शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

शेतीची अधोगतीकडे वाटचाल शेतकºयांसाठी धोक्याची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 23:45 IST

शेतपिकांची दिवसेंदिवस खालावत जाणारी स्थिती कृषी क्षेत्रावर अवकळा आणणारी आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून पाऊस अचानक गायब झाल्याने शेतीचे वाळवंट होण्याची भिती शेतकºयांना आहे.

ठळक मुद्देपावसाअभावी उत्पादनात होणार घट : पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : शेतपिकांची दिवसेंदिवस खालावत जाणारी स्थिती कृषी क्षेत्रावर अवकळा आणणारी आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून पाऊस अचानक गायब झाल्याने शेतीचे वाळवंट होण्याची भिती शेतकºयांना आहे. शेतपिकांना पावसाची नितांत गरज असताना पाऊस येत नसल्याने शेतीची अधोगतीकडे वाटचाल सुरू झाली असून शेतकºयांसाठी ही धोक्याची घंटा आहे.कृषी प्रधान देशातील बहुतांश शेती आजही निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. यावर्षी पाऊस अपुरा पडला. पावसाळा संपायला आला तरी धरणात अजुनही पाहिजे तसा जलसाठा नाही. नदी, नाले, तलाव, बंधारे अजुनही कोरडे आहेत. दरवर्षीपेक्षा यावर्षी पाण्याची भीषणता दर्शविणारे चित्र निर्माण झाले आहे. पावसाशिवाय शेती ही संकल्पनाच तशी निराधार आहे. पाऊस पडला तरच शेती पिकेल, हे एक कटू सत्य असताना यावर्षी निसर्गाने शेतकºयांकडे पाठ फिरविली.कृषी क्षेत्र हे देशाचे प्राण समजले जाते. परंतु दिवसेंदिवस कृषी क्षेत्रावर आलेली अवस्था चिंतेची बाब आहे. निसर्ग पूर्वीसारखा शेतकºयांना साथ देत नाही. सरकारही शेतकºयांच्या पाठीशी नाही. यावर्षी शेतकºयांना कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागत असून दिवस-रात्रं काबाडकस्ट करणाºया शेतकºयांच्या हाती आलेले पीक उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे शेतकºयांनी काय करावे, याचा शासनाने विचार करण्याची गरज आहे.करपलेले पीक आणि डोळ्यात अश्रूंच्या धाराशेतात दिवसंरात्र काम करूनही शेवटी काहीच हाती लागत नाही. सारे काही व्यर्थ आहे. नापिकीने शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जात आहे. त्यामुळे करपलेले पीक पाहून शेतकºयांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा दिसत आहेत.कृषी क्षेत्रावर आज आलेली स्थिती वाईट आहे. पावसाअभावी शेतपिके करपायला लागली आहेत. दिवसंरात्र काबाडकस्ट करूनही शेतकºयांच्या हाती काहीच उरत नाही. त्यामुळे कृषी क्षेत्रावर अवकळा आली आहे.- सुनील पिंपळशेंडे, शेतकरी, वनोजा.