शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत धर्मस्थळांवर अखेर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2016 02:00 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत ठरविण्यात आलेल्या १७ पैकी १२ धर्मस्थळांवर बुधवारी

कारवाईला प्रारंभ : पहिल्या दिवशी १२ अतिक्रमणे भुईसपाट चंद्रपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत ठरविण्यात आलेल्या १७ पैकी १२ धर्मस्थळांवर बुधवारी कारवाईचा हातोडा चालला. सकाळी ११ वाजता सुरु झालेल्या या कारवाईत दिवसभरात १२ अनधिकृत धर्मस्थळांना भूईसपाट करण्यात आले. सायंकाळनंतर ही कारवाई थांबली असली तरी, उद्या गुरूवारी सकाळीपासून ती पुन्हा सुरू होऊन उर्वारित पाच धर्मस्थळांना हटविण्याची कारवाई केली जाणार आहे. बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास बुलडोजर, अग्नीशामक दलाचे वाहन, सफाई कर्मचारी, पोलीस अधिकारी व शिपाई आणि महानगर पालिकेतील वरीष्ठ अधिकाऱ्यांचा ताफा घटनास्थळी पोहचला. या पथकाने पहिला हातोडा जिल्हा परिषदेलगतच्या शिवमंदिरावर आणि बाबा ताजुद्दीन यांच्या दर्ग्यावर मारला. अगदी एकमेकाला लागून असलेले हे मंदिर आणि दर्गा म्हणजे चंद्रपुरातील सामाजिक सद्भावनेचे प्रतिक समजले जात होते. या दोन्ही ठिकाणच्या इमारती केवळ अर्धा तासात भूईसपाट केल्या. अकस्मातपणे सुरू झालेल्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये प्रारंभी प्रचंड कुतूहल निर्माण झाले होते. अगदी वर्दळीच्या मार्गावर ही धर्मस्थळे असल्याने सुरक्षेच्या कारणावरून वाहतूक विभागाने प्रियदर्शनी चौकातून येणारा एकेरी मार्ग बंद केला होता. केवळ अर्धा तासात हे अतिक्रमण हटवून पथक पुढील कारवाईसाठी रवाना झाले. या ठिकाणी ही कारवाई सुरू असतानाच, मूल मार्गावरील वनविभागाच्या कार्यालयाजवळील माता मंदिरही पाडण्यात आले. नवरात्रीच्या काळात या मंदिरात मोठ्या संख्येने ओटी भरण्यासाठी येणाऱ्या महिला वर्गात आणि नागरिकांमध्ये यामुळे हळहळ व्यक्त होताना दिसली. मात्र न्यायालयाच्या आदेशानेच ही कारवाई सुरू असल्याचे लक्षात आल्यावर विरोधासाठी कुणीही सामोरे आले नाही. महानगर पालिकेने आणि पोलीस विभागाने या अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईसाठी मनपाच्या झोननिहाय तीन पथके स्थापन केली होती. या पथकांचे नेतृत्व सहाय्यक आयुक्त विजय देवळीकर, सचिन पाटील आणि अश्विनी गायकवाड या अधिकाऱ्यांकडे होते. त्यांंनी दिवसभर पथकासोबत राहून ही कारवाई पार पाडली. या सोबतच चंद्रपूर मनपाचे उपायुक्त रामनगर पोलीस निरीक्षक संपत चव्हाण, वाहतूक पोलीस निरीक्षक कोळी, डॉ. विजय इंगोले सर्व घटनास्थळी प्रामुख्याने उपस्थित होते. बुधवारी दिवसभरात एकूण १२ अनधिकृत प्रार्थनास्थळे हटविण्यात आली. यात, मूल मार्गावरील माता मंदिर, जिल्हा परिषदेलगतचे शिवमंदिर आणि ताजुद्दीन बाबा दर्गा, अरविंदनगर येथील शिवमंदिर, गंज वॉर्डातील नागमंदिर, बागला चौकातील हनुमान मंदिर, महाकाली मंंदिराजवळील वाघोबाची तीन मंदिरे, तुकूम परिसरातील पाच मंदिरे हटविण्यात आली. (जिल्हा प्रतिनिधी) आक्षेपांवरील उत्तरानंतरच कारवाई ४मुंबई उच्च न्यायालयाने २००९ नंतर बांधण्यात आलेली सर्व धार्मिक स्थळे अवैध ठरविली आहेत. या अवैध धार्मिक स्थळांवर मे २०१६ पर्यंत कारवाई करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले होते. चंद्रपूर शहरात प्रारंभी ५९० धार्मिक स्थळे अनधिकृत आढळली होती. त्यांवर संबंधितांकडून आक्षेप मागविल्यावर ३१ धार्मिक स्थळे २९ सप्टेंबर २००९ नंतरची आढळली होती. नंतर त्यातील काहींकडून आक्षेपावर उत्तरे आल्यावर १७ धर्मस्थळे अवैध ठरविण्यात आली होती. पालिकेने संबंधित व्यवस्थापकांना नोटीस बजावून धार्मिक स्थळ निष्काशित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यासाठी प्रशासनासोबत बैठका घेवून सामंजस्याने तोडगा काढणञयात आला होता. त्यामुळेच कारवाई सुरु असताना विरोध दिसला नाही. न्यायालयाच्या आदेशावरूनच ही कारवाई सुरू आहे. नागरिकांनीही या मोहिमेला सहकार्य केले आहे. आज १२ अतिक्रमणे हटविण्यात आली असून गुरूवारी उर्वारित पाच अतिक्रमणे हटविण्याची कारवाई केली जाईल. - डॉ. विजय इंंगोले, उपायुक्त मनपा, चंद्रपूर