शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

शेतीची अधोगतीकडे वाटचाल शेतकºयांसाठी धोक्याची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 23:45 IST

शेतपिकांची दिवसेंदिवस खालावत जाणारी स्थिती कृषी क्षेत्रावर अवकळा आणणारी आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून पाऊस अचानक गायब झाल्याने शेतीचे वाळवंट होण्याची भिती शेतकºयांना आहे.

ठळक मुद्देपावसाअभावी उत्पादनात होणार घट : पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : शेतपिकांची दिवसेंदिवस खालावत जाणारी स्थिती कृषी क्षेत्रावर अवकळा आणणारी आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून पाऊस अचानक गायब झाल्याने शेतीचे वाळवंट होण्याची भिती शेतकºयांना आहे. शेतपिकांना पावसाची नितांत गरज असताना पाऊस येत नसल्याने शेतीची अधोगतीकडे वाटचाल सुरू झाली असून शेतकºयांसाठी ही धोक्याची घंटा आहे.कृषी प्रधान देशातील बहुतांश शेती आजही निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. यावर्षी पाऊस अपुरा पडला. पावसाळा संपायला आला तरी धरणात अजुनही पाहिजे तसा जलसाठा नाही. नदी, नाले, तलाव, बंधारे अजुनही कोरडे आहेत. दरवर्षीपेक्षा यावर्षी पाण्याची भीषणता दर्शविणारे चित्र निर्माण झाले आहे. पावसाशिवाय शेती ही संकल्पनाच तशी निराधार आहे. पाऊस पडला तरच शेती पिकेल, हे एक कटू सत्य असताना यावर्षी निसर्गाने शेतकºयांकडे पाठ फिरविली.कृषी क्षेत्र हे देशाचे प्राण समजले जाते. परंतु दिवसेंदिवस कृषी क्षेत्रावर आलेली अवस्था चिंतेची बाब आहे. निसर्ग पूर्वीसारखा शेतकºयांना साथ देत नाही. सरकारही शेतकºयांच्या पाठीशी नाही. यावर्षी शेतकºयांना कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागत असून दिवस-रात्रं काबाडकस्ट करणाºया शेतकºयांच्या हाती आलेले पीक उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे शेतकºयांनी काय करावे, याचा शासनाने विचार करण्याची गरज आहे.करपलेले पीक आणि डोळ्यात अश्रूंच्या धाराशेतात दिवसंरात्र काम करूनही शेवटी काहीच हाती लागत नाही. सारे काही व्यर्थ आहे. नापिकीने शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जात आहे. त्यामुळे करपलेले पीक पाहून शेतकºयांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा दिसत आहेत.कृषी क्षेत्रावर आज आलेली स्थिती वाईट आहे. पावसाअभावी शेतपिके करपायला लागली आहेत. दिवसंरात्र काबाडकस्ट करूनही शेतकºयांच्या हाती काहीच उरत नाही. त्यामुळे कृषी क्षेत्रावर अवकळा आली आहे.- सुनील पिंपळशेंडे, शेतकरी, वनोजा.