शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

हार्वेस्टर यंत्राने लोप पावली बैलबंडीची मळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 00:50 IST

धान मळणीसाठी बैलांची जुंपली जाणारी पात. शेतातली खऱ्यावरच केले जाणारे स्वयंपाक यामुळे धान मळणीच्या कामाची मजा काही औरच होती. या मजुपेढे धान मळणीच्या कामातून येणारे त्राण कमी होत होते.

ठळक मुद्देसंडे अँकर । उन्हाळी धान पिकाच्या मळणीसाठी हार्वेस्टर यंत्र जिल्ह्यात दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : धान मळणीसाठी बैलांची जुंपली जाणारी पात. शेतातली खऱ्यावरच केले जाणारे स्वयंपाक यामुळे धान मळणीच्या कामाची मजा काही औरच होती. या मजुपेढे धान मळणीच्या कामातून येणारे त्राण कमी होत होते. मात्र, आता धान मळणीसाठी बैलांच्या पातीची जागा हार्वेस्टर यंत्रांनी घेतली आहे. त्यामुळे धान मळणीची पूर्वीची मजा आता संपली आहे.२१ व्या शतकात विज्ञानाने मोठी प्रगती केली आहे. रोेजच्या संशोधन तंत्राच्या बळावर तयार होत असलेल्या यंत्रानी मानवी जीवनाच्या परिघातील प्रत्येक बिंंदूला स्पर्श केला आहे. जे काम फक्त मानवच करू शकतो. असा दृढ समज मानवाचा होता. मात्र, हा समज यंत्रानी खोटा ठरविला आहे. कृषीप्रधान भारतात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. धानाची मळणी करण्यासाठी एक दशकापूर्वी बैल किंवा बैलबंडी हेच एकमेव मळणी यंत्र होते. पुढे टॅÑक्टरवर चालणारे मळणी यंत्र आले. आता तर त्याच्याही पुढचे तंत्रज्ञान म्हणजे, हार्वेस्टरचा वापर सुरू झाला आहे. हार्वेस्टरच्या वापरामुळे धानाची कापणी, बांधणी व मळणीचा खर्च वाचतो. त्यामुळे अनेक शेतकरी हार्वेस्टरचा वापर करीत आहेत. विशेष करून उन्हाळी धान पिकासाठी हार्वेस्टरचा वापर शेतकरी करीत असल्याचे दिसून येते.कृषी क्षेत्रात यंत्रे आल्याने शेतीची अवघड कामे आता सोपी झाली आहेत. त्यामुळे यंत्रांचा वापर करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत चालला असल्याचे दिसून येते.चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, सिंदेवाही, मूल, नागभीड या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उन्हाळी धान पीके घेण्यात येत असून बहुतांश शेतकरी हार्वेस्टरचाच वावर अधिकाधिक प्रमाणात करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पूर्वीचे आठवडाभर चालणारी धान मळणी लोप पावत चालली आहे.असे असते हार्वेस्टर यंत्रउन्हाळी धान पिकाची कापणी उन्हाळ्यात होते. कडक उन्हाळ्यात धान पिकाची मळण्ी करणे शक्य होत नाही. कापणी व बांधणी करण्यास मजूर मिळत नाही. त्यामुळे हार्वेस्टर यंत्राचा वापर केला जातो. हार्वेस्टर यंत्र धानाची कापणी करतात. त्याच वेळी मळणीसुध्दा होते. मळणी झालेले धान यंत्राच्या डब्यात एकाच ठिकाणी जमा होते. एकाच वेळी सर्व कामे होत असल्याने शेतकरी वर्ग हार्वेस्टर यंत्राच्या वापराला पसंती दर्शवित आहेत. त्यामुळे पुर्वी आठवडाभर चालणारी धान मळणी आता काहीत तासात पूर्ण होते. परिणामी शेतकºयांचा बराच वेळ व मेहनत वाचते. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात हार्वेस्टर यंत्राचा वापर करताना दिसून येतात.

टॅग्स :agricultureशेती