शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

मानवतेची भावना ठेवून नुकसानग्रस्त पिकांचे सर्व्हेक्षण करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 06:00 IST

शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित आढावा सभेत ते बोलत होते. चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकºयांना फार मोठा हादरा बसलेला आहे. कापूस, सोयाबीन, धान या मुख्य पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. शेतकºयांना नुकसान भरपाई लवकरात लवकर देता यावी, यासाठी राज्य सरकार आग्रही असून प्रशासनाने गतीने काम करावे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार । अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत तातडीची आढावा सभा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सतत सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी, याकरिता मानवतेची भावना ठेवून नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत, असे निर्देश अर्थ, नियोजन, वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित आढावा सभेत ते बोलत होते. चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना फार मोठा हादरा बसलेला आहे. कापूस, सोयाबीन, धान या मुख्य पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर देता यावी, यासाठी राज्य सरकार आग्रही असून प्रशासनाने गतीने काम करावे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यास कोणतीही हयगय करू नये. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी प्रत्येक शासकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी मानवतेच्या दृष्टीकोनातून काम करावे. पंचनामे करताना कोणतीही चूक होणार नाही याची दक्षता घ्यावी. काही अडचणी निर्माण झाल्यास त्या दूर करण्यास प्राधान्य दिले जाईल. परंतु विविध कारणे सांगून शेतकऱ्यांची अडवणूक करता कामा नये. शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करणे या कामाला प्राथमिकता द्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.या आढावा सभेला विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील, जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती अर्चना जीवतोडे, समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, स्थायी समिती सभापती राहुल पावडे तसेच उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तहसीलदार, जिल्हा परिषदेचे सर्व सभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती उपस्थित होते.कामाला गती देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढे यावेसोबतच प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा निधी शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रशासनाने ऑनलाईन प्रक्रियेमध्ये झालेल्या चुका लवकरात लवकर दुरुस्त कराव्यात. या कामाला गती देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, असेही यावेळी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारagricultureशेती