत होती. ‘आम्ही कुठल्याही आमिषाला, कुठल्याही दडपणाला बळी पडणार नाही... दारूबंदीच्या घोषणेशिवाय माघार घेणार नाही...’ शांत वातावरणाला चिरत जाणाऱ्या त्या प्रतिज्ञेतील शक्तीची प्रचिती मंगळवारी तब्बल साडेचार वर्षांनी आली आणि घरोघरी लावलेल्या प्रतिज्ञांच्या तसबिरींनी आज जणू ऐतिहासिक शिलालेखाचा आयाम आला !चंद्रपूर जिल्ह्याच्या दारूबंदीचा ध्यास घेतलेल्या श्रमिक एल्गार संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या मनातील भावना आता आभाळापेक्षाही विशाल आणि शब्दातही न व्यक्त करता येण्यासारख्या झाल्या आहेत. गेल्या दशकापासून सुरू असलेल्या अथक संघर्षाला आलेले यश या आंदोलनकर्त्याच्या डोळातून वाहणाऱ्या आनंदाश्रूतून प्रगट होत असल्याचे चित्र आज मंगळवारी चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिसत होते.दारूबंदी आंदोलनाचा ध्यास घेऊन श्रमिक एल्गारच्या अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी, डॉ. राणी बंग आदींच्या पुढाकारात आणि हजारो महिलांच्या सहभागातून उदयास आलेल्या आंदोलनाची सार्थकता मंत्रीमंळाच्या निर्णयाने झाली आहे. ग्रामस्वच्छता आणि व्यसनमुक्तीचा सदोदित ध्यास घेतलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेतून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चंद्रपूर जिल्हा दारूबंदी आभियानाची स्थापना करण्यात आली होती. त्या अंतर्गत अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांच्या पुढाकारात निर्धार यात्रा काढण्यात आली होती. यात ७० महिला आणि ३० पुरूष असे १०० जण सहभागी झाले होते. १० आक्टोबर २०१० रोजी या कार्यकर्त्यांनी गुरूकुंज मोझरी येथे जाऊन शपथ घेतली होती. आश्रमाचे तत्कालिन सर्वाधिकारी बबनदादा वानखेडे यांनी प्रकाशदादा वाघ यांच्या उपस्थितीत या सर्वांना शपथ दिली होती. एक हात उंचावून या सर्वांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या दारूबंदीसाठी शपथ घेतली होती. त्यानंतर प्रत्येकाने समाधीच्या ओट्यावर शपथेचा छापिल कागद ठेवून राष्ट्रसंतांच्या साक्षीने त्यावर स्वाक्षरी केली होती. ज्यांना स्वाक्षरी येत नव्हती त्यांनी अंगठा मारला होता. दारूबंदीच्या निधाराने झपाटलेल्या या प्रार्थनेच्या बळामुळे आणि प्रतिज्ञेच्या शक्तीमुळे लढ्याला यश आल्याची भावना आंदोलकर्त्यांची आहे.