शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

शेतीची अधोगतीकडे वाटचाल शेतकºयांसाठी धोक्याची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 23:45 IST

शेतपिकांची दिवसेंदिवस खालावत जाणारी स्थिती कृषी क्षेत्रावर अवकळा आणणारी आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून पाऊस अचानक गायब झाल्याने शेतीचे वाळवंट होण्याची भिती शेतकºयांना आहे.

ठळक मुद्देपावसाअभावी उत्पादनात होणार घट : पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : शेतपिकांची दिवसेंदिवस खालावत जाणारी स्थिती कृषी क्षेत्रावर अवकळा आणणारी आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून पाऊस अचानक गायब झाल्याने शेतीचे वाळवंट होण्याची भिती शेतकºयांना आहे. शेतपिकांना पावसाची नितांत गरज असताना पाऊस येत नसल्याने शेतीची अधोगतीकडे वाटचाल सुरू झाली असून शेतकºयांसाठी ही धोक्याची घंटा आहे.कृषी प्रधान देशातील बहुतांश शेती आजही निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. यावर्षी पाऊस अपुरा पडला. पावसाळा संपायला आला तरी धरणात अजुनही पाहिजे तसा जलसाठा नाही. नदी, नाले, तलाव, बंधारे अजुनही कोरडे आहेत. दरवर्षीपेक्षा यावर्षी पाण्याची भीषणता दर्शविणारे चित्र निर्माण झाले आहे. पावसाशिवाय शेती ही संकल्पनाच तशी निराधार आहे. पाऊस पडला तरच शेती पिकेल, हे एक कटू सत्य असताना यावर्षी निसर्गाने शेतकºयांकडे पाठ फिरविली.कृषी क्षेत्र हे देशाचे प्राण समजले जाते. परंतु दिवसेंदिवस कृषी क्षेत्रावर आलेली अवस्था चिंतेची बाब आहे. निसर्ग पूर्वीसारखा शेतकºयांना साथ देत नाही. सरकारही शेतकºयांच्या पाठीशी नाही. यावर्षी शेतकºयांना कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागत असून दिवस-रात्रं काबाडकस्ट करणाºया शेतकºयांच्या हाती आलेले पीक उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे शेतकºयांनी काय करावे, याचा शासनाने विचार करण्याची गरज आहे.करपलेले पीक आणि डोळ्यात अश्रूंच्या धाराशेतात दिवसंरात्र काम करूनही शेवटी काहीच हाती लागत नाही. सारे काही व्यर्थ आहे. नापिकीने शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जात आहे. त्यामुळे करपलेले पीक पाहून शेतकºयांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा दिसत आहेत.कृषी क्षेत्रावर आज आलेली स्थिती वाईट आहे. पावसाअभावी शेतपिके करपायला लागली आहेत. दिवसंरात्र काबाडकस्ट करूनही शेतकºयांच्या हाती काहीच उरत नाही. त्यामुळे कृषी क्षेत्रावर अवकळा आली आहे.- सुनील पिंपळशेंडे, शेतकरी, वनोजा.