शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

पहाडावरील तलाव, नाले कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 00:26 IST

अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यात सध्या पाणी टंचाई नाही. परंतु, यावर्षी पहाडावर पावसाचे प्रमाण अत्यल्प झाल्याने जानेवारी महिन्यातच नाल्यास गावतलावही कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देभीषण पाणीटंचाईचे सावट : जंगली प्राण्यांची गावाकडे धाव

शंकर चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यात सध्या पाणी टंचाई नाही. परंतु, यावर्षी पहाडावर पावसाचे प्रमाण अत्यल्प झाल्याने जानेवारी महिन्यातच नाल्यास गावतलावही कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.जिवती तालुक्यात ३३ गावे असून ७० हजार येथील लोकसंख्या आहे. परिसरात सिंचनाच्या सोयीसुविधा नाहीत. संपुर्ण कोरडवाहु क्षेत्र असून निसर्गाच्या पावसावरच येथील शेती अवलंबून आहे. मागील वर्षी निसर्गाने दगा दिला. पाऊस झाला नाही आणि जवळपास पाण्याची साठवणूक होईल, असे तलाव किंवा बंधारे तालुक्यात नाहीत.काही गावात तर शासनाच्या महत्त्वाच्या योजनाच पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे येथील शेतकºयांना शाश्वत शेती करता येत नाही आणि जास्त उत्पन्नही घेता येत नाही. दरवर्षी निसर्गाच्या पावसाचे प्रमाण अत्यल्प होत असल्याने भुगर्भातील पाण्याची पातळीही खोल गेली आहे. एप्रिल-मे महिन्यापासून सुरू होणारी पाणी टंचाई यंदा जानेवारीतच सुरू झाली आहे. अनेक गावातील तलाव-नाले कोरडे पडले आहेत. त्यामुळे पहाडावरील नागरिकांना नवे वर्ष तहानलेले जाणार की काय, असे चिन्ह दिसून येत आहेत.जिल्हा प्रशासनाने लवकरच या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असून आतापासूनच उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा जिवती तालुक्याच्या पहाडावर पाणी टंचाई नक्कीच उग्ररूप धारण करेल, यात शंका नाही.पाण्यासाठी भटकंतीयेल्लापूर, लांबोरी, टेकामांडवा येथील गाव तलावात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा असतो. परंतु यावर्षीच्या अत्यल्प पावसामुळे ही तलावे समाधानकारक भरली नाही. उन्हाळ्यापुर्वीच तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांसोबत जंगली प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे.तलाव-नाल्याचे खोलीकरण आवश्यकतालुक्यात निसर्गाचे पाणी साठवणूक करण्यासाठी मोठे तलाव निर्माण करण्याची गरज आहे. तलाव बांधासोबतच तलाव-नाल्याचे खोलीकरण केल्यास नक्कीच पहाडावरील जमिनीत पाण्याची पातळी वाढविण्यास मदत मिळेल. यासाठी शेतकºयांना सुद्धा तेवढेच प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.