शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

हवालदिल शेतकरी झिजवतो बँकांचे उंबरठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 23:22 IST

विनेशचंद्र मांडवकर।आॅनलाईन लोकमतनंदोरी : अस्मानी व सुलतानी संकटात बळीराजा पूर्णत: होरपळून निघाला. बोंडअळीचे सावट विदर्भासह संबध महाराष्ट्रातही पसरले. कृषी अधिकारी व तत्सम संबंधित अधिकाऱ्यांनी पूर्ण गुण देऊन बियाणे पास केले. कपाशीचे पीक निम्यापेक्षाही कमी आले. आधीच परिस्थितीने मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांचा यात बळी गेला. आज ग्रामीण शेतकरी कर्जमाफीचे पैसे आलेत का, ...

ठळक मुद्देबळीराजाचा टाहो : कर्जमाफीचे पैसे आलेत का ?

विनेशचंद्र मांडवकर।आॅनलाईन लोकमतनंदोरी : अस्मानी व सुलतानी संकटात बळीराजा पूर्णत: होरपळून निघाला. बोंडअळीचे सावट विदर्भासह संबध महाराष्ट्रातही पसरले. कृषी अधिकारी व तत्सम संबंधित अधिकाऱ्यांनी पूर्ण गुण देऊन बियाणे पास केले. कपाशीचे पीक निम्यापेक्षाही कमी आले. आधीच परिस्थितीने मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांचा यात बळी गेला. आज ग्रामीण शेतकरी कर्जमाफीचे पैसे आलेत का, हे विचारत तलाठी कार्यालय व बँकांचे उंबरठे झिजवत आहे.चालू कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना २५ टक्के कसाबसा लाभ मिळाला असल्याचे बँक अधिकारी सांगतात. थकबाकीदार व परिस्थितीने नडलेला शेतकरी मात्र आजही डोळ्यात प्राण आणून कर्जमुक्तीची वाट बघत आहे. पुढील हंगामात बियाणांकरिता पैशाची व्यवस्था कशी करावी, मुलीचे लग्न कसे करावे, पोरांची शाळा-कॉलेज शुल्क कसे भरावे, या विवंचनेत आहे.जगाचा पोशिंदा समजल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांवर आजही दु:खाचे सावट पसरले आहे. बीजी-२, नंतर बीजी-३ आली. बोंडअळीस प्रतिकारक म्हणून बीजी-२ या कपाशीच्या बियाण्यांचा गाजावाजा झाला. तणसमारक म्हणून बीजी-३ या कपाशीला शेतकºयांनी डोक्यावर घेतले.बीजी-३ व बीजी-२ बोंडअळ्यांनी पोखरून टाकली. कंपन्या व अधिकारी मात्र गलेलठ्ठ झाले. एकीकडे शेतकऱ्यांचा उध्दारकर्ता म्हणून सत्ताधाऱ्यांनी गाजावाजा केला. आज शेतकरी त्याची नुकसान भरपाई मागत आहे. तरीही त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.दरम्यान, शेतकऱ्यांनी कृषिपंपांकरिता बँकांकडे अर्ज केल्यास या प्रक्रियेत थकीत पीक कर्ज आड येत असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.लाख मोलाचे पीक गेले. रोगप्रतिकारक म्हणून बीजी-२ कपाशी लावली. ती बोंडअळ्यांनी फस्त केली. शासनाने बोगस बियाणे पास केले. कंपन्या व संबंधित अधिकारी याला जबाबदार आहेत. आम्हाला बोगस बियाण्यांची नुकसान भरपाई द्यावी व डोक्यावरील कर्ज मुक्त करावे. तसेच हमीभावाने तूर खरेदी करावी व खरेदी केंद्र सुरू करावे.- वसंत जिवतोडे, जेष्ठ कार्यकर्ता, शेतकरी संघटना.