शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
3
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
4
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
5
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
6
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
7
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
8
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
9
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
10
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
11
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
12
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
13
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
14
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
15
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
16
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
17
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
18
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
19
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
20
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाख कुटुंबांना सिलिंडरची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 23:52 IST

उज्ज्वला योजनेअंतर्गत जिल्ह्यात ७४ हजार १३७ गॅस कनेक्शन वितरित करण्यात आले आहे. जिल्ह्यात ४ लाख ९४ हजार ४८४ शिधापत्रिकाधारक आहेत. यातील तीन लाख ३२ हजार १३० कुटुंबे ही गॅसधारक आहेत. परंतु, १ लाख ६२ हजार ३५४ कुटुंबांना अद्याप सिलिंडरपासून वंचित आहेत.

ठळक मुद्देउज्ज्वला योजना : जिल्ह्यात ४ लाख ९४ हजार ४८४ शिधापत्रिकाधारक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : उज्ज्वला योजनेअंतर्गत जिल्ह्यात ७४ हजार १३७ गॅस कनेक्शन वितरित करण्यात आले आहे. जिल्ह्यात ४ लाख ९४ हजार ४८४ शिधापत्रिकाधारक आहेत. यातील तीन लाख ३२ हजार १३० कुटुंबे ही गॅसधारक आहेत. परंतु, १ लाख ६२ हजार ३५४ कुटुंबांना अद्याप सिलिंडरपासून वंचित आहेत.सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबासाठी उज्ज्वला योजना सुरू केली आहे. या योजनअंतर्गत अशा कुटुंबांना मोफत सिलिंडर दिल्या जाते. योजनेच्या लाभासाठी आतापर्यंत जिल्ह्यातून १ लाख १६२ कुटुंबांनी अर्ज सादर केले. यातील ८० हजार ५६८ कुटुंबांचे अर्ज मंजूर झाले असून १९ हजार ५९४ अर्ज नामंजूर करण्यात आले. एकूण अर्जांपैकी उज्ज्वला योजनेचे लाभार्थी म्हणून ७४ हजार १८५ कुटुंबांची निवड करण्यात आली. यातील ७४ हजार १३७ कुटुंबांना सिलिंडर देण्यात आला.४ हजार ४४७० कुटुंबांकडील गॅस जोडणी रद्द करण्यात आली आहे. जिल्ह्याची लोकसंख्या २१ लाख ९४ हजार २६२ आहे. यात ४ लाख ९४ हजार ४८४ कुटुंबांकडे शिधापत्रिका आहेत. यातील ३ लाख ३२ हजार १३० कुुटुबे गॅसधारक तर १ लाख ६२ हजार ३५४ कुटुंबांकडे गॅस नाही. जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने उज्ज्वला योजनेची प्रभावी अंमलबजावणी केल्याने लाभार्थ्यांची संख्या वाढत आहेत.परंतु ग्रामीण व आदिवासी भागातील शेकडो कुटुंबांपर्यंत ही योजना पोहोचली नाही. आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाज घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी ही योजना गतिमान करण्याची मागणी विविध सामाजिक संघटना व नागरिकांनी केली आहे.-अन्यथा पुन्हा चुलआर्थिकदृष्ट्या दुर्बल या निकषातून उज्ज्वला योजनेचे गॅस कनेक्शन मिळाले. मात्र, काही महिने लोटल्यानंतर सिलिंडर रिफिलींगसाठी लागणारे पैसे जुळविताना शेकडो कुटुंबांना संकटांचा सामना करावा लागत आहे. शासनाने यावर तोडगा काढला नाही तर गरीबांना चुलीचाच आधार घेण्याची वेळ येऊ शकते. योजना राबवताना याकडेही लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली.