शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

नैसर्गिक पळसफुलांच्या रंगावर घातक रासायनिक रंगाची कुरघोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 22:29 IST

धुळवडीच्या दिवशी वापरण्यात येणाऱ्या पळसफुलांच्या रंगावर आधुनिक रायायनिक घात रंगांनी कुरघोडी केल्यामुळे पळसफुलांचा रंग कालबाह्य झाल्याने तो दिसेनासा झाला आहे.

ठळक मुद्देधुळवडीच्या दिवशी घातक रंगांचा वापर : पारंपरिक रंग झाला कालबाह्य

प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : धुळवडीच्या दिवशी वापरण्यात येणाऱ्या पळसफुलांच्या रंगावर आधुनिक रायायनिक घात रंगांनी कुरघोडी केल्यामुळे पळसफुलांचा रंग कालबाह्य झाल्याने तो दिसेनासा झाला आहे. रासायनिक रंगाची धुळवडीच्या दिवशी मोठी उधळण करण्यात येत असल्यामुळे या रासायनिक रंगामुळे मानवी शरिरावर विघातक परिणाम होण्याचा धोका आहे.जग झपाट्याने बदलल्याने काळनुरूप प्रथा, परंपरा चालीरिती बदलल्या आहेत. बदलणे हा काळाचा नियम असला तरी होळी व धुलिवंदनाच्या दिवशी वापरण्यात येणाऱ्या पळसफुलांपासून तयार करण्यात येणाºया रंगाचे अस्तित्व काळाच्या ओघात मागे पडले आहे. होळी सण जवळ येताच जंगलात जावून पळसाची फुले आणून त्यापासून रंग बनविला जायचा. या रंगाचे एक वेगळेच स्थान धुळवडीच्या दिवशी असायचे. प्रत्येकांच्या घरी पळसफुलांपासून बनविलेला रंग असायचा. या नैसर्गिक रंगाची नागरिक, लहान मुले, बालगोपाल, महिला, युवती, मुक्तपणे उधळण करायच्या. जंगल परिसरात पळसफुलांची मुक्त उधळण अनेकांना भुरळ घालायची. परंतु आता पळसफुलांचा रंग काळाच्या ओघात लुप्त झाल्याने त्याची जागा रासायनिक रंंगांनी घेतली आहे.रासायनिक रंग एवढे घातक असताना ते शरिरावर अनिष्ट परिणाम करतात. चेहºयाला किंवा शरिरावर हे रासायनिक रंग लावले तर चेहरा खराब होण्याचा धोका असतो. या रासायनिक रंगाचा वापर करणे सर्वांनी टाळले पाहिजे. मात्र बाजारपेठेत होळीच्या निमित्ताने सजलेली रंगाची दुकाने आपल्याला भूरळ घालत असली तरी हे रासायनिक रंग अतिशय घातक आहे.एकीकडे विज्ञानाने झपाट्याने यशाची उत्तुंग शिखरे गाठली असताना ‘जुनं ते सोनं’ या उक्तीप्रमाणे जे चांगले आहे, त्याचा स्वीकार करायला नागरिक तयार नाही. जंगले नष्ट झाल्याने माणसाने पळसफुलांच्या झाडावरही घाव घातला. त्यामुळे मुक्त नैसर्गिक उधळण करणारी पळसफुलांची झाडे दिसणे आता दुर्मिळ झाले आहै. आज धुळवडीच्या पार्श्वभूमीवर अज्ञान, आळस झटकून समाजातील वाईट प्रथा, परंपरा, होळीमध्ये दहन करून सर्वांनी रासायनिक रंगांची उधळण करणे टाळले पाहिजे.