शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
2
बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
3
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
4
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
5
अभिमानास्पद! PM मोदींनी पुतिन यांना दिली अत्यंत खास भेट; जगात लाखो लोकांना आजही प्रेरणादायी
6
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
7
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
8
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
9
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
10
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
11
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
12
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
13
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
14
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
15
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
16
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
17
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
18
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
19
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
20
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
Daily Top 2Weekly Top 5

पहाडावरील तलाव, नाले कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 00:26 IST

अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यात सध्या पाणी टंचाई नाही. परंतु, यावर्षी पहाडावर पावसाचे प्रमाण अत्यल्प झाल्याने जानेवारी महिन्यातच नाल्यास गावतलावही कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देभीषण पाणीटंचाईचे सावट : जंगली प्राण्यांची गावाकडे धाव

शंकर चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यात सध्या पाणी टंचाई नाही. परंतु, यावर्षी पहाडावर पावसाचे प्रमाण अत्यल्प झाल्याने जानेवारी महिन्यातच नाल्यास गावतलावही कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.जिवती तालुक्यात ३३ गावे असून ७० हजार येथील लोकसंख्या आहे. परिसरात सिंचनाच्या सोयीसुविधा नाहीत. संपुर्ण कोरडवाहु क्षेत्र असून निसर्गाच्या पावसावरच येथील शेती अवलंबून आहे. मागील वर्षी निसर्गाने दगा दिला. पाऊस झाला नाही आणि जवळपास पाण्याची साठवणूक होईल, असे तलाव किंवा बंधारे तालुक्यात नाहीत.काही गावात तर शासनाच्या महत्त्वाच्या योजनाच पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे येथील शेतकºयांना शाश्वत शेती करता येत नाही आणि जास्त उत्पन्नही घेता येत नाही. दरवर्षी निसर्गाच्या पावसाचे प्रमाण अत्यल्प होत असल्याने भुगर्भातील पाण्याची पातळीही खोल गेली आहे. एप्रिल-मे महिन्यापासून सुरू होणारी पाणी टंचाई यंदा जानेवारीतच सुरू झाली आहे. अनेक गावातील तलाव-नाले कोरडे पडले आहेत. त्यामुळे पहाडावरील नागरिकांना नवे वर्ष तहानलेले जाणार की काय, असे चिन्ह दिसून येत आहेत.जिल्हा प्रशासनाने लवकरच या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असून आतापासूनच उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा जिवती तालुक्याच्या पहाडावर पाणी टंचाई नक्कीच उग्ररूप धारण करेल, यात शंका नाही.पाण्यासाठी भटकंतीयेल्लापूर, लांबोरी, टेकामांडवा येथील गाव तलावात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा असतो. परंतु यावर्षीच्या अत्यल्प पावसामुळे ही तलावे समाधानकारक भरली नाही. उन्हाळ्यापुर्वीच तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांसोबत जंगली प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे.तलाव-नाल्याचे खोलीकरण आवश्यकतालुक्यात निसर्गाचे पाणी साठवणूक करण्यासाठी मोठे तलाव निर्माण करण्याची गरज आहे. तलाव बांधासोबतच तलाव-नाल्याचे खोलीकरण केल्यास नक्कीच पहाडावरील जमिनीत पाण्याची पातळी वाढविण्यास मदत मिळेल. यासाठी शेतकºयांना सुद्धा तेवढेच प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.