शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

हवालदिल शेतकरी झिजवतो बँकांचे उंबरठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 23:22 IST

विनेशचंद्र मांडवकर।आॅनलाईन लोकमतनंदोरी : अस्मानी व सुलतानी संकटात बळीराजा पूर्णत: होरपळून निघाला. बोंडअळीचे सावट विदर्भासह संबध महाराष्ट्रातही पसरले. कृषी अधिकारी व तत्सम संबंधित अधिकाऱ्यांनी पूर्ण गुण देऊन बियाणे पास केले. कपाशीचे पीक निम्यापेक्षाही कमी आले. आधीच परिस्थितीने मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांचा यात बळी गेला. आज ग्रामीण शेतकरी कर्जमाफीचे पैसे आलेत का, ...

ठळक मुद्देबळीराजाचा टाहो : कर्जमाफीचे पैसे आलेत का ?

विनेशचंद्र मांडवकर।आॅनलाईन लोकमतनंदोरी : अस्मानी व सुलतानी संकटात बळीराजा पूर्णत: होरपळून निघाला. बोंडअळीचे सावट विदर्भासह संबध महाराष्ट्रातही पसरले. कृषी अधिकारी व तत्सम संबंधित अधिकाऱ्यांनी पूर्ण गुण देऊन बियाणे पास केले. कपाशीचे पीक निम्यापेक्षाही कमी आले. आधीच परिस्थितीने मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांचा यात बळी गेला. आज ग्रामीण शेतकरी कर्जमाफीचे पैसे आलेत का, हे विचारत तलाठी कार्यालय व बँकांचे उंबरठे झिजवत आहे.चालू कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना २५ टक्के कसाबसा लाभ मिळाला असल्याचे बँक अधिकारी सांगतात. थकबाकीदार व परिस्थितीने नडलेला शेतकरी मात्र आजही डोळ्यात प्राण आणून कर्जमुक्तीची वाट बघत आहे. पुढील हंगामात बियाणांकरिता पैशाची व्यवस्था कशी करावी, मुलीचे लग्न कसे करावे, पोरांची शाळा-कॉलेज शुल्क कसे भरावे, या विवंचनेत आहे.जगाचा पोशिंदा समजल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांवर आजही दु:खाचे सावट पसरले आहे. बीजी-२, नंतर बीजी-३ आली. बोंडअळीस प्रतिकारक म्हणून बीजी-२ या कपाशीच्या बियाण्यांचा गाजावाजा झाला. तणसमारक म्हणून बीजी-३ या कपाशीला शेतकºयांनी डोक्यावर घेतले.बीजी-३ व बीजी-२ बोंडअळ्यांनी पोखरून टाकली. कंपन्या व अधिकारी मात्र गलेलठ्ठ झाले. एकीकडे शेतकऱ्यांचा उध्दारकर्ता म्हणून सत्ताधाऱ्यांनी गाजावाजा केला. आज शेतकरी त्याची नुकसान भरपाई मागत आहे. तरीही त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.दरम्यान, शेतकऱ्यांनी कृषिपंपांकरिता बँकांकडे अर्ज केल्यास या प्रक्रियेत थकीत पीक कर्ज आड येत असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.लाख मोलाचे पीक गेले. रोगप्रतिकारक म्हणून बीजी-२ कपाशी लावली. ती बोंडअळ्यांनी फस्त केली. शासनाने बोगस बियाणे पास केले. कंपन्या व संबंधित अधिकारी याला जबाबदार आहेत. आम्हाला बोगस बियाण्यांची नुकसान भरपाई द्यावी व डोक्यावरील कर्ज मुक्त करावे. तसेच हमीभावाने तूर खरेदी करावी व खरेदी केंद्र सुरू करावे.- वसंत जिवतोडे, जेष्ठ कार्यकर्ता, शेतकरी संघटना.