शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पहाडावरील तलाव, नाले कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 00:26 IST

अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यात सध्या पाणी टंचाई नाही. परंतु, यावर्षी पहाडावर पावसाचे प्रमाण अत्यल्प झाल्याने जानेवारी महिन्यातच नाल्यास गावतलावही कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देभीषण पाणीटंचाईचे सावट : जंगली प्राण्यांची गावाकडे धाव

शंकर चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यात सध्या पाणी टंचाई नाही. परंतु, यावर्षी पहाडावर पावसाचे प्रमाण अत्यल्प झाल्याने जानेवारी महिन्यातच नाल्यास गावतलावही कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.जिवती तालुक्यात ३३ गावे असून ७० हजार येथील लोकसंख्या आहे. परिसरात सिंचनाच्या सोयीसुविधा नाहीत. संपुर्ण कोरडवाहु क्षेत्र असून निसर्गाच्या पावसावरच येथील शेती अवलंबून आहे. मागील वर्षी निसर्गाने दगा दिला. पाऊस झाला नाही आणि जवळपास पाण्याची साठवणूक होईल, असे तलाव किंवा बंधारे तालुक्यात नाहीत.काही गावात तर शासनाच्या महत्त्वाच्या योजनाच पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे येथील शेतकºयांना शाश्वत शेती करता येत नाही आणि जास्त उत्पन्नही घेता येत नाही. दरवर्षी निसर्गाच्या पावसाचे प्रमाण अत्यल्प होत असल्याने भुगर्भातील पाण्याची पातळीही खोल गेली आहे. एप्रिल-मे महिन्यापासून सुरू होणारी पाणी टंचाई यंदा जानेवारीतच सुरू झाली आहे. अनेक गावातील तलाव-नाले कोरडे पडले आहेत. त्यामुळे पहाडावरील नागरिकांना नवे वर्ष तहानलेले जाणार की काय, असे चिन्ह दिसून येत आहेत.जिल्हा प्रशासनाने लवकरच या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असून आतापासूनच उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा जिवती तालुक्याच्या पहाडावर पाणी टंचाई नक्कीच उग्ररूप धारण करेल, यात शंका नाही.पाण्यासाठी भटकंतीयेल्लापूर, लांबोरी, टेकामांडवा येथील गाव तलावात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा असतो. परंतु यावर्षीच्या अत्यल्प पावसामुळे ही तलावे समाधानकारक भरली नाही. उन्हाळ्यापुर्वीच तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांसोबत जंगली प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे.तलाव-नाल्याचे खोलीकरण आवश्यकतालुक्यात निसर्गाचे पाणी साठवणूक करण्यासाठी मोठे तलाव निर्माण करण्याची गरज आहे. तलाव बांधासोबतच तलाव-नाल्याचे खोलीकरण केल्यास नक्कीच पहाडावरील जमिनीत पाण्याची पातळी वाढविण्यास मदत मिळेल. यासाठी शेतकºयांना सुद्धा तेवढेच प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.