शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

दीड लाख कुटुंबांना सिलिंडरची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 23:52 IST

उज्ज्वला योजनेअंतर्गत जिल्ह्यात ७४ हजार १३७ गॅस कनेक्शन वितरित करण्यात आले आहे. जिल्ह्यात ४ लाख ९४ हजार ४८४ शिधापत्रिकाधारक आहेत. यातील तीन लाख ३२ हजार १३० कुटुंबे ही गॅसधारक आहेत. परंतु, १ लाख ६२ हजार ३५४ कुटुंबांना अद्याप सिलिंडरपासून वंचित आहेत.

ठळक मुद्देउज्ज्वला योजना : जिल्ह्यात ४ लाख ९४ हजार ४८४ शिधापत्रिकाधारक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : उज्ज्वला योजनेअंतर्गत जिल्ह्यात ७४ हजार १३७ गॅस कनेक्शन वितरित करण्यात आले आहे. जिल्ह्यात ४ लाख ९४ हजार ४८४ शिधापत्रिकाधारक आहेत. यातील तीन लाख ३२ हजार १३० कुटुंबे ही गॅसधारक आहेत. परंतु, १ लाख ६२ हजार ३५४ कुटुंबांना अद्याप सिलिंडरपासून वंचित आहेत.सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबासाठी उज्ज्वला योजना सुरू केली आहे. या योजनअंतर्गत अशा कुटुंबांना मोफत सिलिंडर दिल्या जाते. योजनेच्या लाभासाठी आतापर्यंत जिल्ह्यातून १ लाख १६२ कुटुंबांनी अर्ज सादर केले. यातील ८० हजार ५६८ कुटुंबांचे अर्ज मंजूर झाले असून १९ हजार ५९४ अर्ज नामंजूर करण्यात आले. एकूण अर्जांपैकी उज्ज्वला योजनेचे लाभार्थी म्हणून ७४ हजार १८५ कुटुंबांची निवड करण्यात आली. यातील ७४ हजार १३७ कुटुंबांना सिलिंडर देण्यात आला.४ हजार ४४७० कुटुंबांकडील गॅस जोडणी रद्द करण्यात आली आहे. जिल्ह्याची लोकसंख्या २१ लाख ९४ हजार २६२ आहे. यात ४ लाख ९४ हजार ४८४ कुटुंबांकडे शिधापत्रिका आहेत. यातील ३ लाख ३२ हजार १३० कुुटुबे गॅसधारक तर १ लाख ६२ हजार ३५४ कुटुंबांकडे गॅस नाही. जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने उज्ज्वला योजनेची प्रभावी अंमलबजावणी केल्याने लाभार्थ्यांची संख्या वाढत आहेत.परंतु ग्रामीण व आदिवासी भागातील शेकडो कुटुंबांपर्यंत ही योजना पोहोचली नाही. आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाज घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी ही योजना गतिमान करण्याची मागणी विविध सामाजिक संघटना व नागरिकांनी केली आहे.-अन्यथा पुन्हा चुलआर्थिकदृष्ट्या दुर्बल या निकषातून उज्ज्वला योजनेचे गॅस कनेक्शन मिळाले. मात्र, काही महिने लोटल्यानंतर सिलिंडर रिफिलींगसाठी लागणारे पैसे जुळविताना शेकडो कुटुंबांना संकटांचा सामना करावा लागत आहे. शासनाने यावर तोडगा काढला नाही तर गरीबांना चुलीचाच आधार घेण्याची वेळ येऊ शकते. योजना राबवताना याकडेही लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली.