शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

हार्वेस्टर यंत्राने लोप पावली बैलबंडीची मळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 00:50 IST

धान मळणीसाठी बैलांची जुंपली जाणारी पात. शेतातली खऱ्यावरच केले जाणारे स्वयंपाक यामुळे धान मळणीच्या कामाची मजा काही औरच होती. या मजुपेढे धान मळणीच्या कामातून येणारे त्राण कमी होत होते.

ठळक मुद्देसंडे अँकर । उन्हाळी धान पिकाच्या मळणीसाठी हार्वेस्टर यंत्र जिल्ह्यात दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : धान मळणीसाठी बैलांची जुंपली जाणारी पात. शेतातली खऱ्यावरच केले जाणारे स्वयंपाक यामुळे धान मळणीच्या कामाची मजा काही औरच होती. या मजुपेढे धान मळणीच्या कामातून येणारे त्राण कमी होत होते. मात्र, आता धान मळणीसाठी बैलांच्या पातीची जागा हार्वेस्टर यंत्रांनी घेतली आहे. त्यामुळे धान मळणीची पूर्वीची मजा आता संपली आहे.२१ व्या शतकात विज्ञानाने मोठी प्रगती केली आहे. रोेजच्या संशोधन तंत्राच्या बळावर तयार होत असलेल्या यंत्रानी मानवी जीवनाच्या परिघातील प्रत्येक बिंंदूला स्पर्श केला आहे. जे काम फक्त मानवच करू शकतो. असा दृढ समज मानवाचा होता. मात्र, हा समज यंत्रानी खोटा ठरविला आहे. कृषीप्रधान भारतात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. धानाची मळणी करण्यासाठी एक दशकापूर्वी बैल किंवा बैलबंडी हेच एकमेव मळणी यंत्र होते. पुढे टॅÑक्टरवर चालणारे मळणी यंत्र आले. आता तर त्याच्याही पुढचे तंत्रज्ञान म्हणजे, हार्वेस्टरचा वापर सुरू झाला आहे. हार्वेस्टरच्या वापरामुळे धानाची कापणी, बांधणी व मळणीचा खर्च वाचतो. त्यामुळे अनेक शेतकरी हार्वेस्टरचा वापर करीत आहेत. विशेष करून उन्हाळी धान पिकासाठी हार्वेस्टरचा वापर शेतकरी करीत असल्याचे दिसून येते.कृषी क्षेत्रात यंत्रे आल्याने शेतीची अवघड कामे आता सोपी झाली आहेत. त्यामुळे यंत्रांचा वापर करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत चालला असल्याचे दिसून येते.चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, सिंदेवाही, मूल, नागभीड या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उन्हाळी धान पीके घेण्यात येत असून बहुतांश शेतकरी हार्वेस्टरचाच वावर अधिकाधिक प्रमाणात करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पूर्वीचे आठवडाभर चालणारी धान मळणी लोप पावत चालली आहे.असे असते हार्वेस्टर यंत्रउन्हाळी धान पिकाची कापणी उन्हाळ्यात होते. कडक उन्हाळ्यात धान पिकाची मळण्ी करणे शक्य होत नाही. कापणी व बांधणी करण्यास मजूर मिळत नाही. त्यामुळे हार्वेस्टर यंत्राचा वापर केला जातो. हार्वेस्टर यंत्र धानाची कापणी करतात. त्याच वेळी मळणीसुध्दा होते. मळणी झालेले धान यंत्राच्या डब्यात एकाच ठिकाणी जमा होते. एकाच वेळी सर्व कामे होत असल्याने शेतकरी वर्ग हार्वेस्टर यंत्राच्या वापराला पसंती दर्शवित आहेत. त्यामुळे पुर्वी आठवडाभर चालणारी धान मळणी आता काहीत तासात पूर्ण होते. परिणामी शेतकºयांचा बराच वेळ व मेहनत वाचते. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात हार्वेस्टर यंत्राचा वापर करताना दिसून येतात.

टॅग्स :agricultureशेती